शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

नाशिकसाठी मनसेची धडपड

By admin | Updated: January 6, 2017 04:05 IST

महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा सत्तेचा अनुभव घेणाऱ्या मनसेने आता सत्ता कायम राखण्यासाठी धडपड चालविली असून,

नाशिक : महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा सत्तेचा अनुभव घेणाऱ्या मनसेने आता सत्ता कायम राखण्यासाठी धडपड चालविली असून, बड्या उद्योगसमूहांच्या माध्यमातून साकारलेल्या प्रकल्पांचे ब्रॅण्डिग करत ‘करून दाखवले’चा नारा राज ठाकरे यांनी दिला आहे. सेना-भाजपालाही सत्तेचे वेध लागले असून, दोहोंनी तूर्त तरी स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने मरगळलेल्या कार्यकर्त्यांत प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. २०१२मध्ये राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर ४० नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पक्षाला सत्ता मिळाली. पहिली अडीच वर्षे भाजपाबरोबर तर नंतरच्या अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्षांचे गट मिळून स्थापन झालेल्या महाआघाडीबरोबर संसार थाटणाऱ्या मनसेची गेल्या पाच वर्षांत कामगिरी यथातथाच राहिली. पाच वर्षांत कधी पूर्णवेळ आयुक्त न देऊन तर कधी कामकाजात हस्तक्षेप करत राज्य सरकारने खोडा घातल्याचा आरोप राज ठाकरे यांनी वारंवार केला. परंतु, त्यांनी निवडणुकीत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासंबंधी आश्वासनांची पूर्तता झाली नाही. नाशिककरांमध्येही तीच भावना रुजवण्यास विरोधक यशस्वी ठरले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४०पैकी तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्षाघात झालेल्या मनसेची अवस्था दयनीय बनली आहे. रतन टाटांच्या माध्यमातून बॉटनिकल गार्डन, मुकेश अंबानींच्या माध्यमातून गोदापार्क, शिर्के उद्योग समूहाकडून होळकर पुलावर वॉटर कर्टन व जिनिव्हा कारंजा तर जीव्हीकेमार्फत साकारलेले इतिहास वस्तुसंग्रहालय या प्रकल्पांचे ब्रॅण्डिंग केले जात आहे. सेना-भाजपा युती होवो ना होवो, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी करत लढण्याची तयारी नाशिकमध्ये ठेवली आहे. (प्रतिनिधी)