शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

मनसेचा स्वतंत्र गट स्थापन

By admin | Updated: November 6, 2015 02:21 IST

केडीएमसीत सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असतानाच, मनसेने गुरुवारी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामध्ये

डोंबिवली : केडीएमसीत सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असतानाच, मनसेने गुरुवारी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामध्ये त्यांच्या ९ नगरसेवकांसह १ अपक्ष (पुरस्कृत) आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. हा १० जणांचा गट आपल्याकडे खेचून आणण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केल्याने शिवसेनेत धाकधूक निर्माण झाली आहे.शिवसेनेचे ५२ नगरसेवक असून, त्यांनी केलेली जमवाजमव लक्षात घेता, सत्ता स्थापनेसाठी त्यांना ६/७ मतांची आवश्यकता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपाकडे ४२ नगरसेवक असून, त्यांना मनसे व एक अपक्ष अशा १० जणांची रसद लाभली, तर भाजपाचे संख्याबळ शिवसेनेच्या बरोबर येईल. त्यामुळे महापौरपद मिळवण्याची संधी शिवसेनेइतकीच भाजपाला उपलब्ध होते. अशा परिस्थितीत २७ गावांतील संघर्ष समितीचे सहा नगरसेवक व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य यांनाही शिवसेनेबरोबरच भाजपाचा पर्याय खुला होतो. राज्यातील सत्तेत भाजपा हा मुख्य पक्ष असून, गृह, नगरविकास अशी सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असल्याने, अशा स्थितीत भाजपाचा महापौर सत्तारूढ होऊ शकतो. त्यामुळेच मनसेला एक गट म्हणून नोंदणी करण्यास भाग पाडून फोडाफोडीची संधी मिळणार नाही, याची तजवीज भाजपाने केल्याचे बोलले जात आहे. मनसेने मात्र ते कोणासोबत आहेत, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. शिवसेनाही मनसेला सोबत घेण्याची थेट भूमिका जाहीर करीत नाही. शिवसेनेतील काही नेत्यांचा राज ठाकरे यांना किंगमेकर करण्यास तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत भाजपासोबत जाण्याचा मार्ग राज यांच्याकरिता खुला राहतो. विरोधी बाकावर मनसे बसणार नसल्याचे सांगत, त्या पक्षातील सूत्रांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. अनधिकृत बांधकामांच्या यादीत या पक्षाच्या एका नगरसेवकाचे नाव असल्याने त्याच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याने तो तिढाही सुटता सुटेनासा झाला आहे. भाजपाच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेणे पक्षाच्या पथ्यावर पडेल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटते.- ‘मनसे हा स्वतंत्र पक्ष असल्याने त्याची वेगळी गटनोंदणी करावीच लागते, हे नियमानुसार केलेले आहे. त्यामुळे गुरुवारी ९ +१ (अपक्ष) अशा १० जणांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे गट स्थापन केला, त्यात काही विशेष नाही,’ असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.