शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

मेट्रोची ‘स्मार्ट’ भरारी

By admin | Updated: July 14, 2014 03:17 IST

मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मेट्रोची नवीन भाडेवाढ जुलै महिन्यात लागू

मुंबई : मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मेट्रोची नवीन भाडेवाढ जुलै महिन्यात लागू झाल्यानंतर आणि यामध्येही स्मार्ट कार्डद्वारे प्रवास स्वस्त केल्याने मेट्रो प्रवाशांनी स्मार्ट कार्डलाच अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. नवीन भाडेवाढ लागू होताच पाच दिवसांत तब्बल ३0 हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. मुंबईकरांच्या पसंतीस मेट्रो उतरावी यासाठी एक महिना त्याचे भाडे १0 रुपये ठेवले. मात्र मेट्रो सुरू होण्यापूर्वीच भाडे ठरवण्यावरून राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वाद रंगला. भाडेदराचा वाद न्यायालयात असल्याने मेट्रोचे नवीन पण अल्प भाडे ८ जुलैपासून लागू केले. वर्सोवा ते घाटकोपर कमीतकमी भाडे १0 रुपये आणि जास्तीतजास्त भाडे २0 रुपये आकारणी करण्याचा निर्णय झाला. टोकन काढून प्रवास केल्यास वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी २0 रुपये मोजावे लागत आहेत. तर स्मार्ट कार्ड काढून प्रवास केल्यास १५ रुपये भाडे आकारणी होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्मार्ट कार्डलाच जास्त पसंती दिली आहे. ८ जुलैपासून भाडे लागू होताच आतापर्यंत ३0 हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून मेट्रोच्या पहिल्या वर्षात स्मार्ट कार्डची ७0 टक्के विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आतापर्यंत ५0 टक्के विक्री झाल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्ताने सांगितले. मेट्रो सुरू होताच पहिल्या महिन्यापासून प्रत्येक दिवशी सरासरी ४ हजार स्मार्ट कार्डची विक्री होत आहे. आतापर्यंत २ लाख २५ हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. (प्रतिनिधी)