शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन असुरक्षितच!

By admin | Updated: April 29, 2016 03:07 IST

नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुंबई : नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतून दिवसाला २ ते ३ मुले बेपत्ता होत आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर तब्बल १३० मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कामाच्या वाढत्या ताणामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. सध्या शाळेला सुटी लागल्याने लहान मुले अधिकाधिक वेळ घराबाहेर असतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. पाल्य अचानक बेपत्ता झाल्यानंतर इतरांना दोष देण्यापेक्षा आपली मुले कोणाबरोबर, किती वेळ आणि काय खेळतात, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असली तरी पालकांनीही या बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.शहरातून दिवसाला सरासरी दोन ते तीन मुले बेपत्ता होत आहेत. यंदा पहिल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पैकी अवघ्या १५४ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. त्यापैकी १२० गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच तुलनेत २०१५ मध्ये पहिल्या साडेतीन महिन्यांत २३८ मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर १२१ मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या. (प्रतिनिधी)>प्रमाण अधिक असलेले परिसरभांडुप, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर अशा झोपडपट्टी विभागांत बालकांवर अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता होण्यामागची कारणे१४ ते १८ वर्षे वयोगटातील काही मुले आपल्या मर्जीने घर सोडतात, तर काही प्रेमप्रकरणामुळे पळून जातात. काही मुलांचे खंडणीसाठी अपहरण होते. जन्माला आल्यापासून आठ किंवा दहा वर्षे वयोगटातील मुलांचे लैंगिक शोषणासाठीही अपहरण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मूल न होणाऱ्या दाम्पत्यांना अवैध विक्रीसाठी, परदेशात पाठवण्यासाठी, भीक मागणाऱ्या टोळीत सहभागी करून घेण्यासाठी या चिमुरड्यांचे अपहरण होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.