शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मोदी देशाचे नव्हे, द्वेषाचे राजकारण करतायत

By admin | Updated: October 12, 2014 23:32 IST

पृथ्वीराज चव्हाण : यशवंतराव मोहितेंचा फोटो मोदींच्या बरोबरीने लावणे अयोग्य

कऱ्हाड : ‘नरेंद्र मोदी देशाचे नाही, तर द्वेषाचे राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या पक्षाच्या मूळ विचाराला विरोध करण्यात यशवंतराव मोहितेंनी आयुष्यभर लढाई केली. परंतु तोच विचार या विभागात पुन्हा रुजवण्याचा खटाटोप सुरू आहे; पण कृष्णाकाठची जनता ही झूल अंगावर कदापिही घेणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ‘निवडून येण्याकरिता ही माणसे यशवंतराव मोहिते यांचा फोटो मोदींच्या बरोबरीने लावत आहेत. हे बरोबर नाही. भाऊंसारख्या थोर व्यक्तीच्या आत्म्याला काय वाटत असेल,’ असेही त्यांनी सांगितले.रेठरे बुद्रुक येथील जाहीर सभेत ते बोलत होते. विलासराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय काँगे्रसचे सचिव स्वराज वाल्मीक, सरचिटणीस सुरेश कुराडे, आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, जयवंत जगताप, आदित्य मोहिते, विकी मोहिते, उत्तमराव मोहिते, जनता बँकेचे संचालक शंकरराव पाटील, वि. तु. सुकरे, पै. धनाजी पाटील-आटकेकर, शेरेचे सरपंच मोहनराव निकम, राजेंद्र बामणे, मारुती निकम, बबनराव दमामे आदींची उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘या निवडणुकीत फारसे वैचारिक मंथन झाले नाही. एकमेकांवर टीका झाली. निवडणूक म्हणजे वैचारिक मंथन व्हायला हवे. त्यातून सत्ता कुणाकडे द्यायची, हे ठरले पाहिजे. तत्त्वासाठी यशवंतराव मोहिते व आनंदराव चव्हाण यांनी वेगळा विचार मांडला. त्यांना यशवंतराव चव्हाणांनी काँगे्रसच्या मूळ प्रवाहात आणले. त्यानंतर डावा विचार घेऊन काँगे्रस राज्याच्या विकासात कायम पुढे राहिली. यशवंतराव मोहितेंच्या घरातून एखादा त्यांच्या विचाराला तिलांजली देऊन जातीयवादी पक्षांच्या बाजूने तुमच्यापुढे येत आहे. ते विचार झुगारा. संयुुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी जातीयवादी शक्तींना जी उद्दिष्ट्य साध्य करायची होती, ती आता साध्य करण्यासाठी शहा व मोदींची धडपड सुरू आहे.’ मदनराव मोहिते म्हणाले, ‘यशवंतराव मोहितेंना उद्घाटनांचा शौक नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांनाही तो नाही. पण, दक्षिणमध्ये कासवाच्या गतीने झालेल्या विकासाचा विद्यमान आमदार डंका पिटत आहेत. विकास हरणाच्या गतीने आवश्यक आहे. ती गती पृथ्वीराज चव्हाणांकडे आहे. त्यांनी गावाला अकरा कोटी विकासासाठी दिले. चोवीस तास पाणी योजना दिली. पण, त्याचे काम सुरू होत नाही. भोसले पिता-पुत्र मिनरल वॉटर पितात. गाव मात्र दूषित पाणी पिते.’पै. धनाजी पाटील म्हणाले, ‘माझे कुटुंब ज्यांनी भरल्या ताटावरून उठवले त्यांचे प्रायश्चित्त त्यांना मिळालेच पाहिजे.’ स्वराज वाल्मीक, सुरेश कुराडे, शंकरराव गोडसे यांची भाषणे झाली. सुहास मोहिते, कृष्णत पवार यांनी सूत्रसंचालन केले. मोहन पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘अच्छे दिन’ आले का?‘भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नाही़ गडकरी, जावडेकर, फडणवीस यांच्या हातात जनता महाराष्ट्र जाऊ देणार नाही़ नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे, हा प्रश्न पडतो़ आज देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ मोदींचे ‘अच्छे दिन’ येणार होते, त्याचं काय झालं? मोदींनी १०० दिवसांत काळा पैसा परत भारतात आणणार, असे सांगितले होते; पण १०० रुपयेसुद्धा आले नाहीत,’ असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी पाटण मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हिंदुराव पाटील यांच्या प्रचारार्थ ढेबेवाडी येथे आयोजित सभेत लगावला. महाराष्ट्रातच राहणार ‘मी लोकसभा व राज्यसभेवर खासदार होतो, पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणूनही मी काम पाहिले़ त्यासाठी दिल्लीत राहावं लागतं, गल्लीत नव्हे़ पण, मी आता चार वर्षे झाले महाराष्ट्राच्या राजकारणात आहे़ अन् राज्याच्या राजकारणातच राहणार आहे़ विरोधकांनी चुकीची टीका करण्यापेक्षा विकासाचे बोलावे,’ असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथील शनिवार पेठेत आयोजित सभेत व्यक्त केले.