शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

ग्रामपंचायत सदस्य बनला आमदार

By admin | Updated: October 21, 2014 23:42 IST

इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो

दापोली : इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो. हे त्रिवार सत्य संजय कदम यांनी दाखवून दिले आहे. १९९० साली चिंचघर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते २०१४ ला दापोलीचे आमदार हा प्रवास एका सच्चा कार्यकर्त्याचा आहे. गेल्या २५ वर्षात त्यांनी ेराजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती जनतेने आज दिली आहे.तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करुन ग्रामपंचायतीवर निवडून जात वयाच्या २१व्यावर्षी सरपंचपदाचा बहुमानही कदम यांनी मिळवला. सरपंच पदावरुन त्यांनी मागे कधीही वळून पाहिले नाही. खेड पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद गटनेता अशी त्यांची कारकीर्द राहिली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपली छाप पाडली.दोन वर्षापूर्वी खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद नाकारल्याने शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करुन राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते, खेडचे तत्कालीन आमदार रामदास कदम यांच्या तालमीत वाढलेले संजय कदम कट्टर शिवसैनिक होते. राष्ट्रवादीत गेल्यावरसुद्धा सेनेचीच आक्रमकता त्यांच्या अंगात होती. सेना स्टाईलनेच त्यांनी जिल्हा परिषदेत अन्यायाविरोधात आवाज उठवला.दापोली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत खेड तालुका दापोलीला जोडला गेला व २००९ साली सूर्यकांत दळवी यांच्यापाठीशी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते ठाम राहिले. संजय कदम व सूर्यकांत दळवी यांची गुरु शिष्याची जोडी जमली. मात्र अडीच वर्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद खेडला मिळावे, असा आग्रह कदम यांनी धरला. मात्र खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद न देता दापोलीच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी दळवी यांना देण्यात आले व गुरु शिष्याचा दुरावा निर्माण झाला. संजय कदम यांनी राष्ट्रवादी जोडली व एकेकाळचे गुरु शिष्य पक्के राजकीय विरोधक बनले.दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी १९९० साली आपले राजकीय गुरु तत्कालीन मंत्री बाबुराव बेलोसे यांचा पराभव करुन विजयी झाले. त्याच दळवींचा पराभव त्यांच्या एकेकाळच्या शिष्याने केल्याने या मतदारसंघातील ही परंपरा कायम राहिली आहे.दापोली विधानसभेतील मतदारांनी गोडबोले आमदाराला नाकारले असून निष्क्रीयतेला जनता कंटाळली आहे. जनतेला विकासकामे हवी आहेत. केवळ गोड बोलून जनतेचा विकास होणार नाही. मतदार सुज्ञ झाले आहेत. तुलनात्मकदृष्ट्या कोण उमेदवार असावा हे जनतेने दाखवून दिले आहे. २५ वर्षे आमदार असणाऱ्या व्यक्तीतालुक्याचा विकास केलेला नाही. जनतेला परिवर्तन हवे होते. म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवू. विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला करुन दाखवू.- संजय कदम, विद्यमान आमदार.