शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

पाच वर्षांत येणार मेट्रो-३

By admin | Updated: February 13, 2015 02:13 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाचे काम २०१६ या आर्थिक वर्षात सुरू होईल आणि प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासह उर्वरित समस्या मार्गी लावूनच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाचे काम २०१६ या आर्थिक वर्षात सुरू होईल आणि प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासह उर्वरित समस्या मार्गी लावूनच हा प्रकल्प २०२० साली पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.३३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी एकूण ३९.९ हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. त्यापैकी २७.२९ हेक्टर जमीन तात्पुरत्या कामासाठी लागणार आहे. त्यातील केवळ २.२५ हेक्टरच्या खासगी जमिनीचा वापर होणार आहे. मेट्रो ३ प्रकल्पासाठी कायमस्वरूपी ११.८० हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी ८.७० हेक्टरची जमीन शासकीय आणि उर्वरित ३.२० हेक्टर खासगी जमीन असणार आहे. २ हजार ४४ वृक्षांबाबत बोलताना भिडे म्हणाल्या, वृक्ष लागवड आणि पुनर्रोपणासाठी जागा निश्चित केली आहे. शिवाय पर्यावरण आणि भौगोलिक परिसरावर होणाऱ्या परिणामांचाही सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. शिवाय गिरगाव आणि काळबादेवी परिसरातील रहिवाशांवरही प्रकल्पादरम्यान अन्याय होणार नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अश्विनी भिडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या संस्थांशी चर्चा व समन्वय साधून तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा आमचा प्रयत्न आहे. योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय आणि रहिवाशांशी सल्लामसलत केल्यानंतरच पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल. सार्वजनिक सुविधा पुरविणाऱ्या सेवा अन्यत्र हलविण्याबाबत बहुतेक संबंधित प्रशासकीय परवानग्या प्राप्त झाल्या असून, इतर बाबतीत तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. शासकीय भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याने या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केला जाईल. (प्रतिनिधी)