शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

मध्यमवर्गीय जाती निर्मूलनापासून दूर

By admin | Updated: May 16, 2016 01:47 IST

समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही

देहूरोड : समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही. उलट देशातील बहुसंख्य लोक मध्यमवर्गीय बनू लागले आहेत. आजचा मध्यमवर्गीय हा अत्यंत दुबळा, विचारहीन आणि संवेदनाहीन असून, जाती निर्मूलनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टांपासून खूप दूर चालला आहे, असे परखड मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी व कामगार नेते काशिनाथ सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘एकच ध्यास धम्मभूमी देहूरोडचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन हभप रामदासमहाराज यांचे हस्ते झाले. त्या वेळी वैद्य बोलत होते. भन्ते राजरतन , पशुराम वाडेकर, दादासाहेब सोनवणे, मिलिंद भालेराव, कवी प्रा. बाबासाहेब जाधव, आकाश सोनवणे, आर. के. लोंढे, सी. डी. धस आदी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, डॉ आंबेडकर यांना हा देश जातीविरहित देश बनवायचा होता. त्यांनी जाती निर्मूलनासाठी लढणारी एक फळी तयार केली होती. वाघासारखी डरकाळी फोडून जाती व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम या फळीने करावे, असे त्यांचे स्वप्न होते. पण, दुर्दैवाने ज्यांनी हे करायचे होते, तेच आता जातीयवाद्यांच्या पुढ्यात बसले आहेत. घटनेच्या प्रास्ताविकेतील काही शब्द बदलले जात आहेत. याकडे दुर्लक्ष केले, तर एक दिवस संपूर्ण घटनाच बदली होईल. घटनेची रक्षण करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या शब्दांप्रमाणे जातीविरहित हा शब्द घालण्याची गरज आहे. ह.भ.प. रामदासमहाराज म्हणाले, माणूस हा मानवतावाद सोडून अंधश्रद्धेमागे धावत आहे. (वार्ताहर)