शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

‘मोदी, फडणवीस जवाब द्या...’

By admin | Updated: May 23, 2015 00:30 IST

‘माकप’चा धडक मोर्चा : सत्तेवर आल्यानंतर सामान्यांसाठी केले काय ?

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची सत्तेवर आल्यानंतर काय पूर्तता केली? याची विचारणा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘मोदी, फडणवीस जबाब द्या...!’ असा धडक मोर्चा काढून भाजप सरकारला इशारा दिला. दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना कधी अटक करणार?, कोल्हापूरचा टोल कधी रद्द करणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला.दसरा चौकात सकाळी अकरापासून आंदोलक जमत होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आले होते. त्यामध्ये ऊस तोडणी कामगार संघटना, शालेय पोषण आहार कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटनेसह पक्षाशी संलग्न अन्य संघटनांचाही समावेश होता.पक्षाचे राज्य समिती सदस्य चंद्रकांत यादव, डॉ. सुभाष जाधव, जिल्हा समिती सदस्य डॉ. उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही मोर्चात आंदोलकांची विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. पक्षाचे झेंडे आणि संलग्न संघटनांचे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.‘भाजप सरकारचा धिक्कार असो...’, ‘मोदी, फडणवीस सत्तेवर आल्यानंतर केले काय?...’अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी या मार्गावरून बालगोपाल तालीम परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थितांसमोर मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर समारोप झाला.निवेदनातील मागण्या अशा, एक वर्ष झाले किती काळा पैसा परत आणला, गरिबांसाठी महागाई कमी का केली नाही, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कधी अटक करणार, देवेंद्र फडणवीस यांनी उचगावच्या सभेत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा सरकार कधी पूर्ण करणार?डिझेल, पेट्रोल भाव दररोज का वाढत आहेत, रेशनचं धान्य बंद करून आमचा जगायचा हक्कही काढून का घेता, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार, औषध महाग केलं जगायचं कसं, तरुणांना रोजगार केव्हा देणार, नगरपालिका, महापालिका, राज्य सरकारचा कर गोळा करायचा अधिकार काढून फक्त केंद्राच्या हातात का देत आहात, महाराष्ट्रातील मुस्लिमांचे कायदेशीर आरक्षण का काढून घेतले, गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा करून कोणत्या जातीला खूश करता आहात, यंत्रमाग कामगारांना किमान वेतन का देत नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर का देत नाही, शेतमजुरांचे महामंडळ केव्हा स्थापन होणार, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात प्रा. आबासाहेब चौगले, आनंदराव चव्हाण, प्राचार्य ए. बी. पाटील, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष निकम, अप्पा परीट, जयंत बलुगडे, विकास पाटील, चंद्रकला मगदूम, शिवाजी मगदूम, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)