शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आमदार ठाकूर शिवसेनेच्या व्यासपीठावर

By admin | Updated: June 7, 2017 03:49 IST

अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : स्वत:ची कामगार संघटना असतानाही वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या बाजूने सरकारनेच नव्हे तर सर्व पक्षांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. असे आवाहन शिवसेनेच्या व्यासपीठावरून करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. बहुजन विकास आघाडीची स्वत:ची बहुजन कामगार संघटना आहे. वसई विरार महापालिकेसह वसई विरार आणि पालघर, बोईसर औद्योगिक वसाहतीत संघटना कार्यरत आहे. असे असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार महापालिकेत शिरकाव करीत असलेल्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली. इतकेच नाही तर संघटनेच्या अग्निशमन दलातील फलकाचे अनावरणही केले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडीक, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर, माजी नगरसेवक वसंत वैती, विनायक निकम यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमात भाषणही ठोकले. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. सध्या वसई विरार महापालिकेत माजी आमदार आणि अद्यापही शिवसेनेचे उपनेते असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने आपले बस्तान बसवले आहे. महापालिकेच्या महत्वाच्या विभागात पंडितांच्या संघटनेने शिरकाव केला आहे. पंडितांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी सतत आंदोलने करून महापालिकेला जेरीस आणले आहे. आमदार ठाकूर यांची स्वत:ची बहुजन कामगार संघटना असली तरी महापालिकेत या संघटनेला आपला जम बसवता आलेला नाही. याउलट पंडितांच्या संघटनेचे बळ वाढताना दिसत आहे. महापालिकेत पंडितांच्या संघटनेला शह देण्यासाठी आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेला महापालिकेत प्रवेश दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या महापालिका वर्तळात सुरु झाली आहे. महाडीक यांनीही महापालिकेतील इतर विभागातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीही भारतीय कामगार सेना पुढाकार घेईल, असे सांगितले. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर आमदार ठाकूर यांनी आपल्या तीन आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दिला होता. सध्या शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढत चालली आहे. असे असताना आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली. तर सूर्यकांत महाडीक यांनी शेतकऱ्यांचा लढा चिघळल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. सरकारची जी चुकीचे धोरणे आहेत त्याला शिवसेनेचा विरोध राहणार आहे, असेही महाडीक यांनी सांगितले.