शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

मोदी ‘नीति’मुळे फटका

By admin | Updated: July 18, 2015 02:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळून नीति आयोगाची स्थापना केल्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत घसघशीत वाढ झाल्याचा दावा केला गेला असला

- संदीप प्रधान,  मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळून नीति आयोगाची स्थापना केल्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत घसघशीत वाढ झाल्याचा दावा केला गेला असला, तरी प्रत्यक्षात २० योजनांमधील राज्याचा हिस्सा ५० टक्के केल्याने आणि २६ योजनांकरिता निधी देणे केंद्राने बंद केल्याने राज्याला मिळणाऱ्या निधीत ३ हजार ५६४ कोटी रुपयांची घट झाली आहे. राज्यातील सरकार बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत असताना मोदी नीतीचा बसलेला फटका राज्याला डोकेदुखी ठरू शकतो. सीएसएस योजनेंतर्गत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारा निधी २०१४-१५ या वर्षात १०,८३३.६३ कोटी रुपये इतका प्राप्त झाला. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ७,२६८.९३ कोटी इतका प्राप्त होणार आहे. निधीतील ही घट ३,५६४.७० कोटी रुपये आहे. मात्र त्याचवेळी वित्त आयोगाकडून महाराष्ट्राला २,९०६१.९४ कोटी रुपये मिळणार असल्याने राज्याला ५,२८४.१६ कोटी रुपये अतिरिक्त निधी प्राप्त होणार असल्याचा दावा केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने केला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राने वित्त आयोगामार्फत देऊ केलेल्या रकमेत वाढ केली असली तरी केंद्रीय अर्थसाहाय्यावरील बहुतांश योजनांमधील राज्याचा हिस्सा जो पूर्वी केवळ २०% होता तो ५०% केल्याने राज्यावरील बोजा किती वाढेल ते स्पष्ट झालेले नाही. ३४ योजनांना केंद्र सरकार यापूर्वी देत होता तेवढा निधी देणार आहे. २० योजनांकरिता राज्याचा वाटा २० टक्क्यांवरून ५० टक्के झाल्याने यापूर्वी या योजनांवर देशपातळीवर १ लाख ३८ हजार कोटी रुपये खर्च करणारे केंद्र सरकार ७८ हजार २३० कोटी रुपये खर्च करील. २६ योजनांना निधी देणे सरकारने पूर्णपणे बंद केले आहे. त्याचबरोबर गाडगीळ-मुखर्जी सूत्रानुसार योजनांतर्गत योजना चालवण्याकरिता दिला जाणारा निधी बंद केल्याने राज्याला किती पैसे द्यावे लागतील याचा अंदाज आला नसल्याने केंद्रीय अर्थ खात्याचा महाराष्ट्राला ५,२८४. १६ कोटी रुपये अतिरिक्त प्राप्त होतील हा दावा फोल ठरु शकतो, असे राज्य सरकारच्या अर्थ खात्याला वाटते. ३४ योजनांना केंद्र सरकार यापूर्वी देत होता तेवढा निधी देणार आहे. २० योजनांकरिता राज्याचा वाटा २० टक्क्यांवरून ५० टक्के झाल्याने यापूर्वी या योजनांवर देशपातळीवर १ लाख ३८ हजार कोटी रुपये खर्च करणारे केंद्र सरकार ७८ हजार २३० कोटी रुपये खर्च करील.मिळालेल्या योजना राज्याला हिस्सा ५० % झालेल्या योजना-राष्ट्रीय कृषी विकास योजना-राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम-स्वच्छ भारत अभियान-राष्ट्रीय आरोग्य मिशन-सर्व शिक्षा अभियान-जलयुक्त शिवार योजना-राष्ट्रीय ग्रामीण माध्यान्ह भोजन योजना-इंदिरा आवास योजनाकेंद्र सरकारने निधी देणे बंद केलेल्या योजना-राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान-मागास विभाग विकास निधी-राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स प्लान-पोलीस दलाचे आधुनिकीकरण-६००० आदर्श शाळांची उभारणी-राष्ट्रीय अन्न प्रक्रिया मिशनकोणत्या योजनेकरिता केंद्र सरकार किती निधी देणार त्याबाबत स्पष्टता नाही. जोपर्यंत याबाबतचे निर्देश येत नाहीत तोपर्यंत किती रक्कम कमी झाली किंवा वाढली त्याचा हिशेब करता येणार नाही. कृषी, राष्ट्रीय आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियान अशा वेगवेगळ््या योजनांकरिता केंद्र किती निधी देणार ते स्पष्ट नाही. सध्या महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीचे प्रमाण ३२ टक्क्यांवरून ४२ टक्के झाले आहे, एवढेच स्पष्ट झाले आहे. - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री,