शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मोदी भांडवलदारांचे हितरक्षक

By admin | Updated: January 19, 2015 00:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे हितरक्षक म्हणून काम करीत आहेत. अदानी-अंबानींना लाभ पोहोचवणारे आर्थिक धोरण देशात राबविले जात आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे

भाकप राष्ट्रीय समितीची बैठक : ज्येष्ठ नेते सुधाकर रेड्डी यांची टीका नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे हितरक्षक म्हणून काम करीत आहेत. अदानी-अंबानींना लाभ पोहोचवणारे आर्थिक धोरण देशात राबविले जात आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी व माजी खासदार सुधाकर रेड्डी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. तसेच केंद्र सरकारच्या भांडवलदारी आर्थिक धोरणाविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा शंखनादही केला. तीन दिवसांपासून येथील आमदार निवासात सुरू असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीचा रविवारी समारोप करण्यात आला. यासंबंधात माहिती देतांना ते पत्रकारांशी बोलत होते. शुक्रवारी प्रथम राष्ट्रीय समितीची व त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. शनिवारी व रविवारी या बैठकीत पक्षाच्या राजकीय ठरावाच्या मसुद्यावर विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी चर्चा केली. २५ राज्यातून आलेल्या ३५ प्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेतला. चर्चेनंतर राजकीय ठरावाचा मसुदा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात सत्तारुढ होताच देशात कार्पोरेट हाऊसेसचे महत्त्व वाढले. जागतिक स्तरावरील आर्थिक क्षेत्रातील एका आघाडीच्या संस्थेने भारतासंदंर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार मागील काही वर्षांत भारतातील ६३८ लोकांची संपत्ती सर्वाधिक वाढलेली आहे तर २ हजार लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे. उर्वरित कोट्यवधी लोकांना याचा कुठलाही लाभ मिळालेला नाही. एकीकडे संपत्तीत वाढ झाली परंतु दुसरीकडे संपत्तीचे संतुलित वितरण झाले नाही. देशाचा विकास केवळ जीडीपीवर अवलंबून नसतो तर मानवीय विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. परंतु याच विचार सरकार करताना दिसत नाही. ‘कंट्रोल आॅफ प्राईसेस’, ‘ब्लॅकमनी’ आणि विकास या मुद्यावर मोदी सत्तेवर आले. परंतु या गोष्टी सोडून ते सर्वकाही करीत आहेत. ब्लॅकमनी असणाऱ्या लोकांची नावे सांगितली जात नाही. मोदींनी एकप्रकारे देशाचा अवमान केला आहे. एकूणच केंद्र सरकारचे भांडवलदारी धोरण, खासगीकरण, एफडीआय, भूसंपादन कायदा, आदींविरोधात देशात असंतोषाचे वातावरण आहे. डाव्या आघाडींच्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय समितीचे सदस्य शमीम फैजी, खा. डी. राजा, ज्येष्ठ नेते मनोहर देशकर,आणि अजय साहू उपस्थित होते. (प्रतिनिधी)३० जानेवारीला राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना दिन पाळणार सध्या देशात महात्मा गांधीजींच्या ऐवजी नाथुराम गोडसेंचा उदोउदो करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हा प्रकार देशाच्या सांप्रदायिक एकतेला धोकादायक आहे. त्यामुळे विविध संप्रदायांची एकता टिकवून ठेवण्यासाठी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीदिनानिमित्त येत्या ३० जानेवारी रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष देशभरात राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना दिवस पाळणार असल्याचे सुधाकर रेड्डी यांनी सांगितले. भूसंपादनाचा अध्यादेश परत घेण्यासह चार प्रस्ताव मंजूर केंद्र सरकारने भूसंपादनाचा अध्यादेश काढला. हा अध्यादेश शेतकऱ्यांना मारक असून तो परत घेण्यात यावा, या मागणीसह एकूण चार ठराव तीन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर पारित करण्यात आले. यासोबतच मध्य प्रदेशातील अनुपपूर येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा जाहीर निषेधाचा ठराव, तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांचे समर्थन करीत त्यांना त्रास देणाऱ्या हिंदुत्ववादी शक्तींचा विरोधाचा ठराव आणि पेट्रोल आणि डिझेलच्या जागतिक किमतीत कमतरता आली असल्याने देशातील पेट्रोलच्या किमतीतही कमतरता करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. धार्मिक उन्माद धोकादायक देशात सध्या धार्मिक उन्माद सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील इतर संघटना हिंदू राष्ट्रांची संकल्पना मांडत आहेत. ते योग्य नाही. हिंदूराष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्यांनी अगोदर पाकिस्तानचे उदाहरण समोर ठेवावे. पाकिस्तानची निर्मिती सुद्धा धार्मिक राष्ट्र म्हणून झाली. परंतु त्यांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच वाढलेल्या आहेत, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते शमीम फैजी यांनी स्पष्ट केले.