शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

राज्यमंत्री नावाला; अधिकार कॅबिनेटकडे! 'खात्यात काय चाललंय कळेना', बोलून दाखविली व्यथा

By दीपक भातुसे | Updated: June 6, 2025 13:03 IST

राज्य मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री असून ते सर्व पहिल्यांदाच मंत्रिपद भूषवत आहेत

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नसल्याने नाराज असलेले राज्यमंत्री आपल्या खातात काय चालले आहे यापासूनही अनभिज्ञ आहेत. काही कॅबिनेटमंत्र्यांनी तर संपूर्ण खात्याचा कारभार आपल्याच हाती ठेवल्याची राज्यमंत्र्यांची तक्रार आहे.

आपल्या विभागातील धोरणात्मक बाबी, मंत्रिमंडळात निर्णयासाठी जाणारे प्रस्ताव, वित्त विभागाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव, विधि व न्याय विभागाला सादर होणारे प्रस्ताव, विभागाकडे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे ही राज्यमंत्र्यांकडून कॅबिनेटमंत्र्यांकडे जाणे अपेक्षित असते.  सध्या अशी प्रकरणे बहुतांश विभागात थेट कॅबिनेट मंत्र्यांकडे जात असल्याने राज्यमंत्री खात्यामध्ये काय सुरू आहे याबाबत अनभिज्ञता पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयासह बोटावर मोजण्याइतके कॅबिनेटमंत्री राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याबाबत सकारात्मक आहेत. मात्र, अधिकारवाटपाची तुलना २०१४ ते २०१९ च्या काळातील अधिकारांशी केली जात आहे. 

सोयीसाठी राज्यमंत्रिपद?

राज्य मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री आहेत. हे सर्व पहिल्यांदाच मंत्रिपद भूषवत आहेत. मात्र मागील सहा महिन्यांचा अनुभव लक्षात घेता आम्हाला केवळ राजकीय सोय म्हणून मंत्री करण्यात आले आहे का? अशी या राज्यमंत्र्यांची भावना आहे. अधिकार नसताना नावाला मंत्रिपद भूषवायचे का? असा सवालही ते खासगीत विचारत आहेत.

महामंडळाकडूनही दुजाभाव

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना २०१४ पर्यंत राज्यमंत्र्यांना त्यांच्या विभागाचा विषय असेल तर मंत्रिमंडळ बैठकीला बोलावले जायचे, मात्र सध्या राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याचा विषय असला तरी बैठकीला बोलवले जात नाही. राज्यातील काही महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री आहेत. पण महामंडळाचे अधिकारी राज्यमंत्र्यांना कोणतीही माहिती पाठवत नाहीत, बैठकांचे निमंत्रण दिले जात नाही, महामंडळाचे कामकाजाचे इतिवृत्त पाठविले जात नाही. महामंडळे थेट कॅबिनेट मंत्र्यांशी संबंध ठेवतात, अशी गंभीर तक्रारही राज्यमंत्र्यांंनी बोलून दाखविली. निधीवाटपातही आमचे मत विचारात घेतले जात नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

अधिकारांचे वाटप करा

२०१६ आणि २०१९ ला राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याबाबत जे आदेश निघाले होते, किमान तेवढे अधिकार मिळावेत अशी राज्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. एका कॅबिनेट मंत्र्याने अगदी किरकोळ अधिकार राज्यमंत्र्यांना दिले, मात्र संबंधित राज्यमंत्र्यांनी आपल्याला हे अधिकारही नको असे संबंधित कॅबिनेट मंत्र्यांना कळवले. तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. २०१६ ते २०१९ या काळात राज्यमंत्र्यांना दिलेले अधिकार खूप कमी होते, त्यामुळे नव्याने विषयनिहाय फेरआढावा घेऊन अधिकार वाटप करावे, अशी राज्यमंत्र्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्री