शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

मंत्र्याच्या लाल, हिरव्या स्वाक्षऱ्या नियमबाह्य

By admin | Updated: July 3, 2016 02:05 IST

राज्यातील बहुतेक सगळे मंत्री महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, फायली आदींवर लाल अथवा हिरव्या शाईने शेरे लिहितात किंवा सह्या करतात. मात्र ही बाब पूर्णत: नियमबाह्य असल्याचे

- यदु जोशी,  मुंबई

राज्यातील बहुतेक सगळे मंत्री महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, फायली आदींवर लाल अथवा हिरव्या शाईने शेरे लिहितात किंवा सह्या करतात. मात्र ही बाब पूर्णत: नियमबाह्य असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.मंत्र्याचे पीए म्हणजे ‘चहापेक्षा किटली गरम’ अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडे केली होती. या पार्श्वभूमीवर, माहिती अधिकारात याबाबत माहिती घेतली असता, शासनाने मंत्र्याचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय साहाय्यक यांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चितच केलेल्या नाहीत, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले.निळ्या, लाल, हिरव्या शाईने सह्या करण्याच्या मंत्र्याच्या कार्यपद्धतीबाबत नेमके काय नियम आहेत, अशी विचारणादेखील राज्य शासनाच्या सेवेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने माहिती अधिकारात केली होती. यावर विभागाने राज्यपालांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर १९५९ रोजी काढण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकाचा संदर्भ देत स्पष्ट केले की, शासकीय टिप्पणी, मसुदा यावर तसेच शासकीय पत्रव्यवहार करताना निळ्या किंवा निळ्या/काळ्या शाईचाच वापर करावा. सहीसाठी इतर कोणत्याही शाईचा वापर करू नये, असा नियम आहे.अलीकडे पीए, पीएसमुळे राज्य सरकारमधील काही मंत्री अडचणीत आले. या अधिकाऱ्यांचे नेमके अधिकार कोणते याविषयी चर्चा सुरू झाली. मात्र असे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चितच केलेल्या नसल्यामुळे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध करून देता येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.अधिकारांचे अर्थ लावताना केली जाते मनमानीसध्याच्या अनेक मंत्री कार्यालयातील पीए, पीएस, ओएलसी हे त्यांच्या अधिकारांचे अर्थ आपापल्या सोयीने लावून घेतात. त्यातील काही जण टिप्पणी तयार करतात. त्यावर शेराही स्वत:च लिहितात आणि फक्त मंत्र्याची सही घेतात. जवळपास २० वर्षे वेगवेगळ्या मंत्र्याकडे पीए, पीएस राहिलेल्या एका अधिकाऱ्याच्या मते शासकीय फाइलमधील गोषवारा मंत्र्यांना समजावून सांगणे, मुख्यमंत्र्यांनी विभागाशी संबंधित बोलाविलेल्या बैठकीतील विषयांसंदर्भात मंंत्र्यांना अवगत करणे, मंत्रिमंडळ बैठकीसमोर येणाऱ्या विभागाच्या प्रस्तावांविषयी नेमकी स्थिती मंत्र्यांना सांगणे, केंद्र सरकारशी संबंधित पत्रव्यवहार सांभाळणे या पीएसच्या जबाबदाऱ्या असतात. त्याचे विकेंद्रीकरण त्यांनी पीए, ओएलसीमध्ये करणे अपेक्षित असते, असे स्पष्ट केले. हे परंपरेने चालत आले आहे. याची कार्यनियमावली नाही, अशी पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सह्यांसाठी लाल पेन वापरत नसत. वसंतराव नाईक यांच्यापासून लाल शाईचे पेन वापरायची पद्धत सुरू झाली. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाल शाईचा उपयोग करतात. मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असल्याने त्यांना हा अधिकार असल्याचे समर्थन केले जाते. लाल शाईने आदेश दिला म्हणजे ते काम तातडीने करायचे असते, असा संकेत असल्याचे प्रशासनात मानले जाते.