शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

आमदार ठाकूर शिवसेनेच्या व्यासपीठावर

By admin | Updated: June 7, 2017 03:49 IST

अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : स्वत:ची कामगार संघटना असतानाही वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या बाजूने सरकारनेच नव्हे तर सर्व पक्षांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. असे आवाहन शिवसेनेच्या व्यासपीठावरून करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. बहुजन विकास आघाडीची स्वत:ची बहुजन कामगार संघटना आहे. वसई विरार महापालिकेसह वसई विरार आणि पालघर, बोईसर औद्योगिक वसाहतीत संघटना कार्यरत आहे. असे असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार महापालिकेत शिरकाव करीत असलेल्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली. इतकेच नाही तर संघटनेच्या अग्निशमन दलातील फलकाचे अनावरणही केले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडीक, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर, माजी नगरसेवक वसंत वैती, विनायक निकम यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमात भाषणही ठोकले. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. सध्या वसई विरार महापालिकेत माजी आमदार आणि अद्यापही शिवसेनेचे उपनेते असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने आपले बस्तान बसवले आहे. महापालिकेच्या महत्वाच्या विभागात पंडितांच्या संघटनेने शिरकाव केला आहे. पंडितांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी सतत आंदोलने करून महापालिकेला जेरीस आणले आहे. आमदार ठाकूर यांची स्वत:ची बहुजन कामगार संघटना असली तरी महापालिकेत या संघटनेला आपला जम बसवता आलेला नाही. याउलट पंडितांच्या संघटनेचे बळ वाढताना दिसत आहे. महापालिकेत पंडितांच्या संघटनेला शह देण्यासाठी आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेला महापालिकेत प्रवेश दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या महापालिका वर्तळात सुरु झाली आहे. महाडीक यांनीही महापालिकेतील इतर विभागातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीही भारतीय कामगार सेना पुढाकार घेईल, असे सांगितले. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर आमदार ठाकूर यांनी आपल्या तीन आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दिला होता. सध्या शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढत चालली आहे. असे असताना आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली. तर सूर्यकांत महाडीक यांनी शेतकऱ्यांचा लढा चिघळल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. सरकारची जी चुकीचे धोरणे आहेत त्याला शिवसेनेचा विरोध राहणार आहे, असेही महाडीक यांनी सांगितले.