शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक!

By admin | Updated: July 2, 2015 00:37 IST

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल

लोणावळा : भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल, अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी वर्तविली.खंडाळा येथील आंबेकर स्मृती येथे बुधवारी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपाने मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाची घोषणा केली होती. सत्तेवर येताच एलबीटी रद्द करू असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात कोठेही अंमलबजावणी नाही़ भाजपाची ही आश्वासने म्हणजे केवळ अफवांचा पाऊस आहे.सर्वसामान्य जनतेची जाण नसलेले असंवेदनशील शासन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कर्जमाफीसाठी ९ व १० जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे़ पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा लावून धरणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण या विरोधात सभागृहाच्या आत व बाहेर आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले.बैठकीला राज्याचे महासचिव मोहन प्रकाश, प्रभारी स्वराज वाल्मिक, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत, प्रदेश महिलाध्यक्षा कमल व्यवहारे व इतर मान्यवर उपस्थित होते़प्रभारी नियुक्त करणारमहाराष्ट्रात आगामी काळात २८८ मतदारसंघांत प्रभारी नियुक्त करणार आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले.महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदीत केलेला घोटाळा व भ्रष्टाचार यामुळे बीडची चिक्की १०० वर्षांची परंपरा असलेल्या लोणावळ्याच्या चिक्कीपेक्षा जास्त प्रसिद्ध झाली आहे़ शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला घरचा आहे दिला आहे़ त्यामुळे ‘सावंत, आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असे म्हणावे लागेल, असे चव्हाण म्हणाले.भारताचा अपमान भारतात जन्मल्याची लाज वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशामध्ये सांगून भारताच्या गौरवशाली परंपरेचा अपमान करीत असल्याची टीका काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश यांनी केली़ रमजान ईदला भरती १९ जुलैला रमजान ईदची सुटी असताना, त्याच दिवशी सरकारने राज्यात महसूल विभागातील क्लार्क भरतीची परीक्षा ठेवली आहे़ हे जाणीवपुर्वक असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला़