शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

राज्यमंत्री नावाला; अधिकार कॅबिनेटकडे! 'खात्यात काय चाललंय कळेना', बोलून दाखविली व्यथा

By दीपक भातुसे | Updated: June 6, 2025 13:03 IST

राज्य मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री असून ते सर्व पहिल्यांदाच मंत्रिपद भूषवत आहेत

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नसल्याने नाराज असलेले राज्यमंत्री आपल्या खातात काय चालले आहे यापासूनही अनभिज्ञ आहेत. काही कॅबिनेटमंत्र्यांनी तर संपूर्ण खात्याचा कारभार आपल्याच हाती ठेवल्याची राज्यमंत्र्यांची तक्रार आहे.

आपल्या विभागातील धोरणात्मक बाबी, मंत्रिमंडळात निर्णयासाठी जाणारे प्रस्ताव, वित्त विभागाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव, विधि व न्याय विभागाला सादर होणारे प्रस्ताव, विभागाकडे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे ही राज्यमंत्र्यांकडून कॅबिनेटमंत्र्यांकडे जाणे अपेक्षित असते.  सध्या अशी प्रकरणे बहुतांश विभागात थेट कॅबिनेट मंत्र्यांकडे जात असल्याने राज्यमंत्री खात्यामध्ये काय सुरू आहे याबाबत अनभिज्ञता पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयासह बोटावर मोजण्याइतके कॅबिनेटमंत्री राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याबाबत सकारात्मक आहेत. मात्र, अधिकारवाटपाची तुलना २०१४ ते २०१९ च्या काळातील अधिकारांशी केली जात आहे. 

सोयीसाठी राज्यमंत्रिपद?

राज्य मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री आहेत. हे सर्व पहिल्यांदाच मंत्रिपद भूषवत आहेत. मात्र मागील सहा महिन्यांचा अनुभव लक्षात घेता आम्हाला केवळ राजकीय सोय म्हणून मंत्री करण्यात आले आहे का? अशी या राज्यमंत्र्यांची भावना आहे. अधिकार नसताना नावाला मंत्रिपद भूषवायचे का? असा सवालही ते खासगीत विचारत आहेत.

महामंडळाकडूनही दुजाभाव

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना २०१४ पर्यंत राज्यमंत्र्यांना त्यांच्या विभागाचा विषय असेल तर मंत्रिमंडळ बैठकीला बोलावले जायचे, मात्र सध्या राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याचा विषय असला तरी बैठकीला बोलवले जात नाही. राज्यातील काही महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री आहेत. पण महामंडळाचे अधिकारी राज्यमंत्र्यांना कोणतीही माहिती पाठवत नाहीत, बैठकांचे निमंत्रण दिले जात नाही, महामंडळाचे कामकाजाचे इतिवृत्त पाठविले जात नाही. महामंडळे थेट कॅबिनेट मंत्र्यांशी संबंध ठेवतात, अशी गंभीर तक्रारही राज्यमंत्र्यांंनी बोलून दाखविली. निधीवाटपातही आमचे मत विचारात घेतले जात नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

अधिकारांचे वाटप करा

२०१६ आणि २०१९ ला राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याबाबत जे आदेश निघाले होते, किमान तेवढे अधिकार मिळावेत अशी राज्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. एका कॅबिनेट मंत्र्याने अगदी किरकोळ अधिकार राज्यमंत्र्यांना दिले, मात्र संबंधित राज्यमंत्र्यांनी आपल्याला हे अधिकारही नको असे संबंधित कॅबिनेट मंत्र्यांना कळवले. तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. २०१६ ते २०१९ या काळात राज्यमंत्र्यांना दिलेले अधिकार खूप कमी होते, त्यामुळे नव्याने विषयनिहाय फेरआढावा घेऊन अधिकार वाटप करावे, अशी राज्यमंत्र्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्री