शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो ऑन ट्रॅक आजपासून मुंबईकरांच्या सेवेत

By admin | Updated: June 8, 2014 02:09 IST

उद्यापासून अवघ्या २१ मिनिटांत एसीची हवा खात खात मुंबईतला चाकरमानी घाटकोपरहून अंधेरीला पोहोचणार आहे.

मेट्रो ऑन ट्रॅक आजपासून मुंबईकरांच्या सेवेतमुंबई : घाटकोपरहून साकिनाका, चकला, मरोळ, अंधेरी किंवा एअरपोर्ट हा पोटात गोळा आणणारा, वाहतुक कोंडीत थकवणारा प्रवास चुटकीसरशी, अत्यंत आरामात पूर्ण करून देणारी मेट्रो उद्यापासून लाखो चाकरमान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. उद्यापासून अवघ्या २१ मिनिटांत एसीची हवा खात खात मुंबईतला चाकरमानी घाटकोपरहून अंधेरीला पोहोचणार आहे. असल्फा, चकाला, साकिनाका, एअरपोर्ट मार्ग, मरोह येथील वाहतूककोंडी भेदण्यात मुंबईकरांचे रोजचे तीन तास फुकट जात होते. त्यामुळेच मेट्रो सुरू होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे लाखो चाकरमानी सुखावले आहेत. या प्रत्येकाला मेट्रो प्रवासाची उत्सुकता आहे. इतकी की इतकी की हा महत्वाकांक्षी प्रकल्प तब्बल चार वर्षांच्या विलंबाने प्रत्यक्षात उतरला ही बाब त्यांच्या विस्मृतीत शिल्लक नाही.मेट्रो हा शहरातील प्रवासासाठीचा सहावा सार्वजनिक पर्याय आहे. लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि मोनो यानंतर आता मेट्रोही मुंबईतल्या सार्वजनिक प्रवासासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकेल. उद्या(८ जून) सकाळी साडेदहा वाजता उद्घाटनानंतर दुपारी एक वाजल्यापासून मेट्रो अधिकृतरित्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. विशेष बाब म्हणजे सुरूवातीचा एक महिना फक्त दहा रूपयांमध्ये मेट्रोतून प्रवास करता येईल. केंद्रीय रेल्वे बोर्डाने हिरवा कंदिल दिल्यानंतर प्रत्यक्षात मेट्रो कधी धावणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. शिवाय मेट्रो सुरु करण्यासह मेट्रोच्या तिकिट दराहून राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरु झाली होती. मात्र शनिवारी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने या वादावर पडदा टाकत उद्यापासून हा प्रकल्प सुरू करणार अशी घोषणा केली आणि ती वार्‍यासारखी शहरात पसरली. या घोषणेमुळे घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावरून प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि याआधीचा प्रवास किती कंटाळवाणा होता, किती वेळ लागायचा, रिक्षा-टॅक्सीसाठी किती पैसा ओतावा लागत होता या चर्चांना उत आला.इन्फोबॉक्स, पॉईंटर्सपहाटे ५.३० ते रात्री १२ या वेळेत मेट्रो सेवा सुरू राहिल. दररोज १६ मेट्रो ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावतील. प्रत्येक मेट्रोला वातानुकुलित चार कोच असतील. एकूण १५०० प्रवासी वाहून नेऊ शकेल. विशेष म्हणजे पहिले ३० दिवस मुंबईकरांना मेट्रोतून अवघ्या दहा रुपयांत प्रवास करता येणार आहे.