शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

न्यूनतम टेंडरची प्रथा बंद

By admin | Updated: June 26, 2015 02:18 IST

ज्या कंत्राटदाराची निविदा न्यूनतम दराची (लोएस्ट टेंडर) आहे, त्यालाच कंत्राट देण्याची वर्षानुवर्षांपासूनची आणि खाबुगिरीला वाव देणारी पद्धत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केली

यदु जोशी, मुंबईज्या कंत्राटदाराची निविदा न्यूनतम दराची (लोएस्ट टेंडर) आहे, त्यालाच कंत्राट देण्याची वर्षानुवर्षांपासूनची आणि खाबुगिरीला वाव देणारी पद्धत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केली आहे. महिला व बालकविकास खात्यातील २०६ कोटींची खरेदी वादग्रस्त ठरलेली असताना सरकारने हा निर्णय घेतला.शासकीय खरेदीसाठी आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, प्राप्त निविदांपैकी न्यूनतम दराची निविदा फक्त न्यूनतम दर आहे म्हणून स्वीकारण्यात येणार नाही. तर खरेदी करण्यात यावयाच्या बाबींच्या निविदेचा न्यूनतम दर हा बाजारभावाशी सुसंगत असेल तरच ती निविदा स्वीकारण्यात येईल, असा आदेश वित्त विभागाने आज जारी केला आहे. एखाद्या निविदेमधील दर बाजारभावाशी पडताळून पाहणे अनिवार्य असेल. त्यासाठी खरेदी समिती असेल. न्यूनतम दराच्या नावाखाली बाजारभावापेक्षा जास्त दर लावल्यानंतर कंत्राटदार, अधिकारी, लोकप्रतिनिधी ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांचे भागीदार बनत असत. सरकारी खरेदीतील गैैरव्यवहारांचा उगम येथूनच होत असे. तो उगम आजच्या निर्णयाने बंद होईल, अशी अपेक्षा आहे. न्यूनतम दराच्या निविदेमध्ये बाजार दरापेक्षा अतिशय कमी दर नमूद केले असतील तर ते कंत्राटदाराला परवडते कसे, याचीही चौकशी करून कंत्राटदाराने नमूद केलेली कारणे खरेदी समितीला समाधानकारक वाटली नाहीत तर ती निविदादेखील रद्द केली जाणार आहे. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हा बदल करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा विचार होता. तसा प्रस्ताव वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तयार केला. वित्त विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. आतापर्यंत अंदाजपत्रकीय दरापेक्षा पाच ते दहा टक्के जास्त वा कमी दराची न्यूनतम निविदा असेल तर तिला मंजुरी देणे समर्थनीय असल्याचे मानले जाते. कारण पाच-दहा टक्के दरवाढ ही नैसर्गिक आहे, पण स्पष्ट नियमाअभावी १५ ते ५० टक्के वा त्यापेक्षाही जादा दराच्या निविदा न्यूनतम असल्याच्या नावाखाली यापूर्वी स्वीकारण्यात आल्याची उदाहरणे आहेत. बाजारभाव आणि न्यूनतम निविदेतील नमूद दर यात किती टक्के तफावत असली तर ती निविदा रद्द करावी, असे आजच्या आदेशात कुठेही म्हटलेले नाही. केवळ दोन दर सुसंगत असले तरच निविदा स्वीकृत केली जाईल, असे म्हटले जाईल. त्यामुळे ही सुसंगती प्रत्येक कार्यालयातील खरेदी समितीगणिक बदलणार तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.