शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

आमदार ठाकूर शिवसेनेच्या व्यासपीठावर

By admin | Updated: June 7, 2017 03:49 IST

अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : स्वत:ची कामगार संघटना असतानाही वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या बाजूने सरकारनेच नव्हे तर सर्व पक्षांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. असे आवाहन शिवसेनेच्या व्यासपीठावरून करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. बहुजन विकास आघाडीची स्वत:ची बहुजन कामगार संघटना आहे. वसई विरार महापालिकेसह वसई विरार आणि पालघर, बोईसर औद्योगिक वसाहतीत संघटना कार्यरत आहे. असे असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार महापालिकेत शिरकाव करीत असलेल्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली. इतकेच नाही तर संघटनेच्या अग्निशमन दलातील फलकाचे अनावरणही केले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडीक, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर, माजी नगरसेवक वसंत वैती, विनायक निकम यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमात भाषणही ठोकले. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. सध्या वसई विरार महापालिकेत माजी आमदार आणि अद्यापही शिवसेनेचे उपनेते असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने आपले बस्तान बसवले आहे. महापालिकेच्या महत्वाच्या विभागात पंडितांच्या संघटनेने शिरकाव केला आहे. पंडितांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी सतत आंदोलने करून महापालिकेला जेरीस आणले आहे. आमदार ठाकूर यांची स्वत:ची बहुजन कामगार संघटना असली तरी महापालिकेत या संघटनेला आपला जम बसवता आलेला नाही. याउलट पंडितांच्या संघटनेचे बळ वाढताना दिसत आहे. महापालिकेत पंडितांच्या संघटनेला शह देण्यासाठी आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेला महापालिकेत प्रवेश दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या महापालिका वर्तळात सुरु झाली आहे. महाडीक यांनीही महापालिकेतील इतर विभागातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीही भारतीय कामगार सेना पुढाकार घेईल, असे सांगितले. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर आमदार ठाकूर यांनी आपल्या तीन आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दिला होता. सध्या शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढत चालली आहे. असे असताना आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली. तर सूर्यकांत महाडीक यांनी शेतकऱ्यांचा लढा चिघळल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. सरकारची जी चुकीचे धोरणे आहेत त्याला शिवसेनेचा विरोध राहणार आहे, असेही महाडीक यांनी सांगितले.