शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

अल्पवयीन असुरक्षितच!

By admin | Updated: April 29, 2016 03:07 IST

नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुंबई : नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतून दिवसाला २ ते ३ मुले बेपत्ता होत आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर तब्बल १३० मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कामाच्या वाढत्या ताणामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. सध्या शाळेला सुटी लागल्याने लहान मुले अधिकाधिक वेळ घराबाहेर असतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. पाल्य अचानक बेपत्ता झाल्यानंतर इतरांना दोष देण्यापेक्षा आपली मुले कोणाबरोबर, किती वेळ आणि काय खेळतात, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असली तरी पालकांनीही या बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.शहरातून दिवसाला सरासरी दोन ते तीन मुले बेपत्ता होत आहेत. यंदा पहिल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पैकी अवघ्या १५४ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. त्यापैकी १२० गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच तुलनेत २०१५ मध्ये पहिल्या साडेतीन महिन्यांत २३८ मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर १२१ मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या. (प्रतिनिधी)>प्रमाण अधिक असलेले परिसरभांडुप, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर अशा झोपडपट्टी विभागांत बालकांवर अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता होण्यामागची कारणे१४ ते १८ वर्षे वयोगटातील काही मुले आपल्या मर्जीने घर सोडतात, तर काही प्रेमप्रकरणामुळे पळून जातात. काही मुलांचे खंडणीसाठी अपहरण होते. जन्माला आल्यापासून आठ किंवा दहा वर्षे वयोगटातील मुलांचे लैंगिक शोषणासाठीही अपहरण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मूल न होणाऱ्या दाम्पत्यांना अवैध विक्रीसाठी, परदेशात पाठवण्यासाठी, भीक मागणाऱ्या टोळीत सहभागी करून घेण्यासाठी या चिमुरड्यांचे अपहरण होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.