शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अल्पवयीन मुलाची प्रेमसंबंधातून हत्या

By admin | Updated: July 21, 2016 05:42 IST

बहिणीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या भावाने तिच्या प्रियकराला कुटुंबासह बळजबरीने आपल्या घरी नेऊन मारहाण केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाला

नवी मुंबई : बहिणीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या भावाने तिच्या प्रियकराला कुटुंबासह बळजबरीने आपल्या घरी नेऊन मारहाण केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नेरूळमध्ये घडली आहे. स्वप्निल सोनावणे (१५) असे या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र परशुराम नाईक (५०), मालती राजेंद्र नाईक (४५), सागर राजेंद्र नाईक (२५), साजेश राजेंद्र नाईक (२१), आशीष बाबूराव ठाकूर (२३), दुर्गेश विलास पाटील (२२), समीर मुजीबत शेख (२३) यांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी, हत्या, अपहरण असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नेरूळ सेक्टर १३ मधील एसबीआय वसाहतीत राहणाऱ्या स्वप्निल याचे दारावे गावातील एका १४ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही लहानपणापासून एकाच शाळेत शिकत होते व ते नुकतेच दहावी उत्तीर्ण झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मुलीचा भाऊ सागर राजेंद्र नाईक (२५) याला मिळाली होती. सोमवारी रात्री त्याने मित्रांच्या मदतीने स्वप्निलला वसाहतीबाहेर बोलावले आणि रिक्षातून दूर नेऊन धमकावले होते.पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास काही तरुणांनी घरी येऊन स्वप्निल व त्याच्या लहान बहिणीला धमकावले. हे कळताच स्वप्निलचे वडील घरी आले असता, त्याठिकाणी सागर हा त्याच्या साथीदारांसह होता. त्याने आधी स्वप्निलच्या संपूर्ण कुटुंबाला इमारतीच्या छतावर नेऊन खाली टाकण्याची धमकी दिली. नंतर ‘घरी येऊन आई-वडिलांची माफी मागितली, तरच तुमची सुटका होईल,’ असे धमकावले आणि त्यांना बळजबरीने दारावे गाव येथे घेऊन गेला.त्याच्या घराजवळ आधीच २५ ते ३० जणांचा जमाव जमलेला होता. तेथे गेल्यावर सागरने स्वप्निलला मारहाण केली. भीतिपोटी स्वप्निल व त्याचे आई-वडील पळू लागले असता, जमावाने पाठलाग करून तिघांनाही जबर मारहाण केली. या मारहाणीत स्वप्निलच्या डोक्याला व छातीवर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)>पोलिसांकडून दुर्लक्ष सागरने धमकावल्याची तक्रार घेऊन नेरूळ पोलीस ठाण्यात गेलो असता, पोलीस उपनिरीक्षक सोनाली राजगुरू यांनी, तुम्हाला ‘सैराट’ करायचे आहे का, अशी भीती दाखवत तक्रार न घेता परत पाठवले, असे सांगत स्वप्निलचे वडील शहाजी सोनावणे यांनी पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला आहे.दोघा पोलिसांचे निलंबन स्वप्निलच्या कुटुंबीयांच्या आरोपांची दखल घेत, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू करत पोलीस उपनिरीक्षक सोनाली राजगुरू व योगेश माने यांना निलंबित केले आहे.