शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

मोदीजी, या चार प्रश्नांची उत्तरं शिक्षकांना मिळतील काय ?

By admin | Updated: September 3, 2014 03:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळकरी विद्याथ्र्याशी एकाचवेळी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळकरी विद्याथ्र्याशी एकाचवेळी संवाद साधणार आहेत. त्यासाठी विद्याथ्र्याना शाळेत हजर ठेवण्याबाबतच्या मुद्दय़ावर स्वागत आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दलच्या शिक्षकांच्या भावनांचे प्रातिनिधिक रूप ठरू शकेल, असे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे पंतप्रधानांना लिहिलेले हे खुले पत्र. याची प्रत त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडे सुपुर्द केली आहे. 
 
सन्माननीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी,
सप्रेम नमस्काऱ
येत्या दि. 5 सप्टेंबर 2क्14 रोजी, शिक्षकदिनी देशाला उद्देशून आपण भाषण करणार आहात. शिक्षकदिनी पंतप्रधानांनी असं भाषण करणं, हे पहिल्यांदाच घडत आहे. हा सुखद धक्का आहे, शिक्षकांसाठी सन्मान आहे. म्हणून त्याबद्दल आपलं मन:पूर्वक अभिनंदन आणि या निर्णयाचं स्वागत!
सगळा देश आपला संदेश ऐकण्यासाठी उत्सुक आहे. पण हे भाषण विद्याथ्र्याना ऐकवण्याची सक्ती करणारा फतवा केंद्र सरकारने काढला आहे, हे वाचून मन खट्ट झालं. सक्तीची काय गरज आहे? आणि वेळही दुपारी 3 ते 4.45 ची, अडचणीची.
आदेशात टीव्ही संचही उसनवारीने आणण्याचे फर्मान आहे. प्रत्येक वर्गात इतके टीव्ही संच आणायचे कुठून? उसनवारीने पैसे तर द्यावेच लागतील. महाराष्ट्रात वेतनेतर अनुदान 1क् वर्षात मिळालं नाही, मोठा बॅकलॉग आहे. मोडकळलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठीही पैसे नाहीत. महागडं वीजबिल भरतानाही नाकीनऊ येताहेत. इंटरनेटची व्यवस्था करायला सांगितली आहे. देशातल्या अध्र्या अधिक खेडय़ांमध्ये वीज असते कुठे? तर इंटरनेट कुठून येणार? आपल्या गुजरातमध्येच छोटे उदेपूर जिल्हय़ातल्या सजनपूर गावच्या मुलांचा फोटो अलीकडेच प्रसिद्ध झाला होता. नदीच्या पल्याड आदिवासी पाडय़ातल्या 125 मुलामुलींना शाळेसाठी नदी पोहून जावं लागतं. त्यांच्यासाठी नदीवर साकव किंवा पूलही अजून झालेला नाही, ना होडीची सोय आहे. त्या मुलांना तुमचं भाषण ऐकण्यासाठी टीव्ही केबलची जोडणी बहुधा नक्की होईल. निवडणुकीसाठी मतदार यंत्रे गाढवांवरून घेऊन जावी लागतात अनेक खेडय़ांत. 6 सप्टेंबरला टीव्ही संचही बहुधा असे गाढवांवरून  वाहून नेताना फोटो प्रसिद्ध होतील. 5 सप्टेंबरला देशात मोठाच इव्हेंट असणार आहे. उत्सुकताही मोठी आहे.
पण चार प्रश्न आहेत प्रधानमंत्रीजी,
