शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

मध्य वैतरणा ओव्हरफ्लो नाहीच

By admin | Updated: September 19, 2015 22:50 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रांपैकी मध्य वैतरणा हा तलाव शनिवारी ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठल्या; मात्र रात्री उशिरा महापालिका प्रशासनाने खडबडून जागे

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रांपैकी मध्य वैतरणा हा तलाव शनिवारी ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठल्या; मात्र रात्री उशिरा महापालिका प्रशासनाने खडबडून जागे होत मध्य वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाले नसल्याचे स्पष्ट केले. महापालिकेने सातही तलावांतील पाण्याची पातळी वाढत नसल्याने निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी अनुक्रमे २०, ५० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर सप्टेंबरच्या उत्तरार्धात होत असलेल्या पावसाने तलावांतील पाण्याची पातळी वाढेल, अशी आशा अद्यापही महापालिकेला आहे. दुसरीकडे शुक्रवारी राज्यात झालेल्या पावसाने दिलासा दिला असतानाच शनिवारी सकाळपासूनच व्हॉट्स अ‍ॅपवरून मध्य वैतरणा ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठू लागल्या. त्यांनी एवढा वेग पकडला की मुंबईवरील जलसंकट मिटणार; अशा आशयाच्या संदेशांनी धुमाकूळ घातला.अखेर यावर महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रमुख तलावांपैकी मोडक सागर धरणापासून शहराला जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी स्थिर राहण्यासाठी मध्य वैतरणा आणि अपर वैतरणा धरणाचे दरवाजे उघडून नियमित स्वरूपात पाणी घेण्यात येते. १९ सप्टेंबर रोजी याच प्रकारे वैतरणा धरणातून मोडक सागर धरणात पाणी सोडण्यात आले. शिवाय शनिवारच्या आकडेवारीनुसार, मध्य वैतरणा धरण भरलेले नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)मुसळधार पावसाचा इशारा कायम..मुंबई वगळता शुक्रवारी राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच पुढील ७२ तासांसाठी राज्याला देण्यात आलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे; तर मुंबईत पुढील ४८ तासांत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा शनिवारीही कायम आहे; तर दुसरीकडे विदर्भ आणि लगतच्या भागावर असलेल्या खोल दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे; शिवाय आता ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैर्ऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर आहे. मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे; तर गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.