शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर

By admin | Updated: October 20, 2016 04:06 IST

अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा प्रश्न सध्या केडीएमसीच्या सुरक्षा विभागाला पडला आहे.

डोंबिवली : अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा प्रश्न सध्या केडीएमसीच्या सुरक्षा विभागाला पडला आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्या असून तेथील सुरक्षा धोक्यात आली आहे.सुरक्षारक्षकांची २६२ पदे मंजूर आहेत. त्यातील १२९ पदे सध्या रिक्त आहेत. डोंबिवली विभागासाठी ५५ सुरक्षारक्षक असले तरी प्रत्यक्षात ४८ जणच कार्यरत आहेत. एकंदरीतच आवाका पाहता तेथे ८५ सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. काहींची नेमणूक डोंबिवलीसाठी झाली असताना त्यांनी वर्षानुवर्षे कल्याणमधील महापालिका मुख्यालयात ठाण मांडल्याचे वास्तव आहे. नवीन भरती होणाऱ्यांचा कल सर्वसाधारणपणे अग्निशामक दल आणि लिपिक होण्याकडे असतो. निवृत्त झालेल्या सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त राहत असल्याने मनुष्यबळाची कमतरता नेहमी जाणवते. या परिस्थितीवर तोडगा म्हणून केडीएमसीने महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाचे ३४ जण घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आजवर याला मुहूर्त मिळालेला नाही. सुरक्षारक्षकांच्या कमतरतेमुळे उद्यान तसेच बंद अवस्थेत असलेल्या महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्या आहेत. सूतिकागृह, बालभवन, पुसाळकर उद्यान, पु.भा. भावे सभागृहाची वास्तू, अष्टगणेश उद्यान, महात्मा गांधी उद्यान या मालमत्तांची सुरक्षा सुरक्षारक्षक नसल्याने धोक्यात आली आहे. यात मद्यपी, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुल यांना मोकळे रान मिळाले आहे. (प्रतिनिधी)>क्रीडासंकुल परिसराची जबाबदारी एकावरच विशेष म्हणजे, सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, तरणतलाव, भांडार विभाग, ‘इ’ प्रभाग कार्यालय या मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ एकाच सुरक्षारक्षकावर आहे. या परिस्थितीमुळे सुरक्षारक्षकांच्या सार्वजनिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जादा कामाचा ताण पडत असल्याने सुरक्षारक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.