शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळांचे गाजर!

By admin | Updated: May 10, 2015 03:47 IST

सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच

मुंबई : सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रह शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. त्यावर येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षश्रेष्ठींची परवानगी मिळाल्यावर मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळे दिली जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. रिपाइंचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे दोन तास बैठक झाली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याकरिता भाजपाला साथ देताना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना सत्तेत वाटा देण्याची आश्वासने दिली होती. सहा महिने उलटले तरी त्यापैकी कुठलेच आश्वासन पूर्ण केलेले नाही याबद्दल तीव्र चीड घटकपक्षांनी व्यक्त केली. आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करतील अशाच नेत्याची आता आम्ही भेट घेऊ, अशी राणाभीमदेवी थाटाची घोषणा या नेत्यांनी केली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निमंत्रणावरून त्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांच्या कानी घातली. यावर मुख्यमंत्री फडणवीस बैठकीत म्हणाले की, केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळताच मित्रपक्षांना जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाईल. (विशेष प्रतिनिधी)