शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी जनतेचा विश्वासघात केला

By admin | Updated: March 8, 2015 02:25 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्रातील मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी देशोधडीला लागले आहेत.

शरद पवार यांचा घणाघात : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगूल नवी मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्रातील मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पोकळ घोषणाबाजी करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्राच्या विविध भागांत दुष्काळ पसरला आहे. पिण्यासाठी पाणी नाही. गुरांना चारा नाही. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी केंद्राची टीम येऊन गेली. परंतु आजतागायत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे. कामगारविरोधी निर्णय घेतले जात आहेत. माथाडी कायदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल पवार त्यांनी उपस्थित केला. केंद्र आणि राज्यातील भाजपप्रणीत सरकार जनतेच्या हिताला बगल देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून जनमत मोदीविरोधी होऊ लागले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देशात झालेल्या विविध पोटनिवडणुकीतून हे दिसून आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पराभवाने खचून न जाता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांचा प्रचार व प्रसार करा, विजय आपलाच आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांचीही भाषणे झाली. यावेळी आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, महपौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)...तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधआघाडी सरकारने बनविलेल्या भूसंपादनाच्या सर्वव्यापी कायद्यात मोदी सरकारने बदल केले आहेत. हे बदल शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदारांच्या विरोधात आहेत. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याला तीव्र विरोध केला जाईल, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.