शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

मोदींचे भाषण; अधिसूचनेत विसंगती

By admin | Updated: January 6, 2017 04:17 IST

३० डिसेंबरपर्यंत चलनातून रद्द झालेल्या ५०० व १०००च्या नोटा काही कारणास्तव बदलून घेता आल्या नाहीत तर त्या नोटा ३१ मार्च २०१७पर्यंत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून

मुंबई : ३० डिसेंबरपर्यंत चलनातून रद्द झालेल्या ५०० व १०००च्या नोटा काही कारणास्तव बदलून घेता आल्या नाहीत तर त्या नोटा ३१ मार्च २०१७पर्यंत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून (आरबीआय) बदलून मिळतील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या भाषणातून सामान्यांना दिले होते. मात्र सरकारने याचे भान न ठेवता ३० डिसेंबर २०१६ रोजी वटहुकुमाद्वारे ही सुविधा केवळ नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांपुरतीच मर्यादित ठेवली. सरकारने शब्द न पाळल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारचा ३० डिसेंबरचा वटहुकूम रद्द करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.३० डिसेंबरनंतर आरबीआयने जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने बुधवारी आरबीआयच्या फोर्ट येथील मुख्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत परदेशी असलेल्या भारतीयांनाच जुन्या नोटा त्यांच्या बँकेत जमा करू शकण्याची सुविधा मिळेल, असे स्पष्ट करत सरकारने तसा वटहुकूम जारी केला. या वटहुकुमाला सचिन सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आरबीआयवर दबाव असल्यास किंवा त्यांना कोणी राजकीय नेत्याने अतिरिक्त अधिकार दिले असल्यास त्यांना स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावे, अशीही मागणी सावंत यांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)