शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

विदर्भात लाखो कृषी पंपाचे उर्जीकरण!

By admin | Updated: April 4, 2017 00:12 IST

गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे.

आठ जिल्ह्यातील चित्र : कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण!

ब्रम्हानंद जाधव - बुलडाणाकृषी पंपाना विद्युत जोडणी करून कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले असून गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे. कृषी पंपांना वीज जोडण्या उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. डॉ. दांडेकर समितीने १९८४ मध्ये तसेच अनुशेष व निर्देशांक समितीने १९९७ मध्ये सादर केलेल्या अहवालात कृषी पंपांचा अनुशेष ठरवताना प्रत्येक जिल्ह्यात ऊर्जीकरण झालेले एकूण कृषी पंप आणि एकूण पिकाखालील क्षेत्र याचा विचार करून प्रती हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्रामागे असलेले कृषी पंप यांची सरासरी काढली, तसचे ज्या जिल्ह्याची सरासरी राज्यापेक्षा जास्त आहे, तेथे अनुशेष नाही आणि राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनुशेष आहे, असे ठरवण्यात आले होते. राज्य सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या कृषी पंपांची संख्या गृहित धरून भौतिक अनुशेष ठरवण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या नऊ जिल्ह्यांत १ लाख ७१ हजार ७४२ अशाप्रकारे कृषीपंप विद्युतीकरणाचा अनुशेष निर्धारित केला होता. विदर्भातील या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यांमधील कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष कायम राहत होता. परंतू सध्या विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात ४१ हजार ४६३ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात ७ हजार २३, यवतमाळ जिल्ह्यात ४७ हजार ७७६, वर्धा जिल्ह्यात २ हजार ७३९, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १६ हजार ७४६, चंद्रपूर जिल्ह्यात ३८ हजार ७९२, गडचिरोली जिल्ह्यात १५ हजार ७२१ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. कृषी पंप विद्युतीकरणाचे अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातून निवडलेल्या आठ जिल्ह्यापैकी केवळ गडचीरोली जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला नाही.दोन जिल्ह्यांचा अनुशेष शिल्लकअनुशेष व निर्देशांक समितीने कृषीपंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष घोषीत केलेल्या १५ जिल्ह्यात अनुशेष शिल्लक होता. त्यापैकी सध्या रत्नागिरी व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील अनुशेष शिल्लक आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेंअतर्गत कृषीपंप वीज जोडणी घेण्यास पात्र राहणार आहेत. तसेच १०७ अश्वशक्तीपर्यंत वीजभार असलेल्या कृषीपंपानाच सदर योजनेंतर्गत वीज जोडणी घेण्यासाठी लाभार्थी पात्र राहणार आहेत.