शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

‘मोदी, फडणवीस जवाब द्या...’

By admin | Updated: May 23, 2015 00:30 IST

‘माकप’चा धडक मोर्चा : सत्तेवर आल्यानंतर सामान्यांसाठी केले काय ?

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची सत्तेवर आल्यानंतर काय पूर्तता केली? याची विचारणा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘मोदी, फडणवीस जबाब द्या...!’ असा धडक मोर्चा काढून भाजप सरकारला इशारा दिला. दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना कधी अटक करणार?, कोल्हापूरचा टोल कधी रद्द करणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला.दसरा चौकात सकाळी अकरापासून आंदोलक जमत होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आले होते. त्यामध्ये ऊस तोडणी कामगार संघटना, शालेय पोषण आहार कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटनेसह पक्षाशी संलग्न अन्य संघटनांचाही समावेश होता.पक्षाचे राज्य समिती सदस्य चंद्रकांत यादव, डॉ. सुभाष जाधव, जिल्हा समिती सदस्य डॉ. उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही मोर्चात आंदोलकांची विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. पक्षाचे झेंडे आणि संलग्न संघटनांचे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.‘भाजप सरकारचा धिक्कार असो...’, ‘मोदी, फडणवीस सत्तेवर आल्यानंतर केले काय?...’अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी या मार्गावरून बालगोपाल तालीम परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थितांसमोर मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर समारोप झाला.निवेदनातील मागण्या अशा, एक वर्ष झाले किती काळा पैसा परत आणला, गरिबांसाठी महागाई कमी का केली नाही, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कधी अटक करणार, देवेंद्र फडणवीस यांनी उचगावच्या सभेत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा सरकार कधी पूर्ण करणार?डिझेल, पेट्रोल भाव दररोज का वाढत आहेत, रेशनचं धान्य बंद करून आमचा जगायचा हक्कही काढून का घेता, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार, औषध महाग केलं जगायचं कसं, तरुणांना रोजगार केव्हा देणार, नगरपालिका, महापालिका, राज्य सरकारचा कर गोळा करायचा अधिकार काढून फक्त केंद्राच्या हातात का देत आहात, महाराष्ट्रातील मुस्लिमांचे कायदेशीर आरक्षण का काढून घेतले, गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा करून कोणत्या जातीला खूश करता आहात, यंत्रमाग कामगारांना किमान वेतन का देत नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर का देत नाही, शेतमजुरांचे महामंडळ केव्हा स्थापन होणार, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात प्रा. आबासाहेब चौगले, आनंदराव चव्हाण, प्राचार्य ए. बी. पाटील, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष निकम, अप्पा परीट, जयंत बलुगडे, विकास पाटील, चंद्रकला मगदूम, शिवाजी मगदूम, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)