शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

मॉडेल स्कूलचे वरातीमागून घोडे !

By admin | Updated: November 4, 2016 02:09 IST

आदिवासी समाजातील बालकांना पाचवीपर्यंतचे शिक्षण खासगी कॉन्व्हेट शाळांमध्ये देण्यासाठी मॉडेल स्कूलचा निर्णय सरकारने जाहीर केला

मुंबई : आदिवासी समाजातील बालकांना पाचवीपर्यंतचे शिक्षण खासगी कॉन्व्हेट शाळांमध्ये देण्यासाठी मॉडेल स्कूलचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. मात्र अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जाग आलेल्या सरकारच्या दिरंगाईमुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागेल, असा आरोप भगतसिंग स्टुडंट फ्रंटने केला आहे.संघटनेचे प्रमुख परमेश्वर कसबे यांनी सांगितले की, आघाडी सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मॉडेल स्कूल सुरू केले होते. या योजनेनुसार आदिवासी विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मॉडेल स्कूलही सुरू करण्यात आले. त्यात पहिली ते बारावीपर्यंच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाच्या मॉडेल स्कूलसोबतच खासगी नामांकित शाळांमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठीची तरतूद आघाडी सरकारने केली होती. मात्र राज्यातील मॉडेल स्कूलसाठी निधी नसल्याचे कारण सांगत केंद्रासह राज्य सरकारने गेल्या वर्षी या शाळा बंद केल्या. परिणामी, दर्जेदार इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेण्यापासून हजारो विद्यार्थी वंचित राहिले. युती सरकारने या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतरही हजारो आदिवासी विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचा आरोप कसबे यांनी केला. ते म्हणाले की, मॉडेल स्कूलसाठी राज्यातील १६ शाळांची निवड सरकारने केली आहे. या शाळांमध्ये सुमारे ३ हजार २०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. मात्र शाळा सुरू होऊन पाच महिन्यांचा कालावधी झाला असून, सर्वच शाळांतील पहिले सत्र संपले आहे. त्यामुळे ज्या शाळांची नावे निश्चित झाली आहेत, त्या शाळा आदिवासी विद्यार्थ्यांना आता कोणत्या धर्तीवर प्रवेश देणार, असा प्रश्न उपस्थित होतो. पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाची भरपाई करण्याचा प्रयत्न केल्यास पुरता गोंधळ उडण्याची शक्यताही कसबे यांनी व्यक्त केली आहे.मॉडेल स्कूलचा बट्ट्याबोळ...आघाडी सरकारने २००९ साली घेतलेल्या निर्णयात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत होते. याउलट युती सरकारने फक्त पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या वर्षी १४ आॅगस्ट २०१५ रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयात या योजनेसाठी ८८ शाळांची निवड केली होती. याउलट यंदा फक्त १६ शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या वर्षी निवड केलेल्या जिल्ह्यांमधील रायगड, सोलापूर, सातारा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नंदुरबार, पालघर, गोंदिया, धुळे, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील एकाही शाळेचा नव्या योजनेत समावेश नाही.