शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

लोणी धामणीच्या गारपीटग्रस्तांची ससेहोलपट पंचनाम्याची कागदपत्रे झाली गहाळ

By admin | Updated: May 8, 2014 22:56 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची शासनाने ससेहोलपट चालविली असून, नुकसान एकाचे व भरपाई मात्र भलत्यालाच, असा प्रकार झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे

लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची शासनाने ससेहोलपट चालविली असून, नुकसान एकाचे व भरपाई मात्र भलत्यालाच, असा प्रकार झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक प्रकाराची व त्याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.लोणी धामणी परिसरात बहुतेक शेतकर्‍यांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते झाले. काढणीला आलेली पिके हातातून गेली. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत. या पिकांचे पंचनामे महसूल विभागाने व कृषी विभागाने केले होते. परंतु, भरपाई मिळताना ज्याचे राजकीय वजन जास्त, ज्याची अधिकार्‍यांबरोबर ओळख जास्त, अशाच शेतकर्‍यांना भरभरून भरपाई मिळाली आहे. पण खरे नुकसानग्रस्त व गरीब शेतकरी मात्र या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले असल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप आहे. तर दुसरीकडे पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना उपसरपंच अनिल वाळुंज यांच्या प्रयत्नाने १३५ शेतकर्‍यांना दहा लाख रुपयांची मदत मिळाल्याने तेथील शेतकरी मात्र समाधानी व आनंदी आहेत. खडकवाडी, नाथनगर (ता. आंबेगाव) येथील २१८ शेतकर्‍यांना २५ लाख ६३ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचे येथील माजी उपसरपंच अनिल डोके यांनी सांगितले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकर्‍याना मदत मिळत आहे, तर दुसरीकडे नुकसान होऊनही मदत मिळत नाही, हा कुठला कायदा? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. या अधिकार्‍यांनी अशी चुकीची कामे केली असतील तर अशा दोन्ही अधिकार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी; अन्यथा शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा लोणी येथील शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष अशोक आदक पाटील यांनी दिली आहे.चौकट : नऊ महिने नऊ दिवस येथील शेतकरी बारकू लंके हे ग्रामविकास अधिकार्‍यांकडे नुकसानीची चौकशी करण्याकरिता गेले असता नुकसानभरपाई मिळण्याकरिता नऊ महिने नऊ दिवस भरावे लागतात, असे संतापजनक उत्तर मिळाल्याचे बारकू लंके यांनी डोळ्यांत अश्रू व भावनाविवश होऊन सांगितले.