शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मोदींचे वर्तन गांधी विचारांच्या विरोधात!

By admin | Updated: October 13, 2014 00:43 IST

बुलडाण्याच्या सभेत राहुल गांधी यांची घणाघाती टिका.

बुलडाणा : महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे, न्युयॉर्कमधील पुतळ्याप्रमाणे सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात या थोर नेत्यांच्या विचारांच्या विसंगत कृती करायची, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असल्याची घणाघाती टिका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी रविवारी बुलडाण्यातील जाहीर सभेत केली. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. सभेला उपस्थित जनसमुदायास मराठीत ह्यनमस्कारह्ण करून, भाषणाला प्रारंभ करणार्‍या राहुल गांधी यांनी भाजपवर सडेतोड टीका केली. महात्मा गांधी, सरदार पटेल यांनी लोककल्याणाचा विचार दिला. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. नरेंद्र मोदी हे लोकांसमोर महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांना आदर्श मानतात; मात्र प्रत्यक्षात या दोघांच्या विचारांची हत्या करणारी कृती करतात. गांधी, पटेलांच्या त्याच विचारधारेवर काँग्रेस पक्ष उभा राहीला आणि त्याच विचाराने सरकार चालविले. म्हणूनच काँग्रेसच्या सरकारमध्ये सामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू राहिला आहे. महाराष्ट्र ही शाहू, फुले, आंबेडकर यांची भूमी आहे. त्यांनी दिलेला विचार हा शाश्‍वत विचार असून, तोच काँग्रेसचा आत्मा आहे. त्यामुळे काँग्रेस संपविण्याची भाषा करणारे हा विचार संपविण्यास उद्युक्त करतात; मात्र हा विचार संपविण्याची ताकद मोदींमध्ये नाही, अशी टिका त्यांनी केली. काँग्रेसने जनसामान्यांना ६00 प्रकारची औषधं मोफत दिली, शस्त्रक्रिया मोफत केल्या. मोदी सरकारने मात्र अमेरिकी कंपन्यांशी हातमिळवणी करून, १0८ औषधांचे भाव वाढवले. ८ हजाराचे औषध १ लाख रूपयांचे केले. सोयाबिनचा भाव कमी केला. काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या मनरेगा, अन्न सुरक्षा, शिक्षण अधिकार, जमिन अधिग्रहण अशा चांगल्या योजना आता बंद करण्याचे षडयंत्र रचले जात असून, सामान्यांच्या खिशात जाणारा पैसा आता उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याची टिका त्यांनी केली. *कहाँ गये अच्छे दिन?आमचे सरकार आल्यानंतर ह्यअच्छे दिनह्ण येतील, चिन घाबरेल, पाकीस्तान शरण येईल, अशा वल्गना भाजपने केल्या होत्या. प्रत्यक्षात चिनच्या राष्ट्रपतींसोबत मोदी झोपाळयावर झोके घेत होते, तेव्हा लद्दाखमध्ये चिनचे सैन्य घुसले. सीमेवर पाकीस्तानचा गोळीबार सुरूच आहे. अशा परिस्थितीत अच्छे दिन कब आयेंगे या प्रश्नावर, जल्द ही सब ठिक हो जायेंगा हे भाजपचे उत्तर असल्याचे, राहुल गांधी म्हणाले.