शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

मंत्रालय नूतनीकरण खर्चात भरमसाठ वाढ !

By admin | Updated: November 20, 2014 04:42 IST

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारला नवीन वर्षापासून नूतनीकरण झालेल्या मंत्रालयातून काम सुरू करणे शक्य होणार नाही़ कारण नूतनीकरणाचा आतापर्यंतचा खर्च १६२ कोटींच्या पुढे गेला

संदिप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपाप्रणीत सरकारला नवीन वर्षापासून नूतनीकरण झालेल्या मंत्रालयातून काम सुरू करणे शक्य होणार नाही़ कारण नूतनीकरणाचा आतापर्यंतचा खर्च १६२ कोटींच्या पुढे गेला असून, हे काम करणारी युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे.मंत्रालयाला आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पुनर्बांधणीऐवजी नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या कामाकरिता एल अँड टी, शापूरजी पालनजी आणि युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी निविदा दाखल केल्या होत्या. एल अँड टीची निविदा १७६ कोटी रुपयांची, शापूरजीची निविदा १६६ कोटी रुपयांची तर युनिटीची निविदा १६२ कोटी रुपयांची होती. या सर्व निविदा जास्त रकमेच्या वाटल्याने सरकारने त्या रद्द करून फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचवेळी युनिटी कंपनीने हेच काम १३९ कोटी रुपयांत करून देण्याची तयारी दाखवल्याने त्यांना हे काम डिसेंबर २०१२ मध्ये दिले गेले. १० महिन्यांत त्यांनी हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. आता याच कामावरील खर्च त्यांच्या मूळ निविदा रकमेच्या म्हणजे १६२ कोटी रुपयांच्या पुढे गेला असल्याचे युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन किशोर अवर्सेकर यांनीच ‘लोकमत’ला सांगितले.अवर्सेकर म्हणाले की, सरकारने कामात वारंवार आपल्या मर्जीनुसार बदल केले. मुख्यमंत्र्यांचे दालन पहिल्या मजल्यावर हवे की सहाव्या मजल्यावर याचा निर्णय करण्यात घोळ घातला. अधिकाऱ्यांना दालने करून देण्याकरिता फेरफार केले गेले. सातवा मजला करारात समाविष्ट नव्हता. काही मंत्री व अधिकाऱ्यांनी त्यांची दालने सोडली नाहीत. बांधकामाकरिता सर्व साहित्य विदेशातून आयात केले आहे. कामाला विलंब झाल्याने डॉलरचा विनिमय दर, कामगारांचा खर्च, कंत्राटदाराची देणी यावरील खर्चात वाढ झाली. सरकारकडून कामाची बिले नियमित मंजूर झाली तरच काम करणे शक्य आहे. ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे बंधन पाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे न झाल्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ अटळ आहे.राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की, युनिटी कंपनीने आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने मंत्रालय नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याचे कारण पुढे केले आहे. कामाचे स्वरूप बदलले व काही मंत्री, अधिकाऱ्यांनी दालने रिकामी करून दिली नाही, हे खरे असले तरी कंपनीकडून वाढीव खर्चाचे केले जाणारे दावे आणि मुदतवाढीची केली जाणारी मागणी पटणारी नाही. सध्या मंत्रालयाबाहेर वेगवेगळी खाती हलवली आहेत़ त्या जागा सोडण्याची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. त्यामुळे आता मुदतवाढ देणे अशक्य आहे.