शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

केंद्र आणि राज्यातही हवे आठवलेंना मंत्रिपद

By admin | Updated: January 11, 2015 01:22 IST

खासदार रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाला राज्यातही सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : केंद्रीय मंत्रिपद आपल्याला मिळाले पाहिजे, ही मागणी कायम ठेवताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाला राज्यातही सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.रामदास आठवले म्हणाले, की राज्यात रिपाइंला सत्तेत सहभागी करून घेऊ, असे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मला राज्यात परत येण्यात रस नाही. त्याऐवजी आमच्या पक्षाच्या अन्य लोकांना संधी मिळावी. विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपासोबत राहिल्याने त्यांच्या १२२ जागा निवडून येऊ शकल्या. आम्ही शिवसेनेला साथ दिली असती तर त्यांच्या जागा वाढल्या असत्या. भाजपाने त्याबाबत जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे आठवले म्हणाले.२००९ पर्यंतच्या झोपड्या नियमित कराव्यात, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम १४ एप्रिलपासून सुरू करावे, शेतकरी वर्गावर असणारे सावकरांचे सर्व कर्ज माफ करावे, अशा मागण्याही आठवले यांनी केल्या. (प्रतिनिधी)