शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
4
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
5
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
6
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
7
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
8
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
9
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
10
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
11
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
12
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
14
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
15
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
16
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
17
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
18
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
19
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
20
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल

ग्रामपंचायत सदस्य बनला आमदार

By admin | Updated: October 21, 2014 23:42 IST

इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो

दापोली : इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो. हे त्रिवार सत्य संजय कदम यांनी दाखवून दिले आहे. १९९० साली चिंचघर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते २०१४ ला दापोलीचे आमदार हा प्रवास एका सच्चा कार्यकर्त्याचा आहे. गेल्या २५ वर्षात त्यांनी ेराजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती जनतेने आज दिली आहे.तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करुन ग्रामपंचायतीवर निवडून जात वयाच्या २१व्यावर्षी सरपंचपदाचा बहुमानही कदम यांनी मिळवला. सरपंच पदावरुन त्यांनी मागे कधीही वळून पाहिले नाही. खेड पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद गटनेता अशी त्यांची कारकीर्द राहिली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपली छाप पाडली.दोन वर्षापूर्वी खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद नाकारल्याने शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करुन राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते, खेडचे तत्कालीन आमदार रामदास कदम यांच्या तालमीत वाढलेले संजय कदम कट्टर शिवसैनिक होते. राष्ट्रवादीत गेल्यावरसुद्धा सेनेचीच आक्रमकता त्यांच्या अंगात होती. सेना स्टाईलनेच त्यांनी जिल्हा परिषदेत अन्यायाविरोधात आवाज उठवला.दापोली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत खेड तालुका दापोलीला जोडला गेला व २००९ साली सूर्यकांत दळवी यांच्यापाठीशी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते ठाम राहिले. संजय कदम व सूर्यकांत दळवी यांची गुरु शिष्याची जोडी जमली. मात्र अडीच वर्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद खेडला मिळावे, असा आग्रह कदम यांनी धरला. मात्र खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद न देता दापोलीच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी दळवी यांना देण्यात आले व गुरु शिष्याचा दुरावा निर्माण झाला. संजय कदम यांनी राष्ट्रवादी जोडली व एकेकाळचे गुरु शिष्य पक्के राजकीय विरोधक बनले.दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी १९९० साली आपले राजकीय गुरु तत्कालीन मंत्री बाबुराव बेलोसे यांचा पराभव करुन विजयी झाले. त्याच दळवींचा पराभव त्यांच्या एकेकाळच्या शिष्याने केल्याने या मतदारसंघातील ही परंपरा कायम राहिली आहे.दापोली विधानसभेतील मतदारांनी गोडबोले आमदाराला नाकारले असून निष्क्रीयतेला जनता कंटाळली आहे. जनतेला विकासकामे हवी आहेत. केवळ गोड बोलून जनतेचा विकास होणार नाही. मतदार सुज्ञ झाले आहेत. तुलनात्मकदृष्ट्या कोण उमेदवार असावा हे जनतेने दाखवून दिले आहे. २५ वर्षे आमदार असणाऱ्या व्यक्तीतालुक्याचा विकास केलेला नाही. जनतेला परिवर्तन हवे होते. म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवू. विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला करुन दाखवू.- संजय कदम, विद्यमान आमदार.