शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सेवा मंडळांच्या बदल्यांत मंत्र्यांचा हस्तक्षेप

By admin | Updated: June 28, 2016 04:09 IST

नागरी सेवा मंडळाने सुचविलेल्या बदल्यांमध्ये मंत्रीस्तरावर होत असलेला हस्तक्षेप तातडीने थांबविण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली

मुंबई : प्रत्येक विभागाच्या नागरी सेवा मंडळाने सुचविलेल्या बदल्यांमध्ये मंत्रीस्तरावर होत असलेला हस्तक्षेप तातडीने थांबविण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. काही विभाग या मंडळाच्या बैठकीच घेत नाहीत वा औपचारिकता म्हणून कागदोपत्री बैठक घेऊन टाकतात ही बाब आक्षेपार्ह असल्याची भूमिका महासंघाने मांडली आहे. ‘लोकमत’ने गेले तीन दिवस कृषी विभागातील अनेक नियमबाह्य बदल्यांवर प्रकाश टाकला. केवळ कृषी विभागच नाही तर आरोग्य, आदिवासी विकाससह विविध विभागांमध्ये नियमबाह्य बदल्या झाल्याची बाब आता समोर येत आहे. अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी महसूल विभागातील बदल्यांचे मुख्यमंत्र्यांनी विकेंद्रीकरण केले पण केवळ तेवढे पुरेसे नसून सर्वच विभागांबाबत तसे घडले पाहिजे, असे स्पष्ट मत आज लोकमतशी बोलताना व्यक्त केले. गाठीभेटी संस्कृतीद्वारे इच्छित स्थळी बदली मिळविलेले अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक राहत नाही. ते कोणाला जुमानत नाहीत, असा अनुभव आहे. आमदारांनी सुचविलेल्या बदल्यांची शहनिशा केली पाहिजे. आमदारांचा आग्रह होता म्हणून बदल्या केल्या अशी भूमिका घेऊन मंत्र्यांनी आपला बचाव करणे सर्वथा गैर असल्याचे ते म्हणाले.गडचिरोलीचे आमदार अन् ठाण्याची बदलीआमदारांनी मतदारसंघातील अधिकाऱ्याची बदली सुचविली असेल तर ती मान्य करण्यास हरकत नाही. पण मतदारसंघाबाहेरील सुचविलेली बदली स्वीकारू नये, अशी मागणी अधिकारी महासंघाने केली आहे. गडचिरोलीतील आमदार ठाण्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या वा मुंबईतील अधिकाऱ्याच्या बदलीसाठी दबाव आणतात. गाठीभेटी संस्कृतीचा वास येतो, असे म्हटले आहे.मे संपला तरी बदल्यांचा हंगाम सुरूचसार्वत्रिक बदल्या ३१ मे पर्यंत कराव्यात, असे बदल्यांचा कायदा सांगतो. मात्र, जून संपत आला तरी विविध विभागांच्या बदल्या सुरूच आहेत. सामान्य प्रशासन, वैद्यकीय शिक्षण, महसूल आदी विभागांचा समावेश आहे.मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रमहसूल विभाग बदलून देताना वाटपाच्या वेळी महिला अधिकारी/कर्मचारी गर्भवती असल्यास वा त्यांचे मूल लहान असल्यास त्यांच्या पसंतीचा महसूल विभाग द्यावा, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आधी ही सुविधा होती ; मात्र नंतर ती बंद करण्यात आली. सरळसेवा भरती किंवा पदोन्नतीने पदस्थापना देताना वैद्यकीय कारण असल्यास, आपसात बदली असल्यास, पती-पत्नी एकत्रिकरण असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या विनंतीचा तो रुजू झाल्यानंतर एक वर्षाने विचार न करता तत्काळ विचार केला जावा, असे महाजन यांनी म्हटले आहे.