शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

लाखोळी डाळीरील बंदी उठली ; शास्त्रज्ञ म्हणतात, धोका कायम!

By admin | Updated: January 23, 2016 01:57 IST

नवे वाण विकसित, पण न्यूरोटॉक्सिक आम्लाचे प्रमाण कायम?

राजरत्न सिरसाट/अकोला: भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने लाखोळी डाळीवरील बंदी नुकतीच उठवली असली, तरी काही कृषिशास्त्रज्ञ अद्यापही या डाळीमुळे अर्धांगवायूचा धोका असल्याचा इशारा देत आहेत; पण लाखोळा डाळीवरील बंदी उठविण्यासाठी एक दशकापासून लढा देणारे डॉ. शांतीलाल कोठारी ही डाळ खाण्यासाठी निर्धोक असल्याचे ठामपणे सांगत असून, एकूणच परिस्थिती सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. देशांतर्गत डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र कमी असून, मानवाला लागणारी पूरक प्रथिने तुरीसह इतर डाळींमध्येही असल्याने देशातील लोकसंख्येची गरज बघून, डाळींची आयात केली जात आहे. डाळींची गरज भागविण्यासाठी या पिकांचे देशांतर्गत क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात आहे. यात एकेकाळी उत्पादन व खाण्यावर बंदी घातलेल्या लाखोळी डाळीचा उपयोग वाढविण्यावर आता भर देण्यात असून, त्यासाठी या डाळीवरील बंदी नुकतीच उठवण्यात आली. भारतीय कृषी संशोधन परिषदेची पुसा येथील डाळवर्गीय संशोधन संस्था व छत्तीसगढ कृषी विद्यापीठाने नवे संशोधन करू न कमी विषाक्त (न्यूरोटॉक्सिक अँसिड) असलेल्या लाखोळीच्या डाळीचे वाण विकसित केले असून, हे नवे वाण पेरणीसाठी उपलब्ध केले आहे; परंतु या डाळीचे सतत सेवन केल्यास या आम्लाचे शरीरात साचणारे प्रमाण आरोग्याला अपायकारक ठरू शकतात, असे अनेक कृषितज्ज्ञांचे मत आहे. लाखोळी डाळीचे या राज्यात ५0 हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्र आहे. विदर्भात यातील १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. विदर्भात आजही पारंपरिक लाखाची डाळ धान काढण्याच्या पंधरा दिवस अगोदर शेतात फेकून दिली जाते. याच फेकलेल्या डाळीचे उत्पादन धानउत्पादक शेतकरी घेत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागातर्फे शेतकर्‍यांना मात्र नव्याने संशोधित, कमी विषाक्त असलेले वाण पेरणीसाठी वापरण्याची शिफारस केली जात आहे; परंतु शेतकर्‍यांना संशोधित वाण मिळत नसल्याने शेतकरी आजही पारंपरिक लाखोळी डाळीचाच पेरणीसाठी वापर करीत आहेत. लाखोळी डाळीत न्यूरोटॉक्सिक अँसिड असल्याने तिचे सतत सेवन केल्यास अर्धांगवायू होतो; परंतु पुसा आणि छत्तीसढ विद्यापीठाने लाखोळीचे नवे वाण विकसित केले . शेतकर्‍यांना नवीन वाण पेरण्याची आता शिफारस करण्यात येत असल्याचे पंदेकृविच्या ,कडधान्य संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. ए.एन. पाटील यांनी सांगीतले तर ५५ वर्षांत लाखोळी डाळीने कधीच कुणाला अर्धांगवायू झाल्याचे उदाहरण नाही. लाखोळी डाळ कधीच नुकसानकारक नव्हती. उलट ती आरोग्याला पूरक असल्याचे नागपूर येथील समाजसेवी डॉ. शांतीलाल कोठारी यांनी स्पष्ट केले.