1आपले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत नव्या सरकारचं बजेट मांडलं. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी भाषणात स्पष्ट सांगून टाकलं, की शिक्षणावर आता आणखी खर्च करण्याची गरज नाही. एक रुपया सुद्धा त्यांनी वाढवून दिलेला नाही. शिक्षणावरचा खर्चच वाढवायचा नाही, तर शिक्षण सर्वत्र पोचणार कसं? वाढणार कसं? तुम्ही असं का करताय? हे 5 सप्टेंबरला समजून घ्यायला आवडेल.
2याचा अर्थ शिक्षणाचं खाजगीकरण आणखी वाढत जाणार, हे उघड आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणातून आणि व्यापारीकरणातून महागलेल्या शिक्षणाच्या संधी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाहीत. मध्यमवर्गीयांना उच्च शिक्षण परवडत नाही. डॉक्टर, इंजिनीअर व्हायला 1क् ते 4क् लाख रुपये लागतात; आणणार 
कुठून? गरिबांच्या मुलांना स्वप्नही पाहता येत नाही. आपल्या 
भाषणातून आपण याबद्दल काही सांगणार का? ऐकायला देश उत्सुक आहे.
3शिक्षकांच्या कंत्रटीकरणातून शिक्षण क्षेत्रत शिक्षकांचं शोषण सुरू आहे. महाराष्ट्रात शिक्षणसेवक (आता टीचर ऑन प्रोबेशन) म्हणत होते. तिथे गुजरातमध्ये विद्यासहायक म्हणतात. गुजरातमध्ये त्यांचा पगार आहे फक्त रुपये 2,5क्क्/-. हायकोर्टाच्या भाषेत याला वेठबिगारी म्हणतात. या सरकारी शोषणाला एनडीएच्याच काळात सुरुवात झाली. पहिला प्रयोग गुजरातमध्येच झाला. या शोषणाच्या समाप्तीची घोषणा आपल्या भाषणातून होईल का? ऐकायला देशातील शिक्षक उत्सुक आहेत.
4गुजरातमध्ये दीनानाथ बात्रंचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. या ‘महान’ शिक्षणतज्ज्ञाला शिक्षणातल्या आधुनिक मूल्यांच्या पुरस्काराने समाजाचा :हास होतोय असं वाटतंय. त्यांनी थेट अठराव्या शतकातल्या समाजमूल्यांचा पुरस्कार करणारी पुस्तकं तयार केली आहेत. शिकागोच्या धर्म परिषदेत सर्वाना ‘माङया बंधू-भगिनींनो, अशी आपुलकीच्या नात्याची हाक घालणा:या स्वामी विवेकानंद यांच्या नावावर भलत्याच कथा त्यांनी तयार केल्या आहेत. डॉ. राधाकृष्णन यांच्याही कधीही कुणीही न वाचलेल्या (ना त्यांनी सांगितलेल्या) संस्कार कथा त्यात आहेत. जात, धर्म, रंग, भाषा भेदाचं विषारी जहर शाळेतच संस्कारीत करणा:या या बात्र प्रयोगाबद्दल देशाच्या मा.प्रधानमंत्र्यांचं काय म्हणणं आहे? ऐकायला देश आतुर आहे.
माननीय प्रधानमंत्रीजी, विक्रमादित्यला वेताळाने विचारलेले हे प्रश्न नाहीत. खेडय़ापाडय़ात अडचणींच्या डोंगरद:या पार करीत उद्याच्या पिढय़ा घडवणारे आपले शिक्षक खूपच साधे आहेत. तुमच्या भाषणाचं फर्मान पोचलंय त्यांच्याकडे. तुमचं भाषण आपल्या मुलांना ऐकवण्याच्या तयारीला लागले आहेत. प्रश्न विचारायला त्यांना वेळ आहेच कुठे? जनगणनेपासून गुरंढोरं मोजण्यार्पयत सगळीच काम करावी लागतात त्यांना. त्यात आता टीव्ही, केबल, डिश अँटेना आणण्याचं काम. दोन दिवस त्यात जाणार आहेत. काही हरकत नाही. पण शिक्षकदिनी आपली आठवण होते आहे, यावर ते खूश आहेत. या न विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली तर ते भलतेच खूश होतील, प्रधानमंत्रीजी.
कळावे. लोभ असावा. धन्यवाद!
 
आला स्नेहांकित,
- कपिल पाटील