शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

मुले पळविण्याच्या अफवेतून जमावाने एकाला ठेचून मारले

By admin | Updated: March 6, 2015 00:08 IST

मुलांचे अपहरण करणारा असल्याच्या संशयावरून जमावाने एका मनोरुग्णाला बेदम मारहाण करीत ठार मारले, तर त्याआधी मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरीही ठार झाला.

कन्नड तालुक्यातील खळबळजनक घटना : मनोरुग्णाच्या हल्ल्यात शेतकरीही ठार; पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने नातेवाईक बचावलेहतनूर (जि. औरंगाबाद) : मुलांचे अपहरण करणारा असल्याच्या संशयावरून जमावाने एका मनोरुग्णाला बेदम मारहाण करीत ठार मारले, तर त्याआधी मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरीही ठार झाला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास कन्नड तालुक्यातील टापरगाव- रुईखेडा शिवारात घडली. दत्तात्रय सखाराम पल्हाळ (३५, रा. बोडखा, ता. खुलताबाद) असे मनोरुग्णाचे आणि प्रकाश दौलतराव जंगले (५०, रा. टापरगाव, कन्नड) असे शेतकऱ्याचे नाव आहे. मनोरुग्णाला सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही जमावाने मारहाण केली. वेळीच पोलीस पोहोचल्याने त्यांचे जीव बचावले, हे विशेष. जंगलेंचा घाटीत मृत्यूमनोरुग्ण दत्तात्रय पल्हाळने डोक्यात लाकडी दांडा मारल्याने प्रकाश जंगले हेही गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जंगले यांचाही मृत्यू झाला. बहीण, मेव्हण्यालाही मारहाणमनोरुग्ण दत्तात्रय बेपत्ता झाल्यानंतर त्याची बहीण हिराबाई आडुळे, रामदास काटकर, मधुकर आडुळे, इस्माईल पटेल आदी दहा ते पंधरा नातेवाईक, मित्रमंडळी शोध घेत घेत अखेर टापरगावात पोहोचले. त्याचवेळी जमाव दत्तात्रयला मुले पळविणारा अपहरणकर्ता असल्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. आपल्याच दत्तात्रयला मारहाण होत असल्याचे नजरेस पडताच या नातेवाईक, मित्रमंडळींनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही मंडळीही अपहरणकर्त्यांच्या टोळीचेच सदस्य असल्याच्या संशयावरून जमावाने त्यांनाही मारहाण सुरू केली.