शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

मोदी स्वस्त पंतप्रधान

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

नारायण राणेंची टीका : मालवणात प्रचाराची सांगता

मालवण : देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्याप्रमाणे वागत आहेत. देशाच्या आजवरच्या इतिहासात त्यांच्याइतका स्वस्त पंतप्रधान कुणीही पाहिला नसेल. देशाचा कारभार सोडून त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी २५ हून अधिक सभा घेतल्या. अगोदर खोटी स्वप्ने दाखवून देशाची सत्ता मिळविली. मोदी आता महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा मोदींचा डाव आहे. गुजरातचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी धडपडत आहेत. मोदींचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी संपली. या निमित्ताने काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख असलेल्या नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणात जाहीर सभा घेत काँग्रेसच्या प्रचाराचा समारोप केला.महाराष्ट्राच्या अस्मितेला हातनरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घातला आहे. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी कारस्थाने सुरु केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता जागी झाली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. यामुळेच मुुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना रिझर्व्ह बँकेची कार्यालये दिल्लीला हलविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यांना ते जमले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कासार्डे येथील सभेवरही राणे यांनी टीका केली. मोदींची अनेक भाषणे मी पाहिलीत. मात्र आजच्या भाषणाची दखल घ्यावी असे मला वाटत नाही असे राणे म्हणाले. मोदींच्या सभेला गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली येथून माणसे गोळा करण्यात आली होती. सगळी मिळून सभेला २५ हजार माणसे गोळा झाली होती. ती सुद्धा पैसे देऊन गर्दी जमविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)शिवसेनेवर टीकामुख्यमंत्री पदासाठी २५ वर्षांपासूनची युती सेना भाजपाने तोडल्याचे राणे म्हणाले. या दोघांमध्ये एकही व्यक्ती मुख्यमंत्री होण्याच्या लायक नाही. उद्धव ठाकरेंनी कधी विधानसभा पाहिली नाही. ते मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पहात आहेत. शिवसेनेच्या एकाही खासदारामध्ये साधे ५ मिनिटे मराठीतून भाषण करण्याचे धाडस नाही. विधानसभेला शिवसेनेने दिलेले उमेदवार वैभव नाईक नगरपालिकेमध्ये कधी दोन मिनिटे बोलू शकला नाही. २०० मिली तेल वाटून आमदार बनता येत नाही. त्यासाठी वैचारिक पातळी असावी लागते.