शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

नाशिकसाठी मनसेची धडपड

By admin | Updated: January 6, 2017 04:05 IST

महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा सत्तेचा अनुभव घेणाऱ्या मनसेने आता सत्ता कायम राखण्यासाठी धडपड चालविली असून,

नाशिक : महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा सत्तेचा अनुभव घेणाऱ्या मनसेने आता सत्ता कायम राखण्यासाठी धडपड चालविली असून, बड्या उद्योगसमूहांच्या माध्यमातून साकारलेल्या प्रकल्पांचे ब्रॅण्डिग करत ‘करून दाखवले’चा नारा राज ठाकरे यांनी दिला आहे. सेना-भाजपालाही सत्तेचे वेध लागले असून, दोहोंनी तूर्त तरी स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने मरगळलेल्या कार्यकर्त्यांत प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. २०१२मध्ये राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर ४० नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पक्षाला सत्ता मिळाली. पहिली अडीच वर्षे भाजपाबरोबर तर नंतरच्या अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्षांचे गट मिळून स्थापन झालेल्या महाआघाडीबरोबर संसार थाटणाऱ्या मनसेची गेल्या पाच वर्षांत कामगिरी यथातथाच राहिली. पाच वर्षांत कधी पूर्णवेळ आयुक्त न देऊन तर कधी कामकाजात हस्तक्षेप करत राज्य सरकारने खोडा घातल्याचा आरोप राज ठाकरे यांनी वारंवार केला. परंतु, त्यांनी निवडणुकीत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासंबंधी आश्वासनांची पूर्तता झाली नाही. नाशिककरांमध्येही तीच भावना रुजवण्यास विरोधक यशस्वी ठरले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४०पैकी तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्षाघात झालेल्या मनसेची अवस्था दयनीय बनली आहे. रतन टाटांच्या माध्यमातून बॉटनिकल गार्डन, मुकेश अंबानींच्या माध्यमातून गोदापार्क, शिर्के उद्योग समूहाकडून होळकर पुलावर वॉटर कर्टन व जिनिव्हा कारंजा तर जीव्हीकेमार्फत साकारलेले इतिहास वस्तुसंग्रहालय या प्रकल्पांचे ब्रॅण्डिंग केले जात आहे. सेना-भाजपा युती होवो ना होवो, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी करत लढण्याची तयारी नाशिकमध्ये ठेवली आहे. (प्रतिनिधी)