शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर

By admin | Updated: October 20, 2016 04:06 IST

अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा प्रश्न सध्या केडीएमसीच्या सुरक्षा विभागाला पडला आहे.

डोंबिवली : अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा प्रश्न सध्या केडीएमसीच्या सुरक्षा विभागाला पडला आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्या असून तेथील सुरक्षा धोक्यात आली आहे.सुरक्षारक्षकांची २६२ पदे मंजूर आहेत. त्यातील १२९ पदे सध्या रिक्त आहेत. डोंबिवली विभागासाठी ५५ सुरक्षारक्षक असले तरी प्रत्यक्षात ४८ जणच कार्यरत आहेत. एकंदरीतच आवाका पाहता तेथे ८५ सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. काहींची नेमणूक डोंबिवलीसाठी झाली असताना त्यांनी वर्षानुवर्षे कल्याणमधील महापालिका मुख्यालयात ठाण मांडल्याचे वास्तव आहे. नवीन भरती होणाऱ्यांचा कल सर्वसाधारणपणे अग्निशामक दल आणि लिपिक होण्याकडे असतो. निवृत्त झालेल्या सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त राहत असल्याने मनुष्यबळाची कमतरता नेहमी जाणवते. या परिस्थितीवर तोडगा म्हणून केडीएमसीने महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाचे ३४ जण घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आजवर याला मुहूर्त मिळालेला नाही. सुरक्षारक्षकांच्या कमतरतेमुळे उद्यान तसेच बंद अवस्थेत असलेल्या महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्या आहेत. सूतिकागृह, बालभवन, पुसाळकर उद्यान, पु.भा. भावे सभागृहाची वास्तू, अष्टगणेश उद्यान, महात्मा गांधी उद्यान या मालमत्तांची सुरक्षा सुरक्षारक्षक नसल्याने धोक्यात आली आहे. यात मद्यपी, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुल यांना मोकळे रान मिळाले आहे. (प्रतिनिधी)>क्रीडासंकुल परिसराची जबाबदारी एकावरच विशेष म्हणजे, सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, तरणतलाव, भांडार विभाग, ‘इ’ प्रभाग कार्यालय या मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ एकाच सुरक्षारक्षकावर आहे. या परिस्थितीमुळे सुरक्षारक्षकांच्या सार्वजनिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जादा कामाचा ताण पडत असल्याने सुरक्षारक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.