शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी, फडणवीस जवाब द्या...’

By admin | Updated: May 23, 2015 00:30 IST

‘माकप’चा धडक मोर्चा : सत्तेवर आल्यानंतर सामान्यांसाठी केले काय ?

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची सत्तेवर आल्यानंतर काय पूर्तता केली? याची विचारणा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘मोदी, फडणवीस जबाब द्या...!’ असा धडक मोर्चा काढून भाजप सरकारला इशारा दिला. दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना कधी अटक करणार?, कोल्हापूरचा टोल कधी रद्द करणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला.दसरा चौकात सकाळी अकरापासून आंदोलक जमत होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आले होते. त्यामध्ये ऊस तोडणी कामगार संघटना, शालेय पोषण आहार कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटनेसह पक्षाशी संलग्न अन्य संघटनांचाही समावेश होता.पक्षाचे राज्य समिती सदस्य चंद्रकांत यादव, डॉ. सुभाष जाधव, जिल्हा समिती सदस्य डॉ. उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही मोर्चात आंदोलकांची विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. पक्षाचे झेंडे आणि संलग्न संघटनांचे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.‘भाजप सरकारचा धिक्कार असो...’, ‘मोदी, फडणवीस सत्तेवर आल्यानंतर केले काय?...’अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी या मार्गावरून बालगोपाल तालीम परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थितांसमोर मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर समारोप झाला.निवेदनातील मागण्या अशा, एक वर्ष झाले किती काळा पैसा परत आणला, गरिबांसाठी महागाई कमी का केली नाही, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कधी अटक करणार, देवेंद्र फडणवीस यांनी उचगावच्या सभेत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा सरकार कधी पूर्ण करणार?डिझेल, पेट्रोल भाव दररोज का वाढत आहेत, रेशनचं धान्य बंद करून आमचा जगायचा हक्कही काढून का घेता, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार, औषध महाग केलं जगायचं कसं, तरुणांना रोजगार केव्हा देणार, नगरपालिका, महापालिका, राज्य सरकारचा कर गोळा करायचा अधिकार काढून फक्त केंद्राच्या हातात का देत आहात, महाराष्ट्रातील मुस्लिमांचे कायदेशीर आरक्षण का काढून घेतले, गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा करून कोणत्या जातीला खूश करता आहात, यंत्रमाग कामगारांना किमान वेतन का देत नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर का देत नाही, शेतमजुरांचे महामंडळ केव्हा स्थापन होणार, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात प्रा. आबासाहेब चौगले, आनंदराव चव्हाण, प्राचार्य ए. बी. पाटील, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष निकम, अप्पा परीट, जयंत बलुगडे, विकास पाटील, चंद्रकला मगदूम, शिवाजी मगदूम, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)