शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

‘मोदी, फडणवीस जवाब द्या...’

By admin | Updated: May 23, 2015 00:30 IST

‘माकप’चा धडक मोर्चा : सत्तेवर आल्यानंतर सामान्यांसाठी केले काय ?

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची सत्तेवर आल्यानंतर काय पूर्तता केली? याची विचारणा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘मोदी, फडणवीस जबाब द्या...!’ असा धडक मोर्चा काढून भाजप सरकारला इशारा दिला. दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना कधी अटक करणार?, कोल्हापूरचा टोल कधी रद्द करणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला.दसरा चौकात सकाळी अकरापासून आंदोलक जमत होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आले होते. त्यामध्ये ऊस तोडणी कामगार संघटना, शालेय पोषण आहार कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटनेसह पक्षाशी संलग्न अन्य संघटनांचाही समावेश होता.पक्षाचे राज्य समिती सदस्य चंद्रकांत यादव, डॉ. सुभाष जाधव, जिल्हा समिती सदस्य डॉ. उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही मोर्चात आंदोलकांची विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. पक्षाचे झेंडे आणि संलग्न संघटनांचे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.‘भाजप सरकारचा धिक्कार असो...’, ‘मोदी, फडणवीस सत्तेवर आल्यानंतर केले काय?...’अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी या मार्गावरून बालगोपाल तालीम परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थितांसमोर मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर समारोप झाला.निवेदनातील मागण्या अशा, एक वर्ष झाले किती काळा पैसा परत आणला, गरिबांसाठी महागाई कमी का केली नाही, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कधी अटक करणार, देवेंद्र फडणवीस यांनी उचगावच्या सभेत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा सरकार कधी पूर्ण करणार?डिझेल, पेट्रोल भाव दररोज का वाढत आहेत, रेशनचं धान्य बंद करून आमचा जगायचा हक्कही काढून का घेता, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार, औषध महाग केलं जगायचं कसं, तरुणांना रोजगार केव्हा देणार, नगरपालिका, महापालिका, राज्य सरकारचा कर गोळा करायचा अधिकार काढून फक्त केंद्राच्या हातात का देत आहात, महाराष्ट्रातील मुस्लिमांचे कायदेशीर आरक्षण का काढून घेतले, गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा करून कोणत्या जातीला खूश करता आहात, यंत्रमाग कामगारांना किमान वेतन का देत नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर का देत नाही, शेतमजुरांचे महामंडळ केव्हा स्थापन होणार, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात प्रा. आबासाहेब चौगले, आनंदराव चव्हाण, प्राचार्य ए. बी. पाटील, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष निकम, अप्पा परीट, जयंत बलुगडे, विकास पाटील, चंद्रकला मगदूम, शिवाजी मगदूम, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)