शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला - कन्हैया कुमार

By admin | Updated: April 24, 2016 19:09 IST

भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोल कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला, सरकारमध्ये आहात, तर जनतेला रोजगार द्यावाच लागेल.'केवळ जाहिरातबाजीवर खर्च करुन योजना यशस्वी होत नाहीत', 'राष्ट्रवाद शब्दामागे ब्राह्मणवादाचा छुपा अजेंडा आहे. अशी टीका मोदी आणि संघावर कन्हैया कुमार केली. तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता.
 
भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोलही त्याने सुनावले. कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले. मातेची अडचण नाही पण कधी रोहित वेमुलांच्या आईला भेटा, त्या आईची वेदना काय असेल जिच्या मुलावर चप्पल भिरकावली जाते, मुलीवर बलात्कार होत आहेत. तुमची संवेदना नष्ट झाली का? असा सवालही त्यांने उपस्थित केला. 
 
नव्या पिढीने यागोष्टी समजून घ्या, योगाला आमचा विरोध नाही पण काय घ्यायचे आणि काय सोडायचे हे पहा असे म्हणत योगगुरु रामदेव बाबावर ही कडकडून टीका केली. देशातील व्यवस्था आणि परंपरा मिठवायची असेल तर पुण्याची पारंपरिक पगडीतील पिवळी पट्टी निळी करा, असे आवाहन कन्हैय्या कुमारनी केले . कन्हैयाच्या हातात कोणत्याही प्रकारचे लिखित भाषण नसल्याचे आढळून आले. कोणत्याही आविर्भावाशिवाय, अभिनिवेशाशिवाय त्याने संपूर्ण भाषण उत्स्फूतपणे केले.
 
अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला आहे. 40-50 गाड्यांच्या ताफ्यासह तो मुंबईहून पुण्यात दाखल झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तुफान गर्दी असून,  पास असलेल्या व्यक्तींनाच सभेला प्रवेश देण्यात आला. परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्रप्त झालं होतं. बालगंधर्व रंगमंदिरातील कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अमोल पालेकर, संध्या गोखले , बाबा आढाव, सिद्धार्थ धेंडे, मुक्ता मनोहर ,किरण मोघे संदीप बर्वे उपस्थित होते. पासशिवाय प्रवेश मिळत नसल्यामुळे बालगंधर्व च्या गेटवर तरूणांची घोषणाबाजी केली. 
 
 
 
कन्हैया कुमारच्या भाषाणातील ठळक मुद्दे - 
मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला - 
जेवढे रोहित माराल, तेवढे रोहित जन्माला येतील
आज चर्चा आयडेंटिटी चे राजकारण करत आहात पण आम्ही जात संपवायूला निघालो आहोत सर्वाना समान अधिकार मिळवा
मला भीती दाखवण्याच सोडा, मा कोणालाही घाबरत नाही 
मोदींनी ट्विट करुन सांगीतले की ग्रामीण भागाला टेक्नॉंलॉजीने जोडणार, पण या टेक्नॉलॉजीला दुष्काळाशी जोडा अस मी म्हणेल
पोलीसांची ठेकेदारी केली आता संसदेची पण करा 
विमानात जे काही झाले त्याबद्दल पोलीस खोट बोलत आहेत
असं तंत्रज्ञान बनवा, ज्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ दूर होईल 
जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न तीव्र होईल, तेव्हा सर्वजण रस्त्यावर उतरतील 
कोणाचा सौदा करीत आहेत प्रश्न उपस्थित केला तर हल्ले केले जातात हेच राजकारण आहे
तुम्ही नाव बदला आम्ही समाज बदलतो
मेक इन इंडियाचा पेंडाल जळाला तुमच्यासाठी पण काळिज आमचं जळत होतं
आमचे हक्क अधिकार द्या बाकी काही नको
कोणी काय खायचे हे ठरविण्याचा प्रत्येकाला अधिकार
राष्ट्रवाद शी काही घेणेदेणे नाही एक धर्म आणि संस्कृती लादण्याचा प्रयत्न
प्रक्षोभक भाषणं करून आम्हाला निवडणुका लढवायच्या नाहीत तरीही मला आल्या आल्या पोलिसांनी नोटीस दिली
देशातील सर्वांना शिक्षण कसं मिळेल, याचा विचार आम्ही करत आहोत
जातीव्यवस्था देशातून हटवली पाहिजे 
जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न तीव्र होईल, तेव्हा सर्वजण रस्त्यावर उतरतील
जातीवादाविरोधात एकत्र लढाई लढू 
देशात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा का नाही? 
देशातील जातीव्यवस्था नष्ट होऊन प्रत्येकाला समान अधिकार मिळायला हवा.