शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

बालगृहांच्या प्रश्नाबाबत मंत्र्यांची ‘चुप्पी’

By admin | Updated: February 16, 2015 03:54 IST

सह्याद्रीवर शनिवारी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंगणवाडी पोषण आहारासाठी १०० टक्के निधी देण्यात येईल,

मुंबई : सह्याद्रीवर शनिवारी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंगणवाडी पोषण आहारासाठी १०० टक्के निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र बालगृहातील अनाथ बालकांच्या पोषण आहार निधीबाबत ना अर्थमंत्री बोलले ना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेनी हा विषय काढला. परिणामी, बालगृहांप्रतीची शासनाची उदासीनता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महिला व बालविकास विभागाची अर्थसंकल्पपूर्व बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आली. या बैठकीस अर्थमंत्री मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रधान सचिव संजय कुमार यांची उपस्थिती होती. पोषण आहाराबाबत धोरण आखण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मात्र बालगृहांच्या थकित १२५ कोटींचा विषय प्रधान सचिव संजय कुमार यांनी काढलाच नाही, परिणामी वित्तमंत्र्यांना बालगृहांचा विषयच टाळल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे सुुभेदारी विश्रामगृहावर बालगृह चालकांना मुंबईत ‘सह्याद्री’वर होणाऱ्या बैठकीत बालगृह परिपोषण निधीबाबत निर्णय घेण्याचा शब्द दिला होता, शिवाय राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनीही मुंबईत चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या भेटी दरम्यान वित्तमंत्र्यांच्या बैठकीत बालगृहांच्या अनुदानाचा विषय मांडून प्रलंबित अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र या बैठकीत वित्तमत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मुंडे आणि ठाकूर यांनी अंगणवाडी ‘पोषणा’लाच ‘झुकते माप’ देऊन बालगृहांतील अनाथ बालकांच्या पोषणावर अन्याय केल्याची भावना बालगृहचालकांनी आदींनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)