शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

ग्रामपंचायत सदस्य बनला आमदार

By admin | Updated: October 21, 2014 23:42 IST

इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो

दापोली : इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो. हे त्रिवार सत्य संजय कदम यांनी दाखवून दिले आहे. १९९० साली चिंचघर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते २०१४ ला दापोलीचे आमदार हा प्रवास एका सच्चा कार्यकर्त्याचा आहे. गेल्या २५ वर्षात त्यांनी ेराजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती जनतेने आज दिली आहे.तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करुन ग्रामपंचायतीवर निवडून जात वयाच्या २१व्यावर्षी सरपंचपदाचा बहुमानही कदम यांनी मिळवला. सरपंच पदावरुन त्यांनी मागे कधीही वळून पाहिले नाही. खेड पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद गटनेता अशी त्यांची कारकीर्द राहिली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपली छाप पाडली.दोन वर्षापूर्वी खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद नाकारल्याने शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करुन राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते, खेडचे तत्कालीन आमदार रामदास कदम यांच्या तालमीत वाढलेले संजय कदम कट्टर शिवसैनिक होते. राष्ट्रवादीत गेल्यावरसुद्धा सेनेचीच आक्रमकता त्यांच्या अंगात होती. सेना स्टाईलनेच त्यांनी जिल्हा परिषदेत अन्यायाविरोधात आवाज उठवला.दापोली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत खेड तालुका दापोलीला जोडला गेला व २००९ साली सूर्यकांत दळवी यांच्यापाठीशी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते ठाम राहिले. संजय कदम व सूर्यकांत दळवी यांची गुरु शिष्याची जोडी जमली. मात्र अडीच वर्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद खेडला मिळावे, असा आग्रह कदम यांनी धरला. मात्र खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद न देता दापोलीच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी दळवी यांना देण्यात आले व गुरु शिष्याचा दुरावा निर्माण झाला. संजय कदम यांनी राष्ट्रवादी जोडली व एकेकाळचे गुरु शिष्य पक्के राजकीय विरोधक बनले.दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी १९९० साली आपले राजकीय गुरु तत्कालीन मंत्री बाबुराव बेलोसे यांचा पराभव करुन विजयी झाले. त्याच दळवींचा पराभव त्यांच्या एकेकाळच्या शिष्याने केल्याने या मतदारसंघातील ही परंपरा कायम राहिली आहे.दापोली विधानसभेतील मतदारांनी गोडबोले आमदाराला नाकारले असून निष्क्रीयतेला जनता कंटाळली आहे. जनतेला विकासकामे हवी आहेत. केवळ गोड बोलून जनतेचा विकास होणार नाही. मतदार सुज्ञ झाले आहेत. तुलनात्मकदृष्ट्या कोण उमेदवार असावा हे जनतेने दाखवून दिले आहे. २५ वर्षे आमदार असणाऱ्या व्यक्तीतालुक्याचा विकास केलेला नाही. जनतेला परिवर्तन हवे होते. म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवू. विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला करुन दाखवू.- संजय कदम, विद्यमान आमदार.