शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

मंत्र्यांनो, सरकारला जाब विचारा - उद्धव

By admin | Updated: December 4, 2015 03:10 IST

येत्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळासंदर्भात विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन दुष्काळासंदर्भात सरकारला जाब विचारा, असा जाहीर आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : येत्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळासंदर्भात विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन दुष्काळासंदर्भात सरकारला जाब विचारा, असा जाहीर आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांना दिला. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि तो जनतेमध्ये फिरणारा असेल. केवळ इकडे-तिकडे फिरणारा नसेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाची वर्षपूर्ती आणि सेनेच्या १० मंत्र्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गुरुवारी रवींद्र नाट्यमंदिरात झाले. यावेळी उद्धव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी योजनांची अंमलबजावणी होते का,याची पाहणी तर शिवसेना विरोधीपक्ष कसा ठरतो? जनतेसाठी रस्त्यावर आंदोलन करणारा शिवसैनिक हा मंत्री झाला आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेत पाठवले आहे. त्यामुळे जनतेच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. डान्सबारला परवानगी व गणपती उत्सवात मात्र अनेक बंधने, यावर भाष्य करतांना उद्धव म्हणाले की, कोर्टात सरकारने बाजू ठामपणे मांडली पाहिजे. (प्रतिनिधी)नाव न घेता टोलेबाजीशिवेसेनेने सध्या दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र काहींना त्याचीही पोटदुखी झाली.दुष्काळग्रस्तांसाठी ९२० कोटी केंद्राकडून राज्याला मिळाले असे सांगण्यात येते. पण केंद्रीय म्हणतात अजून राज्यसरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी प्रस्तावच आलेला नाही. जनतेने नेमके काय समजायचे?भार्इंचा अहवाल सर्वांत लहानमंत्री रामदास कदम यांचा अहवाल सर्वांत लहान होता. मात्र तो छोटा असला तरी, त्यांचे कार्य मोठे असल्याचे प्रमाणपत्र थेट उद्धव यांनी देताच सभागृहात चांगलीच खसखस पिकली.ही वेगळी चूल नाहीजनतेसाठी केलेल्या कामाचा अहवाल जनतेसमोर मांडणे हा काय गुन्हा आहे का, असा सवाल करून आजचा सोहळा ही वेगळी चूल नाही. सरकार म्हणून आमचा चेहरा आम्ही यानिमित्त दाखवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.