शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

मोदी स्वस्त पंतप्रधान

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

नारायण राणेंची टीका : मालवणात प्रचाराची सांगता

मालवण : देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्याप्रमाणे वागत आहेत. देशाच्या आजवरच्या इतिहासात त्यांच्याइतका स्वस्त पंतप्रधान कुणीही पाहिला नसेल. देशाचा कारभार सोडून त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी २५ हून अधिक सभा घेतल्या. अगोदर खोटी स्वप्ने दाखवून देशाची सत्ता मिळविली. मोदी आता महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा मोदींचा डाव आहे. गुजरातचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी धडपडत आहेत. मोदींचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी संपली. या निमित्ताने काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख असलेल्या नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणात जाहीर सभा घेत काँग्रेसच्या प्रचाराचा समारोप केला.महाराष्ट्राच्या अस्मितेला हातनरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घातला आहे. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी कारस्थाने सुरु केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता जागी झाली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. यामुळेच मुुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना रिझर्व्ह बँकेची कार्यालये दिल्लीला हलविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यांना ते जमले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कासार्डे येथील सभेवरही राणे यांनी टीका केली. मोदींची अनेक भाषणे मी पाहिलीत. मात्र आजच्या भाषणाची दखल घ्यावी असे मला वाटत नाही असे राणे म्हणाले. मोदींच्या सभेला गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली येथून माणसे गोळा करण्यात आली होती. सगळी मिळून सभेला २५ हजार माणसे गोळा झाली होती. ती सुद्धा पैसे देऊन गर्दी जमविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)शिवसेनेवर टीकामुख्यमंत्री पदासाठी २५ वर्षांपासूनची युती सेना भाजपाने तोडल्याचे राणे म्हणाले. या दोघांमध्ये एकही व्यक्ती मुख्यमंत्री होण्याच्या लायक नाही. उद्धव ठाकरेंनी कधी विधानसभा पाहिली नाही. ते मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पहात आहेत. शिवसेनेच्या एकाही खासदारामध्ये साधे ५ मिनिटे मराठीतून भाषण करण्याचे धाडस नाही. विधानसभेला शिवसेनेने दिलेले उमेदवार वैभव नाईक नगरपालिकेमध्ये कधी दोन मिनिटे बोलू शकला नाही. २०० मिली तेल वाटून आमदार बनता येत नाही. त्यासाठी वैचारिक पातळी असावी लागते.