शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

माध्यान्ह भोजनाची होणार तपासणी

By admin | Updated: February 11, 2016 01:36 IST

शाळांमधील माध्यान्ह भोजनाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून

अमरावती : शाळांमधील माध्यान्ह भोजनाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही तपासणी होणार आहे. यासाठी निवड झालेल्या शाळा तसेच केंद्रीय स्वयंपाक गृहांमधून शिजणाऱ्या अन्नाचे नमुने महिन्यातून एकदा तपासणीसाठी पाठवावेत, असे आदेश शासनाच्या उपसचिव सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. माध्यान्ह भोजन योजनेचा (शालेय पोषण आहार योजना) समावेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये करण्यात आला आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने या योजनेची नियमावली २०१५ मध्ये जाहीर केली आहे. या नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन शालेय शिक्षण विभागाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, मदरसा, मक्तबा (सर्व शिक्षा अभियान सहायिता) येथे ६ ते १४ वयोगटातील इयत्ता पहली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांस दररोज (शाळेच्या सुट्टी व्यतिरिक्त) पोषण मूल्ययुक्त मोफत आहार दिला जावा आणि शिजविलेल्या आहाराचे वाटप केवळ शाळेतच करावे तसेच प्रत्येक शाळेत आरोग्यदायी व चवदार आहार शिजविण्याची सुविधा उपलब्ध करावी, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरी भागामध्ये आवश्यकतेनुसार केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार शिजवून त्याचे वाटप शाळेतच करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने या आठवड्यात दिल्या आहेत. अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार माध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याचा आढावा राज्यस्तरीय संनियंत्रण समितीने घ्यावा व आहाराची पोषण मूल्ये व गुणवत्ता राखण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)इंधन, भाजीपाला उपलब्ध न झाल्यास, स्वयंपाकी, मदतनीस अनुपस्थित असल्यास अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळेच्या दिवशी शाळेमध्ये मध्यान्ह भोजन न दिल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांस अन्नसुरक्षा भत्ता पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत द्यावा, असे निर्देश आहेत.अमरावती जिल्ह्यात माध्यान्ह भोजनाचे नमुने घेण्यास सुरुवात झालेली नाही. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात असे नमुने घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातहीा असे नमुने घेण्यात येतील. -मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त अन्न व औषधी विभाग.