शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

लाखोळी डाळीरील बंदी उठली ; शास्त्रज्ञ म्हणतात, धोका कायम!

By admin | Updated: January 23, 2016 01:57 IST

नवे वाण विकसित, पण न्यूरोटॉक्सिक आम्लाचे प्रमाण कायम?

राजरत्न सिरसाट/अकोला: भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने लाखोळी डाळीवरील बंदी नुकतीच उठवली असली, तरी काही कृषिशास्त्रज्ञ अद्यापही या डाळीमुळे अर्धांगवायूचा धोका असल्याचा इशारा देत आहेत; पण लाखोळा डाळीवरील बंदी उठविण्यासाठी एक दशकापासून लढा देणारे डॉ. शांतीलाल कोठारी ही डाळ खाण्यासाठी निर्धोक असल्याचे ठामपणे सांगत असून, एकूणच परिस्थिती सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. देशांतर्गत डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र कमी असून, मानवाला लागणारी पूरक प्रथिने तुरीसह इतर डाळींमध्येही असल्याने देशातील लोकसंख्येची गरज बघून, डाळींची आयात केली जात आहे. डाळींची गरज भागविण्यासाठी या पिकांचे देशांतर्गत क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात आहे. यात एकेकाळी उत्पादन व खाण्यावर बंदी घातलेल्या लाखोळी डाळीचा उपयोग वाढविण्यावर आता भर देण्यात असून, त्यासाठी या डाळीवरील बंदी नुकतीच उठवण्यात आली. भारतीय कृषी संशोधन परिषदेची पुसा येथील डाळवर्गीय संशोधन संस्था व छत्तीसगढ कृषी विद्यापीठाने नवे संशोधन करू न कमी विषाक्त (न्यूरोटॉक्सिक अँसिड) असलेल्या लाखोळीच्या डाळीचे वाण विकसित केले असून, हे नवे वाण पेरणीसाठी उपलब्ध केले आहे; परंतु या डाळीचे सतत सेवन केल्यास या आम्लाचे शरीरात साचणारे प्रमाण आरोग्याला अपायकारक ठरू शकतात, असे अनेक कृषितज्ज्ञांचे मत आहे. लाखोळी डाळीचे या राज्यात ५0 हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्र आहे. विदर्भात यातील १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. विदर्भात आजही पारंपरिक लाखाची डाळ धान काढण्याच्या पंधरा दिवस अगोदर शेतात फेकून दिली जाते. याच फेकलेल्या डाळीचे उत्पादन धानउत्पादक शेतकरी घेत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागातर्फे शेतकर्‍यांना मात्र नव्याने संशोधित, कमी विषाक्त असलेले वाण पेरणीसाठी वापरण्याची शिफारस केली जात आहे; परंतु शेतकर्‍यांना संशोधित वाण मिळत नसल्याने शेतकरी आजही पारंपरिक लाखोळी डाळीचाच पेरणीसाठी वापर करीत आहेत. लाखोळी डाळीत न्यूरोटॉक्सिक अँसिड असल्याने तिचे सतत सेवन केल्यास अर्धांगवायू होतो; परंतु पुसा आणि छत्तीसढ विद्यापीठाने लाखोळीचे नवे वाण विकसित केले . शेतकर्‍यांना नवीन वाण पेरण्याची आता शिफारस करण्यात येत असल्याचे पंदेकृविच्या ,कडधान्य संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. ए.एन. पाटील यांनी सांगीतले तर ५५ वर्षांत लाखोळी डाळीने कधीच कुणाला अर्धांगवायू झाल्याचे उदाहरण नाही. लाखोळी डाळ कधीच नुकसानकारक नव्हती. उलट ती आरोग्याला पूरक असल्याचे नागपूर येथील समाजसेवी डॉ. शांतीलाल कोठारी यांनी स्पष्ट केले.