शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला - कन्हैया कुमार

By admin | Updated: April 24, 2016 19:09 IST

भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोल कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला, सरकारमध्ये आहात, तर जनतेला रोजगार द्यावाच लागेल.'केवळ जाहिरातबाजीवर खर्च करुन योजना यशस्वी होत नाहीत', 'राष्ट्रवाद शब्दामागे ब्राह्मणवादाचा छुपा अजेंडा आहे. अशी टीका मोदी आणि संघावर कन्हैया कुमार केली. तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता.
 
भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोलही त्याने सुनावले. कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले. मातेची अडचण नाही पण कधी रोहित वेमुलांच्या आईला भेटा, त्या आईची वेदना काय असेल जिच्या मुलावर चप्पल भिरकावली जाते, मुलीवर बलात्कार होत आहेत. तुमची संवेदना नष्ट झाली का? असा सवालही त्यांने उपस्थित केला. 
 
नव्या पिढीने यागोष्टी समजून घ्या, योगाला आमचा विरोध नाही पण काय घ्यायचे आणि काय सोडायचे हे पहा असे म्हणत योगगुरु रामदेव बाबावर ही कडकडून टीका केली. देशातील व्यवस्था आणि परंपरा मिठवायची असेल तर पुण्याची पारंपरिक पगडीतील पिवळी पट्टी निळी करा, असे आवाहन कन्हैय्या कुमारनी केले . कन्हैयाच्या हातात कोणत्याही प्रकारचे लिखित भाषण नसल्याचे आढळून आले. कोणत्याही आविर्भावाशिवाय, अभिनिवेशाशिवाय त्याने संपूर्ण भाषण उत्स्फूतपणे केले.
 
अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला आहे. 40-50 गाड्यांच्या ताफ्यासह तो मुंबईहून पुण्यात दाखल झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तुफान गर्दी असून,  पास असलेल्या व्यक्तींनाच सभेला प्रवेश देण्यात आला. परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्रप्त झालं होतं. बालगंधर्व रंगमंदिरातील कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अमोल पालेकर, संध्या गोखले , बाबा आढाव, सिद्धार्थ धेंडे, मुक्ता मनोहर ,किरण मोघे संदीप बर्वे उपस्थित होते. पासशिवाय प्रवेश मिळत नसल्यामुळे बालगंधर्व च्या गेटवर तरूणांची घोषणाबाजी केली. 
 
 
 
कन्हैया कुमारच्या भाषाणातील ठळक मुद्दे - 
मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला - 
जेवढे रोहित माराल, तेवढे रोहित जन्माला येतील
आज चर्चा आयडेंटिटी चे राजकारण करत आहात पण आम्ही जात संपवायूला निघालो आहोत सर्वाना समान अधिकार मिळवा
मला भीती दाखवण्याच सोडा, मा कोणालाही घाबरत नाही 
मोदींनी ट्विट करुन सांगीतले की ग्रामीण भागाला टेक्नॉंलॉजीने जोडणार, पण या टेक्नॉलॉजीला दुष्काळाशी जोडा अस मी म्हणेल
पोलीसांची ठेकेदारी केली आता संसदेची पण करा 
विमानात जे काही झाले त्याबद्दल पोलीस खोट बोलत आहेत
असं तंत्रज्ञान बनवा, ज्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ दूर होईल 
जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न तीव्र होईल, तेव्हा सर्वजण रस्त्यावर उतरतील 
कोणाचा सौदा करीत आहेत प्रश्न उपस्थित केला तर हल्ले केले जातात हेच राजकारण आहे
तुम्ही नाव बदला आम्ही समाज बदलतो
मेक इन इंडियाचा पेंडाल जळाला तुमच्यासाठी पण काळिज आमचं जळत होतं
आमचे हक्क अधिकार द्या बाकी काही नको
कोणी काय खायचे हे ठरविण्याचा प्रत्येकाला अधिकार
राष्ट्रवाद शी काही घेणेदेणे नाही एक धर्म आणि संस्कृती लादण्याचा प्रयत्न
प्रक्षोभक भाषणं करून आम्हाला निवडणुका लढवायच्या नाहीत तरीही मला आल्या आल्या पोलिसांनी नोटीस दिली
देशातील सर्वांना शिक्षण कसं मिळेल, याचा विचार आम्ही करत आहोत
जातीव्यवस्था देशातून हटवली पाहिजे 
जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न तीव्र होईल, तेव्हा सर्वजण रस्त्यावर उतरतील
जातीवादाविरोधात एकत्र लढाई लढू 
देशात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा का नाही? 
देशातील जातीव्यवस्था नष्ट होऊन प्रत्येकाला समान अधिकार मिळायला हवा.