शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजबंदी अखेर उठली

By admin | Updated: December 11, 2014 23:42 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १९२ गावांतील बंदी मात्र कायम

सावंतवाडी : गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत असलेली गौण खनिजबंदी अखेर उच्च न्यायालयाने आज, गुरुवारी उठवली. मात्र, ही बंदी उठवत असताना कस्तुरीरंगन समितीने बंदी घातलेल्या १९२ गावांमधील बंदी कायम ठेवली आहे. यामध्ये आवाज फाऊंडेशन तसेच वनशक्ती या सामाजिक संस्थांनी मागणी केलेल्या आंबोली ते मांगेली या सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील संवेदनशील गावांचाही समावेश आहे.आजच्या निकालाने सध्या बंदी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, देवगड, वैभववाडी, कणकवली या तालुक्यांना दिलासा मिळाला आहे.सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने पश्चिम घाट संरक्षित व्हावा, यासाठी गौण खनिजावर बंदी घातल्याने वाळू, चिरे, खडी, विटा या बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू मिळणे दुरापास्त बनले होते. याबाबतची याचिका आवाज फाऊंडेशनने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याच कालावधीत पर्यावरणवाद्यांच्या मागणीनुसार पश्चिम घाट सुरक्षित राहावा यासाठी तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी माधव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. या समितीने पश्चिम घाटाचा अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. हा अहवाल न स्वीकारताच के. कस्तुरीरंगन समिती नेमली होती. समितीने पश्चिम घाटाचा दौरा करून अहवाल सरकारला दिला. या अहवालानुसार सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील १९२ गावे संरक्षित करण्याचा निर्णय घेतला होता.त्यातच आवाज फाऊंडेशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड तसेच वन्यप्राण्यांच्या संरक्षित क्षेत्राला बाधा येत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये पर्यावरणास हानिकारक प्रकल्प येणार नसल्याचे जाहीर केले. तसेच गौण खनिज बंदी घालत सुरक्षित क्षेत्रात तसेच पश्चिम घाट परिसरात गौण खनिज उत्खनन करता येणार नसल्याचे जाहीर केले.गौण खनिजबंदीमुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाले. पोलीस, महसूल यांच्या कारवाईने सर्वजण त्रस्त झाले होते. यामुळे वनशक्ती फाऊंडेशनने तीन महिन्यांपूर्वी आवाज फाऊंडेशनच्या याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी आज, गुरुवारी न्यायमूर्ती अनुप मेहता व न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी खंडपीठाने वनशक्तीची बाजू ऐकून घेत सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील कस्तुरीरंगन समितीने बंदी घातलेली १९२ गावे सोडून गौणखनिज बंदी उठवली आहे.तसेच वनशक्ती फाऊंडेशनने आंबोली ते मांगेली हा सह्याद्रीचा पट्टा संरक्षित असावा, अशी मागणी केली होती. त्यालाही उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामुळे सावंतवाडी, दोडामार्गमधील हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच गावात गौण खनिज काढता येणार आहे, तर कणकवली, वेंगुर्ले, कुडाळ, देवगड, वैभववाडी, मालवण या तालुक्यांना पूर्णत: दिलासा मिळाला. या गावांना गौण खनिज काढता येणार आहे. (प्रतिनिधी)नंतर बोलेन : माधव गाडगीळयाबाबत पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना विचारले असता, मी नंतर या विषयावर बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.दोडामार्ग तालुका संवेदनशीलच राहावा : दयानंदयाबाबत वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांना विचारले असता, आम्ही गौण खनिज बंदी उठावी यासाठी पुनर्विचार याचिका तीन महिन्यांपूर्वी दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी होऊन हा निकाल उच्च न्यायालयाने दिला असून आम्ही त्याचे स्वागत करत असल्याचे दयानंद यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दोडामार्ग तालुका संवेदनशीलच राहिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली