शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
7
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
8
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
9
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
10
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
11
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
12
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
13
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
14
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
15
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
16
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
17
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
18
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
19
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
20
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

मंत्रीपदी केळकर, चव्हाण की कथोरे?

By admin | Updated: April 19, 2016 02:12 IST

राज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, याकरिता भाजपा आमदारांचा आग्रह असून ठाणे जिल्ह्याचा विचार करता संजय केळकर

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीराज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, याकरिता भाजपा आमदारांचा आग्रह असून ठाणे जिल्ह्याचा विचार करता संजय केळकर, रवींद्र चव्हाण व किसन कथोरे यांच्यात मंत्रीपदाकरिता रस्सीखेच सुरू आहे.भाजपा आमदारांत नाराजी दूर केली नाही तर महापालिका निवडणुकीला सामोरे जाणे पक्षाला कठीण जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा ठाणे जिल्ह्यातील भाजपा वर्तुळात सुरू झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपाची ताकद वाढवण्याची जबाबदारी संजय केळकर व शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यावर सोपवलेली आहे. सध्या ठाणे महापालिकेत भाजपाचे केवळ आठ सदस्य आहेत. शिवसेनेचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताकदीचा मुकाबला केळकर-लेले जोडगोळीला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रीपद मिळावे, अशी केळकर यांची इच्छा असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून समजले. मात्र, केळकर हे मास लीडर नसल्याने त्यांना मंत्री करून पक्षाला किती लाभ होणार, असा सवाल त्यांचे विरोधक करीत आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी भाजपाची ताकद वाढवली. मागीलवेळी जेमतेम नऊ नगरसेवक असलेल्या भाजपाचे ४२ नगरसेवक सभागृहात आहेत. त्यामुळे त्याआधारे आपल्याला मंत्रीपद मिळावे, ही चव्हाण यांची अपेक्षा आहे. कल्याण-डोंबिवलीतील चव्हाण यांचे संघटन कौशल्य पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कुडाळ नगरपरिषदेत कमळ फुलवण्यासाठी माजीमंत्री नारायण राणे यांच्याशी दोन हात करण्याकरिता धाडले होते. मात्र, तेथे काँग्रेसने बाजी मारली असून भाजपाला १४ पैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे चव्हाण यांच्या मंत्रीपदाच्या आकांक्षेला काहीसा धक्का बसल्याचे बोलले जाते.आ. किसन कथोरे हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मुरबाड व ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व त्यांनी मोडीत काढल्याने त्यांचा मंत्रीपदाचा दावा भक्कम आहे. मात्र, त्यांना नुकतीच प्रदेश भाजपाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रीपद देताना पक्षाने ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला तर कथोरे यांना पक्षातील पदावर समाधान मानावे लागेल. अन्य पक्षातून आलेल्या व्यक्तींना थेट मंत्रीपद देण्यास पांडुरंग फुंडकर व तत्सम ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे.आ. नरेंद्र पवार हे दुष्काळी भागात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाकरिता दानवे यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. मुंबई मनपाबरोबर ठाण्याची निवडणूक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्वाधिक लक्ष हे मुंबईवर राहिल्यास ठाण्याची जबाबदारी समर्थपणे हाताळण्यासाठी एका आमदाराला मंत्रीपद देऊन ताकद द्यावी लागेल. आता फडणवीस यांची पसंती कुणाला, त्याची चर्चा आहे.