शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

विदर्भात लाखो कृषी पंपाचे उर्जीकरण!

By admin | Updated: April 4, 2017 00:12 IST

गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे.

आठ जिल्ह्यातील चित्र : कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण!

ब्रम्हानंद जाधव - बुलडाणाकृषी पंपाना विद्युत जोडणी करून कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले असून गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे. कृषी पंपांना वीज जोडण्या उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. डॉ. दांडेकर समितीने १९८४ मध्ये तसेच अनुशेष व निर्देशांक समितीने १९९७ मध्ये सादर केलेल्या अहवालात कृषी पंपांचा अनुशेष ठरवताना प्रत्येक जिल्ह्यात ऊर्जीकरण झालेले एकूण कृषी पंप आणि एकूण पिकाखालील क्षेत्र याचा विचार करून प्रती हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्रामागे असलेले कृषी पंप यांची सरासरी काढली, तसचे ज्या जिल्ह्याची सरासरी राज्यापेक्षा जास्त आहे, तेथे अनुशेष नाही आणि राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनुशेष आहे, असे ठरवण्यात आले होते. राज्य सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या कृषी पंपांची संख्या गृहित धरून भौतिक अनुशेष ठरवण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या नऊ जिल्ह्यांत १ लाख ७१ हजार ७४२ अशाप्रकारे कृषीपंप विद्युतीकरणाचा अनुशेष निर्धारित केला होता. विदर्भातील या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यांमधील कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष कायम राहत होता. परंतू सध्या विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात ४१ हजार ४६३ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात ७ हजार २३, यवतमाळ जिल्ह्यात ४७ हजार ७७६, वर्धा जिल्ह्यात २ हजार ७३९, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १६ हजार ७४६, चंद्रपूर जिल्ह्यात ३८ हजार ७९२, गडचिरोली जिल्ह्यात १५ हजार ७२१ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. कृषी पंप विद्युतीकरणाचे अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातून निवडलेल्या आठ जिल्ह्यापैकी केवळ गडचीरोली जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला नाही.दोन जिल्ह्यांचा अनुशेष शिल्लकअनुशेष व निर्देशांक समितीने कृषीपंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष घोषीत केलेल्या १५ जिल्ह्यात अनुशेष शिल्लक होता. त्यापैकी सध्या रत्नागिरी व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील अनुशेष शिल्लक आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेंअतर्गत कृषीपंप वीज जोडणी घेण्यास पात्र राहणार आहेत. तसेच १०७ अश्वशक्तीपर्यंत वीजभार असलेल्या कृषीपंपानाच सदर योजनेंतर्गत वीज जोडणी घेण्यासाठी लाभार्थी पात्र राहणार आहेत.