शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळांचे गाजर!

By admin | Updated: May 10, 2015 03:47 IST

सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच

मुंबई : सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रह शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. त्यावर येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षश्रेष्ठींची परवानगी मिळाल्यावर मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळे दिली जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. रिपाइंचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे दोन तास बैठक झाली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याकरिता भाजपाला साथ देताना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना सत्तेत वाटा देण्याची आश्वासने दिली होती. सहा महिने उलटले तरी त्यापैकी कुठलेच आश्वासन पूर्ण केलेले नाही याबद्दल तीव्र चीड घटकपक्षांनी व्यक्त केली. आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करतील अशाच नेत्याची आता आम्ही भेट घेऊ, अशी राणाभीमदेवी थाटाची घोषणा या नेत्यांनी केली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निमंत्रणावरून त्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांच्या कानी घातली. यावर मुख्यमंत्री फडणवीस बैठकीत म्हणाले की, केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळताच मित्रपक्षांना जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाईल. (विशेष प्रतिनिधी)