शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या रॅकेटच्या चौकशीत दोघांची ‘मिसिंग मिस्ट्री’

By admin | Updated: June 4, 2017 01:20 IST

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांची इच्छुक ठिकाणी बदली करुन देणाऱ्या रॅकेटमधील चौकडीच्या अटकेमुळे खळबळ उडाली. मात्र या कारवाईदरम्यान आरोपींचे शिकार

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांची इच्छुक ठिकाणी बदली करुन देणाऱ्या रॅकेटमधील चौकडीच्या अटकेमुळे खळबळ उडाली. मात्र या कारवाईदरम्यान आरोपींचे शिकार होणारे दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. अचानक हे दोघे बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्यांची मिसिंग तक्रार नोंदवून त्यांचे फोटो चिटकवून शोध सुरू केला. पोलिसांनी या दोघांची सुटका केल्यानंतर तब्बल ३० तासानंतर या मिसिंग मिस्ट्रीला पूर्णविराम मिळाला. मूळचे गुजरातचे रहिवासी असलेले सुरेश (नावात बदल) हे त्यांच्या मित्राच्या कुटुंबासोबत विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांचा बोरीवली आणि विरार परिसरात जमिनीचा वाद सुरू होता. या जमिनी सोडून देण्यासाठी ९ महिन्यांपूर्वी समाजसेवकाच्या ओळखीने या रॅकेटमधील दिल्लीचा रहिवासी असलेला रवींद्रसिंग मोहबतसिंग यादव उर्फ शर्मा सोबत त्यांची ओळख झाली. रवींद्रसिंगने तो स्वत: केंद्र सरकारच्या सल्लागार कमिटीवर कामावर असल्याचे सांगितले. त्यानंतर सुरेशने त्याची अनेकदा भेट घेतली. वीरेंद्रसिंगच्या बोलण्यात तो अडकत गेला. तब्बल २० दिवस तो त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहून आला. हायप्रोफाईल राहणीमान, त्यात महागड्या गाड्यातून प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमधील बैठकांमुळे सुरेशही त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने बोरिवलीतील आरटीआय संस्थेचे काम त्यांच्याकडे आणले. संस्थेच्या नावावरचा कोट्यवधींचे धनादेश अडकून राहिले होते. संस्थेचे देवहंस यांना सुरेशकडून याबाबत समजताच त्यांनी त्याच्याकडे यादवसोबत भेट घालण्याचा आग्रह केला. तसेच त्यांनी दिल्ली जाऊनही यादवची भेट घेतल्याचे समजते. सुरेश याने देवहंस याच्यासोबत अकोल्याचे शेतकरी अशोक खाडे यांना कामासाठी भेट घ्यायचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर यादवने या दोघांना घेऊन ३१ मे रोजी दुपारी १ वाजता सहारा हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. यादव हा २४ मे रोजी मुंबईत आला होता. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमधील रुम नंबर २१०२ मध्ये तो वास्तव्याला होता. ठरल्याप्रमाणे ३१ मे रोजी सुरेश हा देवहंस आणि अशोक खाडेसोबत तेथे आला. मात्र बराच वेळ होऊनही त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तीन वाजता सुरेशने आणि खाडेने खोलीत प्रवेश केला तेव्हा तेथे पोलीस आधीपासूनच चौकशी करत होते. पोलिसांनी सुरेश आणि खाडेला ताब्यात घेत त्यांचे मोबाईल काढून घेत ते बंद केले. दोन्ही मोबाईल बंद झाल्यामुळे सुरेश आणि खाडेचे कुटुंबीय घाबरले. बराच शोध घेऊनही काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी विलेपार्ले आणि विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.तब्बल २८ ते ३० तासानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दोघांची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.