शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या धोरणांवरच मोदींची वाटचाल

By admin | Updated: January 19, 2015 00:54 IST

सुरुवातीला मिश्र आणि नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारून काँग्रेसने भांडवलदारी धोरण अवलंबविले. या धोरणामुळे कामगारांचे नुकसान झाले आहे. आता मोदी सरकारची सुद्धा काँग्रेसच्याच

भामसं विदर्भ अधिवेशनाचे उद्घाटन : कृष्णचंद्र मिश्र यांची टीका नागपूर : सुरुवातीला मिश्र आणि नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारून काँग्रेसने भांडवलदारी धोरण अवलंबविले. या धोरणामुळे कामगारांचे नुकसान झाले आहे. आता मोदी सरकारची सुद्धा काँग्रेसच्याच धोरणानुसार वाटचाल सुरू आहे, अशी टीका भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री कृष्णचंद्र मिश्र यांनी येथे केली. भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेशचे १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभातसुद्धा प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी हा मुद्दा लावून धरला.रविवारी सकाळी राज्याचे कामगार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील अध्यक्षस्थानी होते. तर पश्चिम क्षेत्रीय संघटक रामदौर सिंह, भामसंचे माजी वित्त सचिव वसंतराव पिंपळापुरे, भामसं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभाकर बानासुरे प्रमुख अतिथी होते. कृष्णचंद्र मिश्र म्हणाले, सरकार कुणाचेही असो, ते भांडवलदारी अर्थव्यवस्था राबवित आहेत. पं. नेहरूंपासून तर मोदींपर्यंत सर्वच एकाच मार्गाने चालत आहेत. संसदेत चर्चा करण्याऐवजी अध्यादेशाने सरकार चालवले जात आहे. रिटेलमध्ये एफडीआय येऊ देणार नाही, असे सांगितले जात होते. परंतु आता सर्वच क्षेत्रात एफडीआय येत आहे. आधीच कामगार कायद्यांची फारशी अंमलबजावणी होत नाही, अशात आहे ते कायदे सुद्धा रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब कामगार जगणार तरी कसा? काँग्रेसने राबवलेल्या धोरणांमुळे त्यांना काय परिणाम भोगावे लागलेत, हे सर्वांनीच पाहिले आहेत. तेव्हा सध्याचे सरकारही त्याच दिशेने वाटचार करीत असेल तर त्यांचे हाल काय होतील, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच भारताचा विकास हा भारताच्या दृष्टीने होणार की अमेरिकेच्या धर्तीवर होणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय मजदूर संघ ही कामगारांच्या हितासाठी काम करणारी स्वतंत्र संघटना आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही असो, कामगारांच्या हितासाठी आम्ही आवाज उचलत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. रमेश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय मजदूर संघाच्या कार्याचा आढावा घेतला. भामसंचे विदर्भ प्रदेश महामंत्री अशोक भुताड यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी संचालन केले. नागपूर जिल्हा सचिव गजानन गटलेवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कामगारांचे हित जोपसणारमहाराष्ट्र सरकार कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध असून नवीन धोरण आखले जात आहे. कामगारांच्या कायद्यात सुधारणा करीत असतांना कामगारांच्या हिताला बाधा निर्माण होणार नाही, असे आश्वासन राज्याचे श्रम राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात दिले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार राज्यमंत्री विजय देशमुख आणि कृष्णचंद्र मिश्र यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन भारतीय मजदूर संघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वसंतराव देवपुजारी, मधुसूदन रावल, नानासाहेब खेडकर, बाबासाहेब हरदास, दिनकरराव जोशी, मारोतराव धार्मिक, विश्वंभर वाघमारे, राजाभाऊ चिटणवीस, प्रभाकर खोलकुटे, सुरेश देशपांडे, डॉ. सुधाकर कुळकर्णी, सुनील लाभसेटवार, वसंतराव वानखेडे आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.