शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक!

By admin | Updated: July 2, 2015 00:37 IST

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल

लोणावळा : भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल, अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी वर्तविली.खंडाळा येथील आंबेकर स्मृती येथे बुधवारी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपाने मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाची घोषणा केली होती. सत्तेवर येताच एलबीटी रद्द करू असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात कोठेही अंमलबजावणी नाही़ भाजपाची ही आश्वासने म्हणजे केवळ अफवांचा पाऊस आहे.सर्वसामान्य जनतेची जाण नसलेले असंवेदनशील शासन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कर्जमाफीसाठी ९ व १० जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे़ पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा लावून धरणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण या विरोधात सभागृहाच्या आत व बाहेर आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले.बैठकीला राज्याचे महासचिव मोहन प्रकाश, प्रभारी स्वराज वाल्मिक, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत, प्रदेश महिलाध्यक्षा कमल व्यवहारे व इतर मान्यवर उपस्थित होते़प्रभारी नियुक्त करणारमहाराष्ट्रात आगामी काळात २८८ मतदारसंघांत प्रभारी नियुक्त करणार आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले.महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदीत केलेला घोटाळा व भ्रष्टाचार यामुळे बीडची चिक्की १०० वर्षांची परंपरा असलेल्या लोणावळ्याच्या चिक्कीपेक्षा जास्त प्रसिद्ध झाली आहे़ शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला घरचा आहे दिला आहे़ त्यामुळे ‘सावंत, आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असे म्हणावे लागेल, असे चव्हाण म्हणाले.भारताचा अपमान भारतात जन्मल्याची लाज वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशामध्ये सांगून भारताच्या गौरवशाली परंपरेचा अपमान करीत असल्याची टीका काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश यांनी केली़ रमजान ईदला भरती १९ जुलैला रमजान ईदची सुटी असताना, त्याच दिवशी सरकारने राज्यात महसूल विभागातील क्लार्क भरतीची परीक्षा ठेवली आहे़ हे जाणीवपुर्वक असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला़