शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

तूर डाळ खरेदीने शेतकरी कंपन्या झाल्या लक्षाधीश

By admin | Updated: March 20, 2017 08:53 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण संस्था (आत्मा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १० शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत/विवेक चांदूरकर

बुलडाणा, दि. 20 - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण संस्था (आत्मा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १० शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांना हमी भावात तूर खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले असून, यातून मिळणाऱ्या कमिशनच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांचा फायदा झाला आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी यापासून लाभान्वित झाले आहेत. राज्य शासनाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या अर्थहाय्याच्या मदतीने जिल्ह्यात शेतकरी बचत गट स्थापण करण्यात आले. या बचतगटांना एकत्र करून दहा शेतकरी कंपन्या स्थापण करण्यात आल्या.

शासनाने यावर्षी तूरीला ५०४० रूपये हमीभाव दिला आहे. जिल्ह्यात सात ठिकाणी नाफेडने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, सध्या बाजारात तुरीचे भाव पडले असून, केवळ ३२०० ते ३५०० रूपयांमध्ये तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करीत आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी नाफेडचे केवळ सातच खरेदी केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होवू नये म्हणून शेतकरी कंपन्यांना हमीभावात तूर खरेदी करण्याचे अधिकार शासनाच्यावतीने देण्यात आले.

शेतकरी कंपन्यांची तूर खरेदीसाठी सब एजंट म्हणून नेमणूक करण्यात आली. जिल्ह्यात दहा शेतकरी कंपन्या तुरीची खरेदी करीत आहेत. १५ मार्चपर्यंत आत्मांतर्गत असलेल्या दहा शेतकरी कंपन्यांनी ३४ हजार ७० क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तूर खरेदीवर शेतकरी कंपन्यांना एक टक्के कमीशन देण्यात येणार आहे. शेतकरी कंपन्यांनी हजारो क्विंटल तूर खरेदी केली असल्यामुळे त्यांना लक्षावधी रूपयांचा फायदा झाला आहे.

जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांमध्ये इंद्रधनू शेतकरी उत्पादक कंपनी देऊळघाट, केळवद शेतकरी उत्पादक कंपनी केळवद, अमडापूर शेतकरी उत्पादक कंपनी अमडापूर, विठुमाऊली शेतकरी उत्पादक कंपनी देऊळगाव माळी, डोणगाव शेतकरी उत्पादक कंपनी डोणगाव, नळगंगा अ‍ॅग्रो प्रो. कंपनी मोताळा या सहा कंपन्यांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यात आणखी चार कंपन्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र स्थापण केल्या आहेत. यामध्ये जय सरदार कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी भोरटेक, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी कुंड खु., मुक्ताई कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण शेतमाल उत्पादन कंपनी वरवट बकाल, पिंपळगाव देवी शे. उ. कं. पिंपळगाव देवी, श्री सुपो शे.उ.कं.लि. निमगाव ता. नांदूरा या कंपन्यांचा समावेश आहे.

 

या कंपन्यांना झाला फायदा

कंपनीचे नाव              तूरीची खरेदी (टन)            कंपन्यांचा नफा (लाखात)

इंद्रधनू शे. कंपनी           २४८.७०                            १.२५६

केळवद शे. कं.              ४२०.००                              २.१२१

अमडापूर शे. कं.            ५५०.००                             २.७७८

विठुमाऊली शे.कं.          २१४.९०                              १.०८५

डोणगाव शे. कं.            २२५.००                              १.१३६

नळगंगा अ‍ॅ. प्रो.            २००.००                             १.०१०

जय सरदार शे.कं.           १३००.००                           ६.५६५

संत गाजनन शे.कं.          ३४९.००                         १.७६२

मुक्ताई शे. कं.               ३६६.५०                            १.८५१

पिंपळगाव देवी            २३५.००                               १.१८७

श्री सुपो शे.कं.                ३५०.००                             १.७६८

 

नफ्याचे होणार समान वाटप जिल्ह्यात शेतकरी बचतगटांचे एकत्रीकरण करून कंपन्या स्थापण करण्यात आल्या. बचतगटांमध्ये असलेले सर्वच शेतकरी कंपनीमध्ये समान भागीदार आहेत. त्यामुळे कंपनीला झालेल्या नफ्याचे शेतकऱ्यांना समान वाटप करण्यात येते.

 शासनाने शेतकरी कंपन्यांची सब एजंट म्हणून हमीभावात तूर खरेदी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना हमीभावाच्या रकमेच्या एक टक्के कमीशन मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी कंपन्यांना परिणामी शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा फायदा झाला आहे. - योगेश अघाव समन्वयक, आत्मा. बुलडाणा