शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

मनसेचा स्वतंत्र गट स्थापन

By admin | Updated: November 6, 2015 02:21 IST

केडीएमसीत सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असतानाच, मनसेने गुरुवारी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामध्ये

डोंबिवली : केडीएमसीत सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असतानाच, मनसेने गुरुवारी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामध्ये त्यांच्या ९ नगरसेवकांसह १ अपक्ष (पुरस्कृत) आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. हा १० जणांचा गट आपल्याकडे खेचून आणण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केल्याने शिवसेनेत धाकधूक निर्माण झाली आहे.शिवसेनेचे ५२ नगरसेवक असून, त्यांनी केलेली जमवाजमव लक्षात घेता, सत्ता स्थापनेसाठी त्यांना ६/७ मतांची आवश्यकता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपाकडे ४२ नगरसेवक असून, त्यांना मनसे व एक अपक्ष अशा १० जणांची रसद लाभली, तर भाजपाचे संख्याबळ शिवसेनेच्या बरोबर येईल. त्यामुळे महापौरपद मिळवण्याची संधी शिवसेनेइतकीच भाजपाला उपलब्ध होते. अशा परिस्थितीत २७ गावांतील संघर्ष समितीचे सहा नगरसेवक व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य यांनाही शिवसेनेबरोबरच भाजपाचा पर्याय खुला होतो. राज्यातील सत्तेत भाजपा हा मुख्य पक्ष असून, गृह, नगरविकास अशी सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असल्याने, अशा स्थितीत भाजपाचा महापौर सत्तारूढ होऊ शकतो. त्यामुळेच मनसेला एक गट म्हणून नोंदणी करण्यास भाग पाडून फोडाफोडीची संधी मिळणार नाही, याची तजवीज भाजपाने केल्याचे बोलले जात आहे. मनसेने मात्र ते कोणासोबत आहेत, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. शिवसेनाही मनसेला सोबत घेण्याची थेट भूमिका जाहीर करीत नाही. शिवसेनेतील काही नेत्यांचा राज ठाकरे यांना किंगमेकर करण्यास तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत भाजपासोबत जाण्याचा मार्ग राज यांच्याकरिता खुला राहतो. विरोधी बाकावर मनसे बसणार नसल्याचे सांगत, त्या पक्षातील सूत्रांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. अनधिकृत बांधकामांच्या यादीत या पक्षाच्या एका नगरसेवकाचे नाव असल्याने त्याच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याने तो तिढाही सुटता सुटेनासा झाला आहे. भाजपाच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेणे पक्षाच्या पथ्यावर पडेल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटते.- ‘मनसे हा स्वतंत्र पक्ष असल्याने त्याची वेगळी गटनोंदणी करावीच लागते, हे नियमानुसार केलेले आहे. त्यामुळे गुरुवारी ९ +१ (अपक्ष) अशा १० जणांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे गट स्थापन केला, त्यात काही विशेष नाही,’ असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.