शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

माध्यान्ह भोजनाची होणार तपासणी

By admin | Updated: February 11, 2016 01:36 IST

शाळांमधील माध्यान्ह भोजनाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून

अमरावती : शाळांमधील माध्यान्ह भोजनाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही तपासणी होणार आहे. यासाठी निवड झालेल्या शाळा तसेच केंद्रीय स्वयंपाक गृहांमधून शिजणाऱ्या अन्नाचे नमुने महिन्यातून एकदा तपासणीसाठी पाठवावेत, असे आदेश शासनाच्या उपसचिव सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. माध्यान्ह भोजन योजनेचा (शालेय पोषण आहार योजना) समावेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये करण्यात आला आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने या योजनेची नियमावली २०१५ मध्ये जाहीर केली आहे. या नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन शालेय शिक्षण विभागाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, मदरसा, मक्तबा (सर्व शिक्षा अभियान सहायिता) येथे ६ ते १४ वयोगटातील इयत्ता पहली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांस दररोज (शाळेच्या सुट्टी व्यतिरिक्त) पोषण मूल्ययुक्त मोफत आहार दिला जावा आणि शिजविलेल्या आहाराचे वाटप केवळ शाळेतच करावे तसेच प्रत्येक शाळेत आरोग्यदायी व चवदार आहार शिजविण्याची सुविधा उपलब्ध करावी, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरी भागामध्ये आवश्यकतेनुसार केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार शिजवून त्याचे वाटप शाळेतच करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने या आठवड्यात दिल्या आहेत. अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार माध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याचा आढावा राज्यस्तरीय संनियंत्रण समितीने घ्यावा व आहाराची पोषण मूल्ये व गुणवत्ता राखण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)इंधन, भाजीपाला उपलब्ध न झाल्यास, स्वयंपाकी, मदतनीस अनुपस्थित असल्यास अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळेच्या दिवशी शाळेमध्ये मध्यान्ह भोजन न दिल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांस अन्नसुरक्षा भत्ता पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत द्यावा, असे निर्देश आहेत.अमरावती जिल्ह्यात माध्यान्ह भोजनाचे नमुने घेण्यास सुरुवात झालेली नाही. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात असे नमुने घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातहीा असे नमुने घेण्यात येतील. -मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त अन्न व औषधी विभाग.