शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जमीन नसताना म्हाडाचे कागदी इमले!

By admin | Updated: November 8, 2016 05:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवडणाऱ्या घरांची महत्वाकांक्षी योजना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी फक्त कागदी घरे बांधूनच पूर्ण करण्याचा चंग बांधल्याचे समोर आले आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवडणाऱ्या घरांची महत्वाकांक्षी योजना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी फक्त कागदी घरे बांधूनच पूर्ण करण्याचा चंग बांधल्याचे समोर आले आहे. इंचभर जागा ताब्यात नसतानाही ९ठिकाणी घरांचे इमले बांधण्याची जाहिरात म्हाडाने दिली आहे.म्हाडाच्या या ‘स्वप्ननगरी’वर गृहनिर्माण विभागाच्या सचिवांनी गंभीर आक्षेप घेतले असून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी पुढील कारवाईला स्थगिती देऊन टाकली आहे. विशेष म्हणजे, जेवढी घरे बांधायची आहेत तेवढ्या घरांसाठी केंद्र शासनाने स्वत:चा हिस्सा म्हणून तब्बल ३८० कोटी रुपये राज्याला देऊ केले आहेत. पण पैसे मिळूनही जागाच नसल्याने सध्या तरी ही घरे कागदावरच आहेत.केंद्र शासनाने परवडणारी घरे या योजनेअंतर्गत राज्यात गोरगरिबांसाठी ११ लाख घरे बांधण्याची घोषणा युती सरकारने केली होती. मात्र या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली तरी एकही घर बांधले गेले नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुवा म्हणून प्रस्ताव तयार करण्याची, राज्याची बाजू मांडण्याची जबाबदारी म्हाडावर देण्यात आली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक ‘स्टेट लेव्हल मॉनिटरिंग कमिटी’ही स्थापन करण्यात आली. या समितीकडे म्हाडाने प्रस्ताव सादर करायचे, समितीने त्या प्रस्तावांची छाननी करायची आणि त्यानंतर ते प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचे अशी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. त्यानुसार म्हाडाने एकूण १,०७,८७४ घरांचे प्रस्ताव सादर केले. त्यातील ६३,२८२ घरांचे प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीने मान्य केले. ३७,१७७ घरांचे प्रस्ताव काही पुढे ढकलले गेले आणि राज्य समितीच्या आक्षेपानंतर ७४१५ घरांचे प्रस्ताव म्हाडाने मागे घेतले.मात्र म्हाडाने बारवे गाव-कल्याण, भंडारली-कल्याण, गोठेघर-ठाणे, बोळींज वसई, खोनी-कल्याण, निरजेपाडा-कल्याण, शिरढोण-कल्याण, वाव्हे-कर्जत, केळावली-खालापूर या नऊ ठिकाणच्या ११ जागांवर घरे बांधण्याची जाहिरात देऊन टाकली. मात्र, यातील एकही जागा म्हाडाच्या ताब्यात नाही. शिवाय वाव्हे, केळावली, बोळींज आणि खोनी या चार जागांचे प्रस्ताव राज्य समितीने मंजूर केलेले नसतानाही त्यांचा समावेश जाहिरातीत कसा? याचीही चौकशी होण्याची गरज आहे, असे मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला; पण त्यांनी दूरध्वनी घेतला नाही वा संदेशाला उत्तरही दिले नाही.