शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार

By admin | Updated: September 2, 2014 03:20 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ आज हुतात्मा चौकापासून झाला. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.  भाजपा-शिवसेनेसारख्या जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्याचे आवाहन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वेळी केले. 
 54 मशाली पेटवून त्या जिल्ह्याजिल्ह्यात रवाना करण्यात आल्या. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणो, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आदी नेते, काँग्रेसचे मंत्री, अ. भा. काँग्रेसचे सहप्रभारी बालाराम बच्चन, श्योराज जीवन वाल्मिकी, पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्ह्याजिल्ह्यातून आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील वीज संकट दूर करण्याबाबत केंद्र सरकार गंभीर नाही. गणोशोत्सवाच्या काळात वीज भारनियमन सुरू करावे लागेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे केंद्रात ऊर्जामंत्री असताना वीज संकट दूर करण्याची केंद्राची भूमिका होती. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा मिळावा, याची दक्षता घेतली जायची. आता केंद्र सरकारने याबाबत लक्ष घातले नाहीतर महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील अनेक राज्यांसमोर विजेचे संकट उभे ठाकेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
आपण ऊर्जामंत्री असताना विविध राज्यांशी समन्वय साधून वीज उत्पादनावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत होतो, असे ते शिंदे यांनी या वेळी सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या हुतात्मा स्मारकापासून प्रचाराला प्रारंभ करून काँग्रेसने विदर्भवाद्यांना सूचक इशारा दिला. ‘काँग्रेस राज्याच्या विभाजनाच्या बाजूने नाही. आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे काँग्रेसच्या विधानसभा प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणो म्हणाले. 
साईबाबा हे देशातील कोटय़वधी जनतेचे श्रद्धास्थान आहेत पण त्यांच्याविषयी वाद निर्माण करणा:या प्रवृत्तींपासून सावध राहा. राज्य जातीयवाद्यांच्या हातात जाणार 
नाही याची दक्षता घ्या, असे 
आवाहन अशोक चव्हाण यांनी 
केले. आघाडीच्या मुद्दय़ावर गोंधळ निर्माण करू नका. आम्हाला 
आघाडी हवी आहे पण आम्हाला फार काळ ताटकळत ठेवू नका, असा इशारा माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.  
(विशेष प्रतिनिधी)
 
मोदी सरकार महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहे. भाजपावाले महाराष्ट्र सरकारला त्रस देण्याची भूमिका घेत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.
 
मुंबईत हुतात्मा स्मारकासमोर मशाल प्रज्वलित करून प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा सोमवारी प्रारंभ केला. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणो आदी.