शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अल्पवयीन असुरक्षितच!

By admin | Updated: April 29, 2016 03:07 IST

नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुंबई : नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतून दिवसाला २ ते ३ मुले बेपत्ता होत आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर तब्बल १३० मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कामाच्या वाढत्या ताणामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. सध्या शाळेला सुटी लागल्याने लहान मुले अधिकाधिक वेळ घराबाहेर असतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. पाल्य अचानक बेपत्ता झाल्यानंतर इतरांना दोष देण्यापेक्षा आपली मुले कोणाबरोबर, किती वेळ आणि काय खेळतात, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असली तरी पालकांनीही या बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.शहरातून दिवसाला सरासरी दोन ते तीन मुले बेपत्ता होत आहेत. यंदा पहिल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पैकी अवघ्या १५४ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. त्यापैकी १२० गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच तुलनेत २०१५ मध्ये पहिल्या साडेतीन महिन्यांत २३८ मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर १२१ मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या. (प्रतिनिधी)>प्रमाण अधिक असलेले परिसरभांडुप, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर अशा झोपडपट्टी विभागांत बालकांवर अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता होण्यामागची कारणे१४ ते १८ वर्षे वयोगटातील काही मुले आपल्या मर्जीने घर सोडतात, तर काही प्रेमप्रकरणामुळे पळून जातात. काही मुलांचे खंडणीसाठी अपहरण होते. जन्माला आल्यापासून आठ किंवा दहा वर्षे वयोगटातील मुलांचे लैंगिक शोषणासाठीही अपहरण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मूल न होणाऱ्या दाम्पत्यांना अवैध विक्रीसाठी, परदेशात पाठवण्यासाठी, भीक मागणाऱ्या टोळीत सहभागी करून घेण्यासाठी या चिमुरड्यांचे अपहरण होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.