शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आमदार पुत्राच्या मारहाणीपासूनच बेबनाव

By admin | Updated: January 15, 2015 00:57 IST

धरमपेठ येथील खूनप्रकरणी मृत रितेश बैसवारे आणि आरोपी हे एकेकाळी चांगले मित्र होते. परंतु एका आमदार पुत्राला मारहाण केल्यापासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. या वादानंतर मृत रितेश हा

रितेश बैसवारे खूनप्रकरण : आरोपींना २३ पर्यंत कोठडी नागपूर : धरमपेठ येथील खूनप्रकरणी मृत रितेश बैसवारे आणि आरोपी हे एकेकाळी चांगले मित्र होते. परंतु एका आमदार पुत्राला मारहाण केल्यापासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. या वादानंतर मृत रितेश हा वारंवार अपमान करीत असल्याने आरोपी संतापले असून यातूनच त्याचा खून करण्यात आला आहे. आरोपींनी तशी कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपी अश्विन तुर्केल आणि निखिल डागोर यांना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास धरमपेठ बारबेरियम जीमजवळ गारमेंट्सचे दुकान चालवणाऱ्या ३० वर्षीय रितेश बैसवारे याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला होता. अंबाझरी पोलिसांनी रात्रीच आरोपींना पकडले होते. तेव्हापासून त्यांची विचारपूस सुरू आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रितेश आणि इतर साथीदारांच्या मदतीने २०१० साली एका भाजपा आमदार पुत्राला जीएस कॉलेजवळ झोडपले होते. सीताबर्डी पोलीस ठाण्यात मारहाण आणि दंगा भडकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. आमदार पुत्राला मारहाण करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय गंभीरतेने घेतले होते. त्यामुळे अश्विनला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. भविष्य खराब झाल्यामुळे अश्विनने रितेशची सोबत सोडली होती. अश्विन रितेशला टाळू लागत असल्याने रितेश त्याला वारंवार अपमानित करू लागला. रितेश आमदार निवासाच्या मागच्या बाजूला राहात होता. तेथून जीएस कॉलेज जवळ असल्याने तो नेहमीच कॉलेज परिसरात फिरत राहायचा. त्यामुळे कॉलेजमध्ये त्याचा दबदबा होता. तेव्हा त्याच्या वाट्याला फारसे कुणी जात नव्हते. दोन वर्षे बोलचाल बंद होती. त्यानंतर पुन्हा दोघांमधील संबंध सामान्य झाले. पण काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांच्या संबंधात खडा पडला. परंतु आता रितेशचा दरारा अधिक वाढला होता. जीएस कॉलेजवळील त्याचे दुकानही चांगले चालायला लागले होते. आकर्षक व मजबूत शरीर असल्याने त्याची युवकांमध्ये चांगलीच चलती होती. यादरम्यान त्याने एक-दोनदा अश्विनला मारहाणसुद्धा केली होती. दिवाळीच्या वेळी संबंध सामान्य करण्याच्या उद्देशाने अश्विनने रितेशच्या दुकानातून कपडे खरेदी केले होते. परंतु त्यानंतरही रितेश त्याला अपमानित करीत होता. तो आपल्या मित्रांच्या माध्यमातून अश्विनला संपवण्याची धमकी देत होता. १५ दिवसांपूर्वीच अश्विनला माहिती झाले की, रितेश त्याचा खून करण्याच्या तयारीत आहे. आपल्या जीवाचा धोका त्याला सतावीत होता. त्यामुळे त्याने रितेशलाच संपविण्याची योजना आखली. परंतु रितेशला तो स्वत: संपवू शकत नाही, याची त्याला जाणीव होती. त्यामुळे त्याने निखिल आणि इतर साथीदारांना आपल्यासोबत घेतले. (प्रतिनिधी)मिरची पावडरने योजना यशस्वी झाली रितेश मजबूत बांध्याचा होता. त्यामुळे त्याच्यावर सरळ वार करणे शक्य नव्हते. त्यामुळे आरोपींनी अगोदर त्याच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला मारण्यापूर्वी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर वार केले. अगोदर ठेवली पाळत अश्विनने काही दिवस रितेशच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवले. रितेश जीमला जातानाच एकटा राहत असल्याचे त्याच्या लक्षात आले. इतर वेळेस त्याच्यासोबत काही तरुण राहतात. त्यामुळे अश्विनने त्याला जीमजवळच संपविण्याची योजना आखली. सराईत मेंदूचे कारस्थान? आरोपींनी ज्या पद्धतीने हा खून केला, त्यावरून त्यांना एखाद्या सराईत मेंदूद्वारे मार्गदर्शन मिळाल्याची शंका निर्माण झाली आहे. आरोपी खरा प्रकार लपवीत आहेत. आरोपी आपल्या साथीदारांची नावे सांगण्यास टाळाटाळ करीत आहेत. सीसीटीव्हीमध्ये पाच ते सहा हल्लेखोर दिसून येत असताना आरोपी केवळ तीनजण असल्याचे सांगत आहेत.