शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

मध्यमवर्गीय जाती निर्मूलनापासून दूर

By admin | Updated: May 16, 2016 01:47 IST

समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही

देहूरोड : समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही. उलट देशातील बहुसंख्य लोक मध्यमवर्गीय बनू लागले आहेत. आजचा मध्यमवर्गीय हा अत्यंत दुबळा, विचारहीन आणि संवेदनाहीन असून, जाती निर्मूलनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टांपासून खूप दूर चालला आहे, असे परखड मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी व कामगार नेते काशिनाथ सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘एकच ध्यास धम्मभूमी देहूरोडचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन हभप रामदासमहाराज यांचे हस्ते झाले. त्या वेळी वैद्य बोलत होते. भन्ते राजरतन , पशुराम वाडेकर, दादासाहेब सोनवणे, मिलिंद भालेराव, कवी प्रा. बाबासाहेब जाधव, आकाश सोनवणे, आर. के. लोंढे, सी. डी. धस आदी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, डॉ आंबेडकर यांना हा देश जातीविरहित देश बनवायचा होता. त्यांनी जाती निर्मूलनासाठी लढणारी एक फळी तयार केली होती. वाघासारखी डरकाळी फोडून जाती व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम या फळीने करावे, असे त्यांचे स्वप्न होते. पण, दुर्दैवाने ज्यांनी हे करायचे होते, तेच आता जातीयवाद्यांच्या पुढ्यात बसले आहेत. घटनेच्या प्रास्ताविकेतील काही शब्द बदलले जात आहेत. याकडे दुर्लक्ष केले, तर एक दिवस संपूर्ण घटनाच बदली होईल. घटनेची रक्षण करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या शब्दांप्रमाणे जातीविरहित हा शब्द घालण्याची गरज आहे. ह.भ.प. रामदासमहाराज म्हणाले, माणूस हा मानवतावाद सोडून अंधश्रद्धेमागे धावत आहे. (वार्ताहर)