शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदी देशाचे नव्हे, द्वेषाचे राजकारण करतायत

By admin | Updated: October 12, 2014 23:32 IST

पृथ्वीराज चव्हाण : यशवंतराव मोहितेंचा फोटो मोदींच्या बरोबरीने लावणे अयोग्य

कऱ्हाड : ‘नरेंद्र मोदी देशाचे नाही, तर द्वेषाचे राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या पक्षाच्या मूळ विचाराला विरोध करण्यात यशवंतराव मोहितेंनी आयुष्यभर लढाई केली. परंतु तोच विचार या विभागात पुन्हा रुजवण्याचा खटाटोप सुरू आहे; पण कृष्णाकाठची जनता ही झूल अंगावर कदापिही घेणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ‘निवडून येण्याकरिता ही माणसे यशवंतराव मोहिते यांचा फोटो मोदींच्या बरोबरीने लावत आहेत. हे बरोबर नाही. भाऊंसारख्या थोर व्यक्तीच्या आत्म्याला काय वाटत असेल,’ असेही त्यांनी सांगितले.रेठरे बुद्रुक येथील जाहीर सभेत ते बोलत होते. विलासराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय काँगे्रसचे सचिव स्वराज वाल्मीक, सरचिटणीस सुरेश कुराडे, आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, जयवंत जगताप, आदित्य मोहिते, विकी मोहिते, उत्तमराव मोहिते, जनता बँकेचे संचालक शंकरराव पाटील, वि. तु. सुकरे, पै. धनाजी पाटील-आटकेकर, शेरेचे सरपंच मोहनराव निकम, राजेंद्र बामणे, मारुती निकम, बबनराव दमामे आदींची उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘या निवडणुकीत फारसे वैचारिक मंथन झाले नाही. एकमेकांवर टीका झाली. निवडणूक म्हणजे वैचारिक मंथन व्हायला हवे. त्यातून सत्ता कुणाकडे द्यायची, हे ठरले पाहिजे. तत्त्वासाठी यशवंतराव मोहिते व आनंदराव चव्हाण यांनी वेगळा विचार मांडला. त्यांना यशवंतराव चव्हाणांनी काँगे्रसच्या मूळ प्रवाहात आणले. त्यानंतर डावा विचार घेऊन काँगे्रस राज्याच्या विकासात कायम पुढे राहिली. यशवंतराव मोहितेंच्या घरातून एखादा त्यांच्या विचाराला तिलांजली देऊन जातीयवादी पक्षांच्या बाजूने तुमच्यापुढे येत आहे. ते विचार झुगारा. संयुुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी जातीयवादी शक्तींना जी उद्दिष्ट्य साध्य करायची होती, ती आता साध्य करण्यासाठी शहा व मोदींची धडपड सुरू आहे.’ मदनराव मोहिते म्हणाले, ‘यशवंतराव मोहितेंना उद्घाटनांचा शौक नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांनाही तो नाही. पण, दक्षिणमध्ये कासवाच्या गतीने झालेल्या विकासाचा विद्यमान आमदार डंका पिटत आहेत. विकास हरणाच्या गतीने आवश्यक आहे. ती गती पृथ्वीराज चव्हाणांकडे आहे. त्यांनी गावाला अकरा कोटी विकासासाठी दिले. चोवीस तास पाणी योजना दिली. पण, त्याचे काम सुरू होत नाही. भोसले पिता-पुत्र मिनरल वॉटर पितात. गाव मात्र दूषित पाणी पिते.’पै. धनाजी पाटील म्हणाले, ‘माझे कुटुंब ज्यांनी भरल्या ताटावरून उठवले त्यांचे प्रायश्चित्त त्यांना मिळालेच पाहिजे.’ स्वराज वाल्मीक, सुरेश कुराडे, शंकरराव गोडसे यांची भाषणे झाली. सुहास मोहिते, कृष्णत पवार यांनी सूत्रसंचालन केले. मोहन पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘अच्छे दिन’ आले का?‘भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नाही़ गडकरी, जावडेकर, फडणवीस यांच्या हातात जनता महाराष्ट्र जाऊ देणार नाही़ नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे, हा प्रश्न पडतो़ आज देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ मोदींचे ‘अच्छे दिन’ येणार होते, त्याचं काय झालं? मोदींनी १०० दिवसांत काळा पैसा परत भारतात आणणार, असे सांगितले होते; पण १०० रुपयेसुद्धा आले नाहीत,’ असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी पाटण मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हिंदुराव पाटील यांच्या प्रचारार्थ ढेबेवाडी येथे आयोजित सभेत लगावला. महाराष्ट्रातच राहणार ‘मी लोकसभा व राज्यसभेवर खासदार होतो, पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणूनही मी काम पाहिले़ त्यासाठी दिल्लीत राहावं लागतं, गल्लीत नव्हे़ पण, मी आता चार वर्षे झाले महाराष्ट्राच्या राजकारणात आहे़ अन् राज्याच्या राजकारणातच राहणार आहे़ विरोधकांनी चुकीची टीका करण्यापेक्षा विकासाचे बोलावे,’ असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथील शनिवार पेठेत आयोजित सभेत व्यक्त केले.