शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

पोलिसांकडे आधुनिक शस्त्रांचा तुटवडा, कॅगचा ठपका    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:56 IST

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून दप्तरशाहीचा फटका बसत आहे. पोलीस दलाकडे बुलेटप्रुफ जॅकेट, नाईट विजन दुुर्बणी, बॉम्ब डिस्पोझेबल सुटस्, पोर्टेबल क्ष-किरण यंत्र आदी महत्वाच्या साधनसामग्रीची खरेदीच करण्यात आली नसल्याचा ठपका महालेखापालांच्या अहवालात (कॅग) ठेवण्यात आला आहे.

मुंबई : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून दप्तरशाहीचा फटका बसत आहे. पोलीस दलाकडे बुलेटप्रुफ जॅकेट, नाईट विजन दुुर्बणी, बॉम्ब डिस्पोझेबल सुटस्, पोर्टेबल क्ष-किरण यंत्र आदी महत्वाच्या साधनसामग्रीची खरेदीच करण्यात आली नसल्याचा ठपका महालेखापालांच्या अहवालात (कॅग) ठेवण्यात आला आहे.भारताचे महानियंत्रक व महालेखापरिक्षक (कॅग) यांचा सामान्य आणि सामाजिक क्षेत्राचा सरत्या आर्थिक वर्षाचा अहवाल शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. यात गृहखात्याच्या आधुनिकीकरणाच्या सर्वच आघाड्यांवर त्रुटी असल्याचे कॅगच्या अहवालातून उघड झाले आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी २०११ ते २०१६ दरम्यान गृहविभागाला ४२.६८ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र त्यातील फक्त २७.४० कोटींच खर्च करण्यात आला. राज्याच्या एकूण गरजेपैकी १ लाख ४६ हजार ५०८ शस्त्रांस्त्रांच्या तुलनेत मार्च २०१६ अखेर फक्त ८१ हजार ४८२ शस्त्रे उपलब्ध होती. एकूण ६५,०२६ म्हणजेच तब्बल ४५ टक्के अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची कमतरता राज्यात असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.राज्याच्या पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून २०११ ते २०१६ दरम्यान वितरीत करण्यात आलेल्या निधीपैकी केवळ ३८ टक्के निधीच वापरण्यात आला असून तब्बल ६२ टक्के निधी वापरलाच गेला नसल्याचा ठपकाही कॅगने ठेवला आहे. आधी केंद्र सरकारला वार्षिक कृती आराखडा सादर करण्यास राज्याकडून विलंब झाला. त्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या कृती आराखड्यास एकत्रित प्रशासकीय मान्यता देण्यात राज्य सरकारने अक्षम्य दिरंगाई केल्याने समस्या अधिक वाढली. सरकारने वेळीच परवानग्या न दिल्याने संबंधित यंत्रणांना आलेला निधी वापरताच आला नाही, असा ठपका कॅगने ठेवला आहे.पोलीस स्थानकासह संबंधित आस्थापनांपैकी केवळ ८ टक्के इमारतींची दुरुस्ती, तब्बल दहा कोटी खर्चुन खरेदी करण्यात आलेल्या डिजिटक रेडीओ ट्रॅकींग व्यवस्था सव्वा तीन वर्षानंतरही सुरु झाले नाही. त्यामुळे डिजिटल व्यवस्थेचा वापर करुन पोलिस दळणवळण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे उद्दीष्ट गाठण्यात अपयश आल्याचे कॅगने म्हटले आहे.