शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक!

By admin | Updated: July 2, 2015 00:37 IST

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल

लोणावळा : भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल, अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी वर्तविली.खंडाळा येथील आंबेकर स्मृती येथे बुधवारी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपाने मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाची घोषणा केली होती. सत्तेवर येताच एलबीटी रद्द करू असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात कोठेही अंमलबजावणी नाही़ भाजपाची ही आश्वासने म्हणजे केवळ अफवांचा पाऊस आहे.सर्वसामान्य जनतेची जाण नसलेले असंवेदनशील शासन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कर्जमाफीसाठी ९ व १० जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे़ पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा लावून धरणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण या विरोधात सभागृहाच्या आत व बाहेर आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले.बैठकीला राज्याचे महासचिव मोहन प्रकाश, प्रभारी स्वराज वाल्मिक, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत, प्रदेश महिलाध्यक्षा कमल व्यवहारे व इतर मान्यवर उपस्थित होते़प्रभारी नियुक्त करणारमहाराष्ट्रात आगामी काळात २८८ मतदारसंघांत प्रभारी नियुक्त करणार आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले.महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदीत केलेला घोटाळा व भ्रष्टाचार यामुळे बीडची चिक्की १०० वर्षांची परंपरा असलेल्या लोणावळ्याच्या चिक्कीपेक्षा जास्त प्रसिद्ध झाली आहे़ शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला घरचा आहे दिला आहे़ त्यामुळे ‘सावंत, आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असे म्हणावे लागेल, असे चव्हाण म्हणाले.भारताचा अपमान भारतात जन्मल्याची लाज वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशामध्ये सांगून भारताच्या गौरवशाली परंपरेचा अपमान करीत असल्याची टीका काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश यांनी केली़ रमजान ईदला भरती १९ जुलैला रमजान ईदची सुटी असताना, त्याच दिवशी सरकारने राज्यात महसूल विभागातील क्लार्क भरतीची परीक्षा ठेवली आहे़ हे जाणीवपुर्वक असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला़