शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

जोशींच्या बदलीने माफिया, आमदारांचा सुटकेचा नि:श्वास

By admin | Updated: April 29, 2016 03:58 IST

आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे.

ठाणे : रेती-खाण माफिया, बेकायदा गोदाम मालकांची लॉबी यांच्या डोळ्यात सलत असलेल्या आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे. जोशी यांच्या बदलीमुळे स्वच्छ प्रशासनाचे वायदे करणाऱ्या राज्यातील भाजपाप्रणीत सरकारचेच नाक कापले गेल्याची भावना ठाणेकरांमध्ये व्यक्त होत आहे.जिल्ह्याला तब्बल ३१ वर्षांनंतर डॉ. अश्विनी जोशी यांच्या माध्यमातून महिला जिल्हाधिकारी लाभल्या होत्या. शिवाय त्या आयएएस दर्जाच्या अधिकारी होत्या. अन्यथा ठाण्यात प्रमोटी आयएएस जिल्हाधिकारीपदी धाडण्याची जुनी प्रथा होती.जोशी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मात्र वेगवेगळ््या लॉबींनी आणि त्यांना आशीर्वाद असलेल्या स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींनी बदलीकरिता रेटा लावल्याने अखेर मुंबईचे जिल्हाधिकारी हे तोलामोलाचे पद देऊन त्यांची घाऊक बदल्यांमध्ये उचलबांगडी केली गेली. भाईंदरमधील सेंट्रल पार्क चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ती जागा सरकारी असल्याचे उघडकीस आल्यावर जिल्हाधिकारी जोशी यांनी याबाबत नोटीस बजावल्या. तसेच पार्कच्या कामाला स्थगिती दिली. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणावरून त्यांना लक्ष्य केले होते. करमणूक कर भरण्याच्या प्रकरणावरून कल्याणचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड आणि जिल्हाधिकारी यांच्यात कलगीतुरा रंगला. तेही सध्या भाजपाच्या कळपात आहेत. ठाणे, कल्याण, भाईंदर रेतीबंदर परिसरातील अवैध रेती उपासा करणाऱ्या माफियांविरोधातही जोशींनी कारवाई केली होती. नवी मुंबईतील दगड खाणी सील करण्याची कारवाई यापूर्वी केली. जोशी यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वनराई बंधारे उभारले. तसेच टाऊन हॉलला नवीन झळाळी प्राप्त करून दिली. (प्रतिनिधी)