शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

मनसेचा ‘आवाज’ गेला मर्यादेबाहेर!

By admin | Updated: April 16, 2016 04:22 IST

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याचा आवाज मर्यादेबाहेर होता, जेणेकरून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे,

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याचा आवाज मर्यादेबाहेर होता, जेणेकरून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा निष्कर्ष नोंदवत सभेचे आयोजक नितीन सरदेसाई यांच्यावर कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर मनसेने गुढीपाडव्यादिवशी (८ एप्रिल रोजी) शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित केला होता. शिवाजी पार्क हे ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित असल्याने मनसेच्या या मेळाव्यास परवानगी देऊ नये, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र त्यावर निर्णय देताना मेळाव्यादरम्यान ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही, अशी लेखी हमी आयोजक नितीन सरदेसाई यांच्याकडून घेत उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. शिवाय मेळाव्यातील ध्वनीची तीव्रता नोंदविण्याचे आदेशही पोलीस आणि महापालिकेला दिले होते. या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना, रा.स्व. संघाचे मा. गो. वैद्य आणि विदर्भवादी श्रीहरी अणे यांच्यावर येथेच्च टिकेची झोड उठविली होती.मात्र, त्यांचा तो ‘आवाज’ मर्यादित ‘डेसिबल’पेक्षा अधिक नोंदला गेला. त्यामुळे सरदेसाई यांना नोटीस बजावताना ‘स्वकृतदर्शनी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आयोजकांवर (नितीन सरदेसाई) यांच्यावर अवमान नोटीस बजावण्यात येत आहे,’ असे न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने म्हटले. जाणुनबुजून नियमांचे उल्लंघन?मेळाव्यादरम्यान वाद्य न वाजवून आवाजाची मर्यादा आटोक्यात ठेवता आली असती. जाणुनबुजून नियमांचे उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला मेळाव्याचे आयोजक नितीन सरदेसाई यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला. तर मनसेला उत्तर देण्यासाठी वेळ देत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २४ जून रोजी ठेवली.पातळी ११४ डेसिबल !आवाजाच्या पातळीसंदर्भातील मुख्य वकील पूर्णिमा कंथारिया यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, मेळाव्याच्या दिवशी शिवाजी मैदानावर सकाळी आवाजाची पातळी ८८ डेसिबल होती; तर कार्यक्रम सुरू झाल्यावर पातळी ११४ डेसिबलपर्यंत पोहोचली. त्यावर आक्षेप घेत मनसेतर्फे ज्येष्ठ वकील व्ही. ए. थोरात यांनी शिवाजी पार्कवर कोणत्याही वेळी आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असते, असे खंडपीठाला सांगितले.