शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

गळक्या लोकलमुळे प्रवासी होताहेत हैराण

By admin | Updated: June 29, 2016 02:12 IST

दोन आठवड्यांपूर्वी पावसाचे आगमन झाले असून शहरातील लोकल सेवेला गळती लागली आहे.

नवी मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी पावसाचे आगमन झाले असून शहरातील लोकल सेवेला गळती लागली आहे. नवी मुंबईत दररोज हजारो प्रवासी हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करतात, मात्र या प्रवाशांना पावसाळा सुरु होताच गळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे फलाटांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. निकामी खिडक्या, रेल्वेचे नादुरुस्त दरवाजे, मोडक्या आसन व्यवस्था, फलाटांवरील छतांमधून गळणारे पाणी यामुळे प्रवाशांनी कसा प्रवास करायचा, असा प्रश्न नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांची डागडुजी करण्याविषयी सिडको आणि प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीबीडी, नेरुळ, सानपाडा, तुर्भे, घणसोली आदी रेल्वेस्थानकांमध्ये प्रवाशांना फलाटावरील गळक्या छताखाली लोकलची वाट पाहत उभे राहावे लागते. इंडिकेटर बंद पडल्याने लोकलची वेळ कळत नाही. या मार्गावर आता बारा डब्यांच्या लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अनेकदा याबाबत उद्घोषणा होत नाही. शिवाय गाडीवरही लिहिलेले नसल्याने प्रवाशांची विशेषत: महिला प्रवाशांची गैरसोय होते. फलाटांची उंची वाढविण्याचे काम अजूनही सुरुच असल्याने बांधकाम साहित्य अनेक ठिकाणी पडलेले दिसते. बेलापूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर बांधकाम साहित्य ठेवण्यात आल्याने प्रवाशांना फेरा मारून यावे लागत आहे. फलाटांची उंची वाढविण्याचे पावसाळ््यापूर्वी पूर्ण करण्यात येणार होते मात्र जून महिना संपत आला तरी काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही. अनेक वेळा फलाटांवरील दिवे बंद असतात. रात्रीच्या वेळी सानपाडा, जुईनगर स्थानकातील इंडिकेटर बंद असतात शिवाय लोकल ड्रायव्हरच्या केबिनमध्येही अंधार असल्याने गाडी नेमकी कुठली आहे, हेच समजत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. >प्रवाशांची पळापळ९ आणि १२ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून नेमकी किती डब्यांची लोकल आहे याची सूचना न झाल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. लोकल फलाटावर येताच प्रवाशांची दोन्ही बाजूंनी पळापळ होत असल्याची व्यथा नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी मांडली आहे. यामध्ये वयोवृध्द, महिलावर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचेही धुरत यांनी सांगितले.