शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे भाषण; अधिसूचनेत विसंगती

By admin | Updated: January 6, 2017 04:17 IST

३० डिसेंबरपर्यंत चलनातून रद्द झालेल्या ५०० व १०००च्या नोटा काही कारणास्तव बदलून घेता आल्या नाहीत तर त्या नोटा ३१ मार्च २०१७पर्यंत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून

मुंबई : ३० डिसेंबरपर्यंत चलनातून रद्द झालेल्या ५०० व १०००च्या नोटा काही कारणास्तव बदलून घेता आल्या नाहीत तर त्या नोटा ३१ मार्च २०१७पर्यंत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून (आरबीआय) बदलून मिळतील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या भाषणातून सामान्यांना दिले होते. मात्र सरकारने याचे भान न ठेवता ३० डिसेंबर २०१६ रोजी वटहुकुमाद्वारे ही सुविधा केवळ नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांपुरतीच मर्यादित ठेवली. सरकारने शब्द न पाळल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारचा ३० डिसेंबरचा वटहुकूम रद्द करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.३० डिसेंबरनंतर आरबीआयने जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने बुधवारी आरबीआयच्या फोर्ट येथील मुख्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत परदेशी असलेल्या भारतीयांनाच जुन्या नोटा त्यांच्या बँकेत जमा करू शकण्याची सुविधा मिळेल, असे स्पष्ट करत सरकारने तसा वटहुकूम जारी केला. या वटहुकुमाला सचिन सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आरबीआयवर दबाव असल्यास किंवा त्यांना कोणी राजकीय नेत्याने अतिरिक्त अधिकार दिले असल्यास त्यांना स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावे, अशीही मागणी सावंत यांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